Wednesday, March 25, 2009

या नाव ज्ञान

मुख्य देवास जाणावे
मुख्य देवास जाणावे सत्य स्वरुप वोळखावे नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान - - माणसाने त्याच्या कल्पनेप्रमाणे अनेक प्रकारचे अनेक देव निर्माण केले .अनेक शास्त्रे ,अनेक मते मतांतरे या सगळ्यात खरा देव कोणाला कळेनासे होते .लोक सर्व साधारण पणे प्रकारचे देव मानतात . प्रतिमा अवतार .अंतरात्मा .निर्मळात्मा [निश्चळ परब्रह्म ].
हिंदू धर्मात ३३ कोटी देव मानले आहेत .हे दे लोकांच्या प्रापंचिक वासना पूर्ण कराव्या म्हणून भजले जातात .पण त्यापासून समाधान मिळत नाही .
मृत्तिका ,धातू पाषाणादिक ऐसिया प्रतिमा अनेकबहुतेक लोकांचा दंडकप्रतिमादेवी ११ --२९
धातू ,दगड ,माती यापासून तयार केलेल्या देवांच्या प्रतिमा म्हणजे देव अशी लोकांची कल्पना असते .
देवांचे जे अवतार होउन गेले त्यांना लोक पूजा करतात ,त्यांचा जप करतात ,त्यांचे ध्यान करतात .
सर्वांच्या अंतरात्म्याला काही लोक देव मानतात तर काही जण विश्वाला व्यापून असणा-यांना विश्वात्म्याला देव मानतात,तर काही जो ज्ञानात्मा ,द्रष्टा असतो त्याला देव मानतात .
आपल्या आराध्य दैवताची मूर्ती ,प्रतिमा देवघरात ठेऊन त्याची यथासांग पूजा केली जाते .त्यामुळे लोकांना दिलासा मिळतो ,सांसारिक चिंतनात आडकलेले मन त्यापासून थोड़े वेगळे होते .पण आपल्या घरातील देव खरा देव आहे का ? हा प्रश्न आहे . तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोकांनी देव पाहिला ,तशीच धातूची मूर्ती तयार केली तर प्रतिमादेव तयार होतो .क्षेत्रातील देव अवतारी देवांची प्रतिमा असते .ब्रह्मा ,विष्णू हे तीनही देव सर्व देवात वरिष्ठ मानले जातात .
त्या तिही देवांस ज्याची सत्ता तो अंतरात्माचि पाहता। कर्ता भोक्ता तत्वता प्रत्यक्ष आहे १८- -
ब्रह्मा ,विष्णू ,महेश या तीनही देवांवर अंतरात्म्याची सत्ता चालते .अंतरात्माच कर्ता ,भोक्ता असतो .माणसाच्या अंतर्यामी असलेली शुध्द जाणीव म्हणजे अंतरात्मा ! अंतरात्मा शरीर चालवतो ,जाणीवेच्या रूपाने ,विवेकाने ! सामान्य माणूस त्याच्या अंतर्यामी असलेल्या अंतरात्म्याला विसरतो ,तीर्थक्षेत्रांना भेटी देतो ,सगळीकड़े त्याला दगडधोंडे दिसतात .खरा देव दिसतच नाही .सत्संगाने माणूस अंतर्मुख होतो ,आत बघायला शिकतो ,सूक्ष्माचे ज्ञान होते ,विचाराने ,साधनेने आत्मस्वरूपा पर्यंत पोहोचतो .
तो अंतरात्मा म्हणिजे देव त्याचा चंच स्वभाव पाळिताहे सकळ जीव अंतरीच वसोनि११ -- अंतरात्मा हाच देव जो सर्व जीवांच्या अंतर्यामी राहतो .त्यांचे पालन करतो .अंतरात्मा सर्व दृष्याचे मूळ
