Friday, January 22, 2010

श्रवण कसे करावे ?

श्रवण कसे करावे ?
आता श्रवण कैसे करावे कोण्या पंथास पहावे पुढील समासी आघवे सांगिजेल - -५०
श्रोते प्रश्न विचारतात ,श्रवण कसे करावे ?समर्थ दशक समास मध्ये उत्तर देतात :
आता श्रवण कैसे करावे तेहि सांगिजेल अवघे श्रोता सावधान द्यावे येकचित्ते - -
श्रवण कसे करावे हे नीट सांगतो .श्रोत्यांनी एकाग्र मनाने क्षपूर्वक ऐकावे :
येक वक्तृत्व श्रवणी पडे तेणे जाले समाधान मोडे केला निश्चय विघडे अकस्मात - -
ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे जेथे निश्चयाच्या नावे सुन्याकार - -
ज्या प्रवचनाने समाधान नाहीसे होते ,मनाने केलेला निश्चय मोडतो ,ते भ्रमात्मक ,हानिकारक वक्तृत्व
सोडून द्यावे ,कारण त्यात निश्चयाचा अभाव असतो .
मग श्रवण कोणते करावे ?
जेथे संशय तुटती होये आशंका निवृत्ती अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे - -
ज्या ग्रंथाने संशय नाहीसे होतात ,शंका निरसन होतात ,ते परमार्थ ग्रंथ श्रवण करावे .मोक्ष ज्यांना मिळवायाचा आहे त्यांच्या मनात अद्वैत ग्रंथाबद्दल प्रेम निर्माण होते ,त्याने अद्वैत ग्रंथातील आत्मानात्म विवेकाचा अभ्यास करायला हवा .
ज्याला ज्याची आवड असते त्याच्या समोर तेच ठेवल्यास आनंदाची प्राप्ती होते .
तैसा जो आत्मज्ञानी नर तयासी नावडे इतर तेथे पाहिजे सारासार विचारणा ते - -१२
आत्मज्ञानी माणसाला आत्मानात्म विचारानी भरलेले ग्रंथ आवडतात .इतर दुसरे काही चालत नाही .हे स्पष्ट करण्यासाठी समर्थांनी उदाहरणे दिली आहेत .
योगियांपुढे राहाण परीक्षवंतापुढे पाषाण पंडीतांपुढे डफगाण शोभा पवे - -१९
योग्या समोर भुताटकीचे प्रयोग केले ,विद्वानांसमोर तमाशातले गाणे म्हटले ,रत्नपारखी जवाहि-या समोर रत्ना ऐवजी दगड ठेवला तर शोभत नाही .
ब्रह्मचर्या पुढे नाचणी रासक्रीडा निरुपणी राजहंसापुढे पाणी ठेविले जैसे - -२१
ब्रह्मचा-या समोर नाचणारी कलावंतीण उभी केली ,निर्गुण निर्विकार ब्रह्मस्वरूपाच्या निरुपणात शृंगारप्रधान
रासक्रीडा सांगण्यास आरंभ केला ,राजहंसा समोर नुसते पाणी ठेवणे शोभत नाही .
तैसे पारमार्थिक जन तयास नस्ता आत्मज्ञान ग्रंथ वाचता समाधान होणार नाही - -२५
त्याप्रमाणे ज्यांना खरी परमार्थाची आवड आहे ,अशा साधक वृत्ती च्या माणसांना आत्मज्ञान पसंत पडते .ते ज्या ग्रंथात नसते त्यांना तो ग्रंथ वाचून समाधान होत नाही .म्हणून अद्वैत ग्रंथाचे श्रवण करावे .
अद्वैत ग्रंथ कोणाला म्हणतात ?
जेणे परमार्थ वाढे आंगी अनुताप चढे भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ - -३०
जो ऐकताच गर्व ले कां ते भ्रांतीच मावले नातरी येकसरे वोलेमन भगवंती । । - -३१ । ।
जेणे होये उपरतीअवगुण पालटतीजेणे चुके अधोगतीत्या नाव ग्रंथ । । - -३२ । ।
जेणे धारिष्टया चढेजेणे परोपकार घडेजेणे विषय वासना मोडेत्या नाव ग्रंथ। । - -३३ । ।
जो ग्रंथ वाचला असता साधकाचा परमार्थ वाढतो ,अनुताप उत्पन्न होतो ,मन शुध्द होते ,भक्तीची साधना करावी असे मनापासून वाटते ,तो अद्वैत ग्रंथ !
जो ग्रंथ वाचला ,ऐकला तर अभिमान नाहीसा होतो ,मन भगवंताकडे जाते तो ग्रंथ !ज्याच्या श्रवणाने माणसाला विरक्ती प्राप्त होते ,त्याचे दोष सुधारतात ,अधोगती होत नाही तो ग्रंथ ! ज्या ग्रंथाच्या वाचनाने देहातून सुख घेण्याची प्रवृत्ती मरते तोच खरा ग्रंथ !
ज्याच्या वाचनाने माणसाला परमार्थ साधना समजते ,ज्याच्या नित्य सहवासाने साधकाला आत्मज्ञान प्राप्त
होते ,माणूस कृतकृत्य होतो तो ग्रंथ !माणसाला आत्मज्ञाना पर्यंत पोचाविण्याची शक्ती असलेला तोच
खरा ग्रंथ !तोच श्रवणास योग्य !
म्हणोनी नित्यानित्यविचारजेथे बोलिला सारासारतोचि ग्रंथ पैलपारपाववि विवेके । । - -६० । । ज्या ग्रंथात शाश्वत काय ,अशाश्वत काय याचे विवेचन असते ,सार कोणते ,असार कोणते हे सांगितलेले
असते ,अशा ग्रंथाचे परिशीलन विवेक निर्माण करते माणूस आत्मज्ञाना पर्यंत पोहोचतो .

