पंचभूते गेल्यावर काय उरते ?
पंचभूते चाले जग |पंचभूतांची लगबग | पंचभूते गेलिया मग |काय आहे ||१६-१०-१ ||
श्रोता वक्तयास बोले | भूताचे महिमे वाढविले | आणि त्रिगुण कोठे गेले | सांगा स्वामी ||१६-१०-२ ||
श्रोता विचारतो ,पंचभूते विकारी आहेत .ती गेल्यावर काय शिल्लक राहते ? त्रिगुण कोठे गेले ?
अशी शंका विचारल्यावर. समर्थ उत्तर देतात :
अंतरात्मा पाचवे भूत | त्रिगुण त्याचे अंगभूत |सावध करूनिया चित्त |बरे पाहें ||१६-१०-३ ||
स्वामी समर्थ सांगतात की अंतरात्म्याला पाचवे भूत समजावे .त्यातच त्रिगुण असतात .अंतरात्म्या पासून
वायू झाला .वायू पासून अग्नी प्रगट झाला .अग्नी पासून पाणी ,पाणी अळून पृथ्वी झाली .
पंचाभूतांमध्ये समतोल कसा राखला जातो ?
जीवन आवघे डबाबिले | ते रविमंडळे आळले | वन्ही वायोचेनि जाले | भूमंडळ || १६-१०-७ ||
वन्ही वायो रवी नस्तां |तरी होते उदंड सीतळता |ते सीतळते मध्ये उष्णता | येणे न्याये ||१६-१०-८ ||
आवघे सीतळचि असते |तरी प्राणी मात्र मरोन जाते | आवघ्या उष्णेचि करपते | सकळ काही ||१६-१०-१०||
भूमंडळ आळोन गोठले | ते रविकिर्णे वाळोन गेले | मग सहजची देवे रचिले | उपायासी ||१६-१०-११ ||
म्हणोनि केला पर्जन्य काळ |थंड जाले भूमंडळ |पुढे उष्ण काही सीतळ | सीतकाळ जाणावा ||१६-१०-१२ ||
सीतकाळे कष्टले लोक | कर्पोन गेले वृक्षादिक | म्हणोन पुढे कौतुक |उष्म काळाचे ||१६-१०-१३ ||
त्याही मध्ये प्रात:काळ |माध्यान्हकाळ सायंकाळ |सीतकाळ उष्णकाळ |निर्माण केले ||१६-१०-१४ ||
जिकडे तिकडे पसरलेले पाणी सूर्याच्या उष्णतेने घट्ट झाले .व पृथ्वी तयार झाली . वायू ,अग्नी ,
सूर्य नसते तर पृथ्वी थंड राहिली असती .म्हणून सूर्याने उष्णता निर्माण केली .अग्नीने निर्माण
केलेली उष्णता पाण्यात सौम्य होते ..पाण्याने निर्माण केलेला गारठा सूर्य सौम्य करतो .त्यामुळेच
जिवंत पिंड तयार होतो .नुसता गारठा असता प्राणी जीबंत राहिले नसते .नुसती उष्णता असती
तर पृथ्वी शुष्क झाली असती .म्हणून पावसाळा निर्माण केला .थंडीने लोकांना कष्ट होतात
म्हणून उन्हाळा निर्माण केला .रोज सकाळ ,दुपार ,संध्याकाळ असे थंड ,गरम ,थंड असे काळ
निर्माण झाले ।जेव्हा कल्पांत होतो तेव्हा पंचमहाभूते अंतरात्म्यात विलीन होतात .
No comments:
Post a Comment