करंटा भाग्यवान कसा बनतो ?
करंटा भाग्यवान कसा बनेल ते सांगताना समर्थ म्हणतात :
कांही नेमकपण आपुले | बहुत जनास कळो आले | तेचि मनुष्य मान्य जाले |भूमंडळा|| १९-३-२३ ||
झिजल्यावाचून कीर्ती कैची | मान्यता नव्हे की फुकाची | जिकडे तिकडे होते ची ची | अवलक्षणें ||१९-३-२४ ||
भल्याची संगत धरीना | आपणासी शहाणे करीना | तों आपलाची वैरी जाणा |स्वहित नेणे || १९-३-२५ ||
जेथे नाही उत्तम गुण | ते करंटपणाचे लक्षण | बहुतांसी न माने ते अवलक्षण |सहजची आले || १९-३-२७ ||
तन मन धनाने झिजल्याशिवाय जगात कीर्ती मिळत नाही .ज्याच्या जवळ कुलक्षणें असतात त्याची सर्वत्र छी थू होते .जो माणूस चांगल्याची संगत धरत नाही तो स्वत:ला शहाणा करत नाही .जो स्वत:चे हित जाणत नाही तो स्वत:चा वैरी होतो .ज्याच्या जवळ एकही उत्तम गुण नाही तो करंटा समजावा .तो पुष्कळांना आवडत नाही .तेच त्याचे कुलक्षण समजावे .
याकारणे अवगुण त्यागावे | उत्तम गुण समजोन घ्यावे | तेणे मनासारखे फावे |सकळ काही ||१९-३-३० ||
म्हणून करंट्याने आपले अवगुण त्यागावे .उत्तम गुण समजून अभ्यासावे .म्हणजे सर्व काही मनासारखे होते .
No comments:
Post a Comment