आहे .अंतरात्मा तो एकच आहे जो विश्वरूपाने विस्तार पावला आहे .पण सगुणामध्ये .दृश्य प्रकृती मध्ये विश्वरूपाने विस्तार पावलेला आत्मा हा अनेक प्रकारांच्या बदलांचा ,भेदांचा आहे ,त्यामुळे तो शाश्वत
नाही .अंतरात्मा सर्वत्र व्यापून असतो पण सर्व प्राण्यांत माणसात सारख्या सामर्थ्याने प्रकट होत
नाही .शरीराला जिवंत ठेवणारी ,इंद्रियांना चेतना देणारी ,मनाच्या व्यापारांना प्रेरणा देणारी ,बुध्दी ला विचार करायला लावणारी ,जीवपणाने सुखदू : भोगणारी ,उद्वेग ,चिंता ,माया ममता अनुभवणारी सूक्ष्म चित्कला ती आत्मा !देहात राहणारा आत्मा डोळ्यातून पाहतो ,कानातून ऐकतो ,नाकातून वास घेतो .तो एकटा इंद्रियांद्वारा सगळी हालचाल घडवून आणतो आत्माच उठतो ,निजतो,चालतो ,पळतो सर्व क्रिया घडवून आणतो .देह नाशवंत आहे ,आत्मा शाश्वत आहे ,खरा देव आहे .
पिंडाच्या दृष्टीने देह धारण करणारा आत्मा तो जीव ,ब्रह्मांडाच्या दृष्टीने विश्व धारण करणारा तो शिव .जसे पिंडाचे चार देह तसे ब्रह्मांडाचे चार देह असतात .विराट ,हिरण्यगर्भ,अव्याकृत मूळमाया .या चार देहांनी ईश्वर विश्वाला धारण करतो .तो त्रिगुणातीत असतो .त्रिगुणातीत असणारा ईश्वर म्हणजे परब्रह्म ! परब्रह्मामध्ये जो संकल्प निर्माण होतो तो स्फुरणरूप असतो .त्या संकल्प रूपाला मूळमाया म्हणतात .मूळमायेची दोन अंगे असतात .एक शुध्द जाणीव रूप दूसरी शक्तीरूप .जाणीव रूप अंगाला मूळपुरूष म्हणतात .त्यालाच समर्थ थोरला देव
म्हणतात . दशक समास मध्ये श्रोते प्रश्न विचारतात ,
देव कोणासी म्हणावेकैसे तयासी जाणावे
समर्थ उत्तर देतात ,
जेणे केले चराचरकेले स्रुष्ट्यादि व्यापारसर्व कर्ता निरंतरनाम ज्याचे । । - -१७ । ।
ज्याने सर्व जग निर्माण केले ,दृश्य विश्वाचे सर्व व्यापार जो नियंत्रित करतो तो देव .ज्याने मेघमाला निर्माण
केल्या , चंद्राच्या चांदण्यात अमृत घातले ,रविमंलाला तेज दिले ,ज्याने सागराला मर्यादा घालून
दिली ,शेषाला पृथ्वी चा भार सांभाळण्यासाठी नेमणूक करून दिली तो थोरला देव .चार खाणी-स्वेदज ,
उद्भिज ,अण्डज,जारज ,चार वाणी -परा ,पश्यंती ,मध्यमा ,वैखरी ,चौ-यांक्षी लक्ष जीवयोनी ,स्वर्ग ,मृत्यु ,पाताळ हे तीनही लोक ज्याने निर्माण केले तो देव .
ब्रह्मा विष्णू आणि हरहे जयाचे अवतारतोचि देव हां निर्धारनिश्चयेसी । । - -२१ । ।
समर्थ म्हणतात ,देव्हा-यातील देव खरा नव्हे ,कारण तो सर्व जीवप्राणी निर्माण करू शकत नाही .जागोजागी माणसाने बनवलेले खूप देव आहेत पण त्यांच्या पैकी कोणीही पृथ्वी बनवलेली नाही,किंवा चंद्र ,सूर्य ,तारका बनवलेल्या नाहीत .
मग देव कोण हे सांगताना समर्थ म्हणतात ,
सर्व कर्ता तोचि देवपाहो जाता निरावेवज्याची कळा लीळा लाघवनेणती ब्रह्मादिक। । - -२४। ।