अभ्यास करावा कवण ?

अभ्यास करावा कवणऐसा श्रोता करी प्रश्नपरमार्थाचे साधनबोलिले पाहिजे । । - -७३ । ।
परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी अभ्यास कसा करावा असा प्रश्न श्रोता विचारतो .या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी पुढील समासात म्हणजे दशक समास मध्ये दिले आहे .समर्थ म्हणतात :
ऐका परमार्थाचे साधनजेणे होय समाधानते तू जाण गा श्रवणनिश्चयेसी । । - - । ।
समर्थांनी परमार्थाचे सर्वात पाहिले साधन श्रवण सांगितले आहे .श्रवण हा शब्द समर्थ व्यापक पणे
वापरतात .श्रावणात मनन निदिध्यास अंतर्भूत आहे .ज्ञान ,भक्ती ,योग ,शक्तीमार्ग यात मनाची एकाग्रता होऊन ध्यानावस्था साधावी लागते .त्यासाठी मनाची एकाग्रता सहज प्राप्त होत नाही .ती श्रवणाने प्राप्त होते .
श्रवणाने मनावर ध्येयाचे संस्कार होतात .मननाने श्रवणा झालेला संस्कार खोलवर रुजून मनात खूप काळ घोळवता येतो .
श्रवणाने परमार्थास आवश्यक असणा-या पाच गोष्टी - संशय दूर होणे दृश्याची आसक्ती कमी होणे
भगवंत हवा असे वाटणे प्रतिभा जागी होणे मनाची एकाग्रता होणे ,या पाचही गोष्टी अनायासे साधतात .
श्रवण का करायचे ?
श्रवणाने भक्ती निर्माण होते ,विरक्ती उत्पन्न होते दृश्याची आसक्ती सुटते ,चित्त शुध्दी घडते ,बुध्दी स्थिर
होते ,अभिमानाची उपाधी नाहीशी होते .श्रवणाने निश्चय घडतो ,ममता -माझेपणा नाहीसा होतो ,अंतरी समाधानाची प्राप्ती होते ,शंका -कुशंका नाहिशा होतात ,संशय नाहीसा होतो ,अंतरंगातील दोष नाहीसे होतात ,मन आवरता येते ,समाधान पावते ,,समाधान पावते ,देह्बुध्दीचे बंधन नाश पावते ,मीपण नाहीसे होते ,अनेक संकटे नाश पावतात , कार्य सिध्दीस जाते .श्रवणाने समाधी साध्य होते ,संपूर्ण समाधानाच्या प्रप्तीची पूर्वतयारी होते .
सतसंगतीत श्रवण केले तर आत्मानात्मविवेक समजायला लागतो ,मन तदाकार होते ,ज्ञान वाढते , बुध्दीचा उत्कर्ष होतो , इंद्रियातून सुख घेण्याची ओढ कमी होते ,ब्रह्मविचार समजायला लागतो ,ज्ञानशक्ती वाढते , मन सूक्ष्म होऊ लागते ,आत्मविचाराचे आकलन होते आत्मदर्शन होते .श्रवणाने प्रपंचात परमार्थात जीवन
चालते .श्रवण केल्याशिवाय काय करावे कसे करावे हे कळत नाही .
श्रवण केले नाही तर काय होईल ?
सूर्य उगवला नाही तर सर्वत्र अंधार पसरतो ,तसे श्रवण घडले नाही तर मानवी जीवनात अज्ञानाचा अंधार
पसरतो .नवविधा भक्ती ,मुक्ती सहजस्थिती श्रवणाशिवाय कळत नाही .अध्ययन ,अध्यापन ,यजन याजन ,
दान ,प्रतिग्रह या सहा कर्मांचे आचरण कसे करायचे ते श्रवणाशिवाय कळत नाही .
श्रवणाने देह्बुध्दी मरते .
आपण जे श्रवण करतो त्याच्या अर्थाकडे क्ष देणे म्हणजे मनन