चत्वार मुक्ती
आत्मनिवेदन भक्ती सांगितल्यावर समर्थांनी या भक्तींचे फळ म्हणजे चार मुक्ती सांगितल्या आहेत .१ सलोकता
२ समीपता ३ सरूपता ४ सायुज्यता .
आत्मनिवेदन भक्तीत शेवटी समर्थ म्हणतात ,
ऐसी हे नवविधा भक्ती । केल्या पाविजे सायोज्यमुक्ती । सायोज्यमुक्तीस कल्पांती। चळण नाही । । ४ -९ -२६ । ।
नवविधा भक्तीचे आचरण केले तर सायोज्य मुक्ती लय पावत नाही .वेद व शास्त्रांनी चार मुक्तींचे वर्णन केले आहे मुक्तींचे वर्णन करण्यापूर्वी मुक्ती म्हणजे काय ते पहायला हवे .मोक्षयती दु:ख़म अनेन इति मुक्ती: । सर्व प्रकारच्या दु:खापासून बंधनापासून ,वासनांपासून ,अज्ञानापासून सुटण्याची ,मोकळे होण्याची अवस्था म्हणजे मुक्ती !
दशक ४ समास १० मध्ये समर्थांनी चारही मुक्तींच्या व्याख्या केल्या आहेत .
येथे ज्या देवाचे भजन करावे । तेथे ते देवलोकी रहावे । स्वलोकता मुक्तीचे जाणावे। लक्षण ऐसे । ।
४ -१० -२३ । ।
लोकी रहावे ते स्वलोकता । समीप असावे ते समीपता । स्वरूपचि व्हावे ते स्वरूपता।तिसरी भक्ती।।
४ -१० -२४। ।
देवस्वरुप झाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही । स्वरूपतेचे लक्षण पाही । ऐसे असे । । ४ -१० -२५ । ।
सुकृत आहे तो भोगिती । सुकृत सरताच ढकलून देती । जैसे तैसे । । ४ - १० -२६ । ।
ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाच्या लोकात रहायला मिळणे याला सलोकता मुक्ती म्हणतात .देवाच्या जवळ रहायला मिळणे याला समीपता मुक्ती म्हणतात .देवाच्या रूपा सारखे रूप मिळणे याला सरूपता मुक्ती म्हणतात.पण जेव्हा पुण्य संपते तेव्हा त्या लोकातून ,देवाच्या जवळून खाली मृत्युलोकात यावे लागते .त्यामुळे या
तीनही मुक्ती नाशिवंत आहेत .तर शेवटची मुक्ती सायोज्यता मुक्ती .आत्मनिवेदन भक्तीत मी चे समर्पण असते .तेव्हा जीव व शिवाची ऐक्यता असते .भक्ताचा विभक्तपणा संपतो .साधक भगवंताशी समरस झाला मीपणा ने तो वेगळा होऊ शकत नाही .तेव्हा संसारात समाजात असून तो नसल्या सारखा असतो ।
जीवनातल्या सुखदु :खांची मजसी का बाधा ?जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही समिधा । अशी अलिप्त पणाची अवस्था असते .तुकाराम महाराज म्हणतात -तुका म्हणे उरलो उपकारापुरता ।
दशक ११ समास १ मध्ये समर्थ म्हणतात ,
निर्गुणी जे अनन्यता । तेचि मुक्ती सायोज्यता । लक्षांश वाच्यांश आता । पुरे झाला । । ११ -१ -४२। ।
निर्गुणाशी अनन्यता होणे म्हणजे सायोज्य मुक्ती .श्रवणाने बुध्दीमध्ये स्वरूपाबद्दल निश्चय होणे व ती टिकवणे म्हणजे सायोज्यमुक्ती .
२ समीपता ३ सरूपता ४ सायुज्यता .
आत्मनिवेदन भक्तीत शेवटी समर्थ म्हणतात ,
ऐसी हे नवविधा भक्ती । केल्या पाविजे सायोज्यमुक्ती । सायोज्यमुक्तीस कल्पांती। चळण नाही । । ४ -९ -२६ । ।
नवविधा भक्तीचे आचरण केले तर सायोज्य मुक्ती लय पावत नाही .वेद व शास्त्रांनी चार मुक्तींचे वर्णन केले आहे मुक्तींचे वर्णन करण्यापूर्वी मुक्ती म्हणजे काय ते पहायला हवे .मोक्षयती दु:ख़म अनेन इति मुक्ती: । सर्व प्रकारच्या दु:खापासून बंधनापासून ,वासनांपासून ,अज्ञानापासून सुटण्याची ,मोकळे होण्याची अवस्था म्हणजे मुक्ती !
दशक ४ समास १० मध्ये समर्थांनी चारही मुक्तींच्या व्याख्या केल्या आहेत .
येथे ज्या देवाचे भजन करावे । तेथे ते देवलोकी रहावे । स्वलोकता मुक्तीचे जाणावे। लक्षण ऐसे । ।
४ -१० -२३ । ।
लोकी रहावे ते स्वलोकता । समीप असावे ते समीपता । स्वरूपचि व्हावे ते स्वरूपता।तिसरी भक्ती।।
४ -१० -२४। ।
देवस्वरुप झाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही । स्वरूपतेचे लक्षण पाही । ऐसे असे । । ४ -१० -२५ । ।
सुकृत आहे तो भोगिती । सुकृत सरताच ढकलून देती । जैसे तैसे । । ४ - १० -२६ । ।
ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाच्या लोकात रहायला मिळणे याला सलोकता मुक्ती म्हणतात .देवाच्या जवळ रहायला मिळणे याला समीपता मुक्ती म्हणतात .देवाच्या रूपा सारखे रूप मिळणे याला सरूपता मुक्ती म्हणतात.पण जेव्हा पुण्य संपते तेव्हा त्या लोकातून ,देवाच्या जवळून खाली मृत्युलोकात यावे लागते .त्यामुळे या
तीनही मुक्ती नाशिवंत आहेत .तर शेवटची मुक्ती सायोज्यता मुक्ती .आत्मनिवेदन भक्तीत मी चे समर्पण असते .तेव्हा जीव व शिवाची ऐक्यता असते .भक्ताचा विभक्तपणा संपतो .साधक भगवंताशी समरस झाला मीपणा ने तो वेगळा होऊ शकत नाही .तेव्हा संसारात समाजात असून तो नसल्या सारखा असतो ।
जीवनातल्या सुखदु :खांची मजसी का बाधा ?जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही समिधा । अशी अलिप्त पणाची अवस्था असते .तुकाराम महाराज म्हणतात -तुका म्हणे उरलो उपकारापुरता ।
दशक ११ समास १ मध्ये समर्थ म्हणतात ,
निर्गुणी जे अनन्यता । तेचि मुक्ती सायोज्यता । लक्षांश वाच्यांश आता । पुरे झाला । । ११ -१ -४२। ।
निर्गुणाशी अनन्यता होणे म्हणजे सायोज्य मुक्ती .श्रवणाने बुध्दीमध्ये स्वरूपाबद्दल निश्चय होणे व ती टिकवणे म्हणजे सायोज्यमुक्ती .
No comments:
Post a Comment