Friday, April 1, 2011

पंचीकरण

पंचीकरण म्हणजे काय ?

पंचीकरण म्हणजे तत्वांचा निरास .आपले शरीर ८२ तत्वाचे बनलेले आहे .यातील प्रत्येक तत्व म्हणजे मी नाही असे सिद्ध करणे म्हणजे त्या तत्वांचा निरास करणे .तत्वांचा निरास झाला की

तत्वांचे गाठोडे शरीर |याचा पाहातां विचार | येक आत्मा निरंतर | आपण नाही || ६-२-३३ ||

तत्वांचे गाठोडे म्हणजे आपण स्वत;चे खरे अस्तित्व समजतो .पण ही तत्वे नश्वर आहेत .ती तत्वे म्हणजे मी नाही, आत्मा मी आहे हे पटणे म्हणजे पंचीकरण !

आपली ज्ञानेंद्रिये ५ : त्वचा ,कान नाक , जीभ ,आणि डोळे . कर्मेंद्रिये ५ : हात ,पाय ,गुद ,जननेद्रीय ,वाणी ,ही आहेत .यातील प्रत्येक ईंद्रीयाचा विचार केला तर ते ईंद्रीय म्हणजे मी नाही असे म्हणता येईल कारण यातील कोणत्याही ईंद्रिया मध्ये वैगुण्य असेल तरी माणूस जगू शकतो .उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की कानाने कमी ऐकू आले ,डोळ्यांनी दिसले नाही ,हात तुटला ,पाय तुटला तरी माणूस मारत नाही .नवीन डोळा बसवता येतो .याचा अर्थ चर्मचक्षुनी आपण बघत नाही ..बघणारा वेगळा आहे .ऐकणारा वेगळा आहे .म्हणजे ज्ञानेंद्रिय ,कर्मेंद्रिय म्हणजे मी नाही .

आपला हा स्थूल देह पंचमहाभूतांचा बनला आहे .मग ही पंचमहाभूते म्हणजे मी आहे का असा विचार केला तर कळते की आपले शरीर जड आहे .जडत्व आपल्या शरीरातले पृथ्वी तत्व आहे :.हाड ,मांस ,त्वचा ,रोम ,नाडी या सर्वांना आकार आहे ,वजन आहे ,म्हणजे ह्या सर्व गोष्टी माझ्यातले पृथ्वी तत्व आहे .पण या कुणालाच स्वतंत्र अस्तित्व नाही .चेतना नाही .म्हणजे शरीरातले पृथ्वी तत्व म्हणजे मी नाही .

शरीरातली रक्त ,लाळ ,मूत्र ,घाम रेत हे आप तत्व आहे .पण आप तत्वाला स्वतंत्र अस्तित्व नाही .म्हणून आप तत्व माझे रूप नाही .

शरीरातील भूक ,तहान ,आळस झोप ,मैथून हे तेज तत्व आहे .पण तेज तत्व माझे खरे रूप नाही .त्या तत्वाची स्वतंत्र चेतना नाही .

शरीरातील चलन ,वळण ,प्रसारण ,निरोध ,आकुंचन हे वायू तत्व आहे वायू सूक्ष्म असला तरी त्याला जडत्व आहे .त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही ,जाणीव नाही ,म्हणून वायू माझे खरे रूप नाही .

शरीरात असलेली पोकळी म्हणजे आकाश् तत्व आहे या आकाश तत्वाने शरीरातील रक्ताभिसरण होते .काम ,क्रोध ,शोक ,मोह भयं या वृत्ती चे तरंग अंत:करणात उमटतात .पण या आकाश तत्वाला स्वतंत्र अस्तित्व नाही .,चेतना नाही ,जाणीव नाही .म्हणजे आकाश तत्व म्हणजे मी नाही .

५ ज्ञानेद्रीय व ५ कर्मेंद्रिय या द्वारे शब्द ,स्पर्श रूप ,रस गंध हे पाच विषय माणसाला शरीर व जग यांच्याशी जोडतात .हे पाच विषय सतत बदलतात जस जसे आपण मोठे होतो तसे विषय बदलतात .म्हणजे हे विषयही आपले खरे रूप नसतात .

अशा प्रकारे हे विषय म्हणजे मी नाही असे दाखवणे म्हणजे पंचीकरण !

1 comment:

Suneel123 said...

धन्यवाद.