Friday, March 20, 2009

या नांव ज्ञान


शुध्द ज्ञान
तरी ते कैसे आहे ज्ञानसमाधानाचे लक्षणऐसे हे विशद करूनमज निरोपावे । । - -३८ दशक समास मध्ये बहुधाज्ञान निरूपण समासात चौदा विद्या ,चौसष्ट कला सगळ्या सिध्दी काहीही ज्ञान नाही असे सांगितले .म्हणून ३८ व्या शिष्य विचारतो की ते ज्ञान काय आहे ते मला सांगा . दशक समास मध्ये समर्थ म्हणतात ,
ऐक ज्ञानाचे लक्षणज्ञान म्हणजे आत्मज्ञानपहावे आपणासि आपणया नाव ज्ञान । । - - । । ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ,म्हणजे मी कोण याचे ज्ञान .त्यासाठी आपले आपण आपल्याला पहायला हवे मी कशाचा बनलो आहे याचा शोध घेतला तर हे बाह्य शरीर पंचभूतांचे बनले आहे .पृथ्वी ,आप ,तेज ,
वायु
,आकाश या पंमहाभूतां ! मग ही पंचमहाभूते म्हणजे मी आहे का असा प्रश्न पडतो .
पृथ्वी हे आपल्या शरीरातील तत्व दाखवते कठीणपणा ! आपल्या शरीरात ते हाडे,मांस ,त्वचा ,
नाडी
,रोम या स्वरूपात असते .पण या तत्वाला स्वतंत्र जाणीव नसते ,स्वतंत्र अस्तित्व नसते .त्यामुळे पृथ्वी तत्व माझ खर रूप नाही
आपल्या
शरीरात रक्त ,लाळ,रेत ,मूत्र ,घाम या रूपात आप तत्व असते .आपल्या शरीरात रूधिराभिसरण सतत चालू असते .परंतु आप तत्वाला स्वतंत्र जाणीव नसते .स्वतंत्र अस्तित्व नसते .त्यामुळे आप तत्व म्हणजे मी नाही .
तेज
तत्व आपल्या शरीरात भूक ,तहान ,आळस,झोप ,मैथुन या स्वरूपात असते .परंतु या सर्व मनाच्या कल्पना आहेत .त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही .म्हणून तेज तत्व म्हणजे मी नाही .
वायु
तत्व आपल्या शरीरात घडणारे चलन ,वलन,प्रसारण ,निरोध ,आकुंचन या स्वरूपात असते .पण ते जडच असते ,त्यामुळे ते तत्व म्हणजे मी नाही .
आकाश
तत्त्व आपल्या शरीरात असलेल्या पोकळी च्या रूपात असते .त्यामुळेच आपल्या अं:करणात काम , क्रोध ,शोक ,मोह ,भय या रूपात वृतीचे तरंग असतात .शरीरातील पोकळी मुळे रक्त प्रवाह चालू रहातो ,वायु ची देवाण घेवाण चालू रहाते.तरी सुध्दा आकाशाला ही जडत्व असते .कारण पाचही तत्त्व एकत्र मिसळलेली असतात .त्यामुळे हे पंचभूतिक शरीर जड़ आहे नाशिवंत आहे .म्हणजे वायु तत्व मी नाही
म्हणजे
हे स्थूल शरीर म्हणजे मी नाही . गूद ,शिश्न ,हात ,पाय,वाणी ही आपली कर्मेंद्रिये ,नाक ,जीभ ,कान ,डोळे,त्वचा ही ज्ञानेंद्रिये सुध्दा पंचभूतिक आहेत ,जड़ आहेत .नाशिवंत आहेत म्हणजे कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये म्हणजे मी नाही .यापैकी एखाद्या इन्द्रियात कमतरता आली तरी माणूस जिवंत राहू
शकतो .म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिये म्हणजे मी नाही .म्हणजे स्थूल देह म्हणजे मी नाही .
पिंडा चे चार देह आहेत -स्थूल ,सूक्ष्म,कारण ,महाकारण .
यापैकी
स्थूल देह म्हणजे मी नाही हे पाहिल .
आता
सूक्ष्म देह म्हणजे मी आहे का बघू . सूक्ष्म देह हा वासनात्मक असतो किंवा वायु स्वरुप
असतो
.सूक्ष्म शरीर विचारांचा तरंग असतो .प्रथम माणसाच्या मनात कोणताही विचार येतो तेव्हा त्याला अं:करण किंवा संकल्प म्हणतात .संकल्प पुरा होइल की नाही असा विचार येतो त्याला विकल्प म्हणतात .संकल्प विकल्प मिळून मन तयार होते .संकल्प विकल्प करून एक निर्णय आपण घेतो .त्याला बुध्दी म्हणतात .घेतलेला निर्णय कृतित आणण्यासाठी योजना बनवतो .विचारांचे तरंग मनात उत्त्पन्न होतात .त्याला चित्त म्हणतात .प्रत्यक्षात कृती घडते तेव्हा अभिनिवेश निर्माण होतो त्याला अंहकार म्हणतात .
म्हणजे
सूक्ष्म देहाचे अंत :करण ,मन ,बुध्दी ,चित्त ,अंहकार असे भाग पडतात .पण अंत :करण पंचक हे विचारांचे तरंग आहेत ,मानासिक आहेत ,म्हणून अंत :करण पंचक म्हणजे मी नाही .म्हणून सूक्ष्म देह म्हणजे मी नाही.
वासना
अज्ञानाने असते ,अज्ञान असते म्हणून वासना आहे अज्ञान ही सुध्दा अवस्था आहे .अज्ञान रूपी कारण देह सुध्दा मी नाही .
ज्ञान ही सुध्द्दा अवस्थाच आहे ,ज्ञान रूपी महाकारण देह सुध्दा मी नाही .
मग
मी कोण ?
केनोपनिषदात म्हटले आहे ,
श्रोत्रस्य
श्रोत्रं मनसो मनो
यद्
वाचो वाचं प्राणस्य प्राण :।
क्षुश्श्च क्षु : अतिमुच्य धीरा :।
प्रत्यास्मा ल्लोकाद अमृता भवन्ति
म्हणजे आपल्या शरीरात असा काही आहे की जे कानांचा कान आहे ,जो ऐकतो आहे ,डोळ्यांचा डोळा आहे जो पाहतो आहे .वाचेची वाणी आहे ,मनाचे मन आहे हे सर्व करणारा कर्ता करावीता जो आहे तोच मी आहे .