
सर्व देहांच्या अंतर्यामी राहणारा ,वास करणारा अंतरात्मा म्हणजे देव .तो निर्गुण ,सुख दु:खाचा स्पर्श
न होणारा ,साक्षीपणे पाहणारा ,असा आहे .जेव्हा तो देहात रहायला येतो ,तेव्हा ,समर्थ म्हणतात :
देह देउळामध्ये बैसला | न भजता मारितो देहाला | म्हणौनि त्याच्या भेणे तयाला | भजती लोक ||१७-१-६ ||
जे वेळेसी भजन चुकले |तें तें तेव्हा पछ्याडीले | आवडीने भजू लागले | सकळ लोक ||१७-१-७ ||
जे जे जेव्हा आक्षेपिले | ते ते तत्काळचि दिधले | त्रैलोक्य भजों लागले | येणे प्रकारे ||१७-१-८ ||
पाचा विषयांचा नैवेद्य | जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध | ऐसे न करितां सद्य \ रोग होती ||१७-१-९ ||
जेणे काळे नैवेद्य पावेना | तेणे काळे देव राहेना | भाग्य वैभव पदार्थ नाना | सांडून जाते ||१७-१-१० ||
देहात रहायला आल्यावर देहाच्या सहवासाने मूळचा संगरहित असलेला आत्मा संगसहित बनतो । पांच विषयांचा नैवेद्य ग्रहण करून पांच विषयांचा नैवेद्य ग्रहण करून तो सुख भोगतो ।पांच विषयांचा नैवेद्य मिळाला नाही तर दु:ख भोगतो ।म्हणजे संगरहित असलेला अंतरात्मा संगसहित बनतो ।सुख दु:खे
त्याला जबरदस्तीने भोगावी लागतात .हाच देवावर झालेला बलात्कार आहे असे समर्थ या समासात समजावून सांगतात म्हणून समर्थांनी ह्या समासाला ‘ देव बलात्कार ‘असे नाव दिले आहे .
No comments:
Post a Comment