अभ्यास करावा कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न । परमार्थाचे साधन । बोलिले पाहिजे । । ७ -७ -७३ । ।
परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी अभ्यास कसा करावा असा प्रश्न श्रोता विचारतो .या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी पुढील समासात म्हणजे दशक ७ समास ८ मध्ये दिले आहे .समर्थ म्हणतात :
ऐका परमार्थाचे साधन । जेणे होय समाधान । ते तू जाण गा श्रवण । निश्चयेसी । । ७ -८ -१ । ।
समर्थांनी परमार्थाचे सर्वात पाहिले साधन श्रवण सांगितले आहे .श्रवण हा शब्द समर्थ व्यापक पणे
वापरतात .श्रावणात मनन व निदिध्यास अंतर्भूत आहे .ज्ञान ,भक्ती ,योग ,शक्तीमार्ग यात मनाची एकाग्रता होऊन ध्यानावस्था साधावी लागते .त्यासाठी मनाची एकाग्रता सहज प्राप्त होत नाही .ती श्रवणाने प्राप्त होते .
श्रवणाने मनावर ध्येयाचे संस्कार होतात .मननाने श्रवणात झालेला संस्कार खोलवर रुजून मनात खूप काळ घोळवता येतो .
श्रवणाने परमार्थास आवश्यक असणा-या पाच गोष्टी - १ संशय दूर होणे २ दृश्याची आसक्ती कमी होणे
३ भगवंत हवा असे वाटणे ४ प्रतिभा जागी होणे ५ मनाची एकाग्रता होणे ,या पाचही गोष्टी अनायासे साधतात .
श्रवण का करायचे ?
श्रवणाने भक्ती निर्माण होते ,विरक्ती उत्पन्न होते दृश्याची आसक्ती सुटते ,चित्त शुध्दी घडते ,बुध्दी स्थिर
होते ,अभिमानाची उपाधी नाहीशी होते .श्रवणाने निश्चय घडतो ,ममता -माझेपणा नाहीसा होतो ,अंतरी समाधानाची प्राप्ती होते ,शंका -कुशंका नाहिशा होतात ,संशय नाहीसा होतो ,अंतरंगातील दोष नाहीसे होतात ,मन आवरता येते ,समाधान पावते ,,समाधान पावते ,देह्बुध्दीचे बंधन नाश पावते ,मीपण नाहीसे होते ,अनेक संकटे नाश पावतात , कार्य सिध्दीस जाते .श्रवणाने समाधी साध्य होते ,संपूर्ण समाधानाच्या प्रप्तीची पूर्वतयारी होते .
सतसंगतीत श्रवण केले तर आत्मानात्मविवेक समजायला लागतो ,मन तदाकार होते ,ज्ञान वाढते , बुध्दीचा उत्कर्ष होतो , इंद्रियातून सुख घेण्याची ओढ कमी होते ,ब्रह्मविचार समजायला लागतो ,ज्ञानशक्ती वाढते , मन सूक्ष्म होऊ लागते ,आत्मविचाराचे आकलन होते व आत्मदर्शन होते .श्रवणाने प्रपंचात व परमार्थात जीवन
चालते .श्रवण केल्याशिवाय काय करावे व कसे करावे हे कळत नाही .
श्रवण केले नाही तर काय होईल ?
सूर्य उगवला नाही तर सर्वत्र अंधार पसरतो ,तसे श्रवण घडले नाही तर मानवी जीवनात अज्ञानाचा अंधार
पसरतो .नवविधा भक्ती ,मुक्ती सहजस्थिती श्रवणाशिवाय कळत नाही .अध्ययन ,अध्यापन ,यजन याजन ,
दान ,प्रतिग्रह या सहा कर्मांचे आचरण कसे करायचे ते श्रवणाशिवाय कळत नाही .
श्रवणाने देह्बुध्दी मरते .
आपण जे श्रवण करतो त्याच्या अर्थाकडे लक्ष देणे म्हणजे मनन
Friday, January 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment