Wednesday, December 31, 2008

नवविधा भक्ती

नवविधा भक्ती च्या नऊ पाय-या
श्रवण
भक्तिमार्ग आचरणात कसा आणायचा असे शिष्यांनी विचारले ,
कैसे करावे भगवद भजन कोठे ठेवावे हे मन
भगवद भजनाचे लक्षण मज निरोपावे -१० -७२ शिष्याने सद्गदित होउन ,समर्थांचे चरण घट्ट धरून प्रश्न विचारला .समर्थ मनापासून प्रसन्न झाले ,त्यांनी सांगायला सुरुवात केली
श्रवणं कीर्तनं विष्णो :स्मरणं पादसेवनम्अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम। ।
नवविधा भक्तीत श्रवण ही पहिली पायरी आहे ,तर आत्मनिवेदन ही शेवटची .श्रवण भक्तीमार्गाचे प्रवेशद्वार आहे.श्रवण शब्द्दाचा अर्थ ऐकणे आहे असे आपण म्हणतो ,पण श्रवण म्हणजे नुसते ऐकणे नाही तर ऐकलेले जीवनात उतरवणे.कौरव पांवांची एक गोष्ट आहे .कौरव पांडवांचे गुरु क्रुपाचार्यांनी मुलांना एक धडा दिला -नेहमी
खरे बोलावे क्रोध करू नये .दुसा -या दिवशी कृपाचा-यांनी मुलांना विचारले ,मुलांनो काल काय शिकलात ?'
मुलांनी दोन्ही वाक़ये पाठ म्हणून दाखवली .युधिष्ठीराने सांगितले ,'माझी दोन्ही वाक़ये पाठ झाली नाहीत .'१० -१२
दिवसाने युधिष्ठीराने पुन्हा तेच उत्तर दिले तेव्हा कृपाचा-यांना काळजी वाटू लागली .त्यांनी भिष्माचा-यांना सांगितले .युधिष्टीर भीष्माचा -यांना म्हणाला .'गेल्या १० -१२ दिवसात मी नेहमी खरे बोललो .त्यामुळे ते वाक्य पाठ झाल्यासारखे आहे .पण क्रोध करू नये हे वाक्य पाठ होत नाही .कारण काहीतरी कारणांनी राग येतोच.भीष्मांना आनंद झाला .आपल्या नातवाला ऐकणे श्रवण यातला फरक कळला
समर्थांनी परमार्थाचे मुख्य साधन श्रवण सांगितले आहे .श्रवण अनेक विषयांचे करायला सांगितले आहे -कर्ममार्ग
ज्ञानमार्ग ,सिध्दांतमार्ग ,योगमार्ग ,वैराग्य मार्ग ,नाना व्रते ,नाना तीर्थ ,नाना दाने ,नाना महात्मे ,योग ,मुद्रा ,आसने पिंड ज्ञान सृष्टीज्ञान ,संगीत ,चौदा विद्या ,चौष्ट कला ,या सर्व गोष्टी श्रवण करायला सांगतात .परमार्थ मार्गाला
लागणारा साधक चाळीसी पन्नासी नंतर लागला तर तो हे सर्व वाचू शकणार नाही ,मग समर्थांनी हे सर्व वाचायला
का सांगितल ? कारण समर्थांच्या पुढे त्यांचे कार्य पुढे नेणारा त्यांचा महंत होता .तो बहुश्रुतच असायला हवा होता त्याला लोकांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता यायला हवे .सामान्य साधक जेव्हा श्रवण करतो तेव्हा त्याला समर्थ मार्गदर्शन करतात
ऐसे हे अवघेची ऐकावेपरंतु सार शोधून घ्यावे असार ते जाणून त्यागावेया नाव श्रवण भक्ती । । - -२९ । ।
सार म्हणजे समर्थांनी सांगितलेली उत्तम लक्षणे,चातुर्य लक्षणे ,सदविद्या लक्षणे ,सत्वगुण लक्षणे ,सार घ्यायचे
म्हणजे वर सांगितलेले सद्गुण आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करणे ,असार जाणून टाकावे म्हणजे मूर्ख लक्षणे ,
पढ़त मूर्ख लक्षणे ,कुविद्या लक्षणे ,तमोगूण लक्षणे या समासातील दुर्गूण काढून टाकणे
श्रावणात केवळ ऐकणे नसते ,तर ऐकलेल्या गोष्टींचे मनन व्हावे लागते निदिध्यास ही
या नावे जाणावे मननअर्थालागी सावधान निजध्यासे समाधानहोत असे । । - -३९ । ।
मनन म्हणजे आपण जे ऐकतो त्याचे चिंतन करणे ,त्याचे अर्थाकडे क्ष देणे .निदिध्यास म्हणजे एखाद्या गोष्टीची
मनाला लागलेली ओढ़ .
श्रवण कसे करावे ?
श्रवण करावे बिरबलाच्या मूर्ती सारख! एकदा अकबराने तीन सारख्या मूर्ती आणल्या .सर्वात चांगली मूर्ती कोणती ते बिरबलाला शोधून काढायला सांगितल .त्या तीनही मूर्तींच्या कानात छिद्र होती .बिरबलाने तीनही मूर्तींच्या कानातील छिद्रातून बारीक तार घातली .एका मूर्तीच्या कानातून घातलेली तार दुस-या कानातून बाहेर आली दुस-या मूर्तीच्या कानातून घातलेली तार तोंडातून बाहेर आली .तिस-या मूर्तीच्या कानातून घातलेली तार हृदयातून आली.बिरबलाने सांगितले 'ही तीसरी मूर्ती चांगली आहे.'तो म्हणाला ,'श्रोते तीन प्रकारचे असतात .एक
प्रकार म्हणजे एका कानाने ऐकून दुस -या कानाने सोडून देतात .दुसरे श्रोते एका कानाने ऐकतात ऐकलेले
दुस-याला सांगतात .तिसरे श्रोते कानाने ऐकलेले ह्रुदयात साठवतात .त्याचे मनन ,चिंतन करतात
श्रवण कोणाकडून करावे ?
वक्ता असावा साचार। अनुभवाचा . असे समर्थ म्हणतात . बोले तैसा चाले असा वक्ता असला तर त्याचे बोलणे
लोकांच्या मनावर ठसते .संत वाड्मय संतांच्या अनुभवातून आलेले असते .त्यामुळे त्यांच्या ग्रंथाचे केलेले वाचन
श्रवण असते . वाड्मय वाचणे म्हणजे गुरुमुख श्रवणच !
श्रवणाने काय प्राप्त होते ?
श्री बेलसरे म्हणतात ,परमार्थात पाच गोष्टी आवश्यक असतात - संशय शंका hफिटणे दृश्याची आसक्ती कमी
होणे, भगवंत हवा असे मनाला वाटणे .प्रतिभा जागी होणे .मन एकाग्र करण्याची कला साध्य होणे
केवळ पारमार्थिक उन्नती होते असे नाही तर व्यावहारिक गोष्टी कळतात
श्रवण कशाचे करावे ?
जेथे संशय तुटती होये आशंका निवृती
अद्वित ग्रंथ परमार्थी करावे - -
ज्या ग्रंथात संतांनी त्यांचा अनुभव भाशाबध्द केलेला असतो ,त्यांना समर्थांनी अध्यात्म ग्रन्थ आहे .
त्याना अद्वैत ग्रन्थ असेही म्हणतात .अध्यात्म ग्रन्थ श्रवण करावे असे समर्थ म्हणतात .परन्तु सावध ही करतात .
जे काही श्रवणी पडिले तितुके समजोनी विराले
तरीच काही सार्थक जाहले निरुपणी। । -१० -१६ । ।
जे जे काही श्रवण केले ते ते नीट समजून मनन केले तरच निरूपणाचे सार्थक झाले असे म्हणता येइल असे समर्थ म्हणतात .सर्वात शेवटी समर्थ एकांत करायला सांगतात .सार काय ,असार काय शोधायला एकांत करायला सांगतात एकांतात चाणा करता येते ,योग्य अयोग्य काय ते कळते,आपल्या चुका कळतात.

Monday, December 29, 2008

। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
होमेओपाथी मध्ये आर्निका हे असे औषध आहे की जे प्रत्येक घरात हवे .आर्निका हे औषध मुका मार लागला ,अतिशय थकवा आला ,तर वापरता येते .जोराचा मुकामार लागला तर २०० किवा एम् मात्रेत द्यावे .दात काढताना
२०० चा एक डोस घेतला तर आजिबात त्रास होत नाही.अति श्रमाने थकवा आल्यास २०० च्या एका मात्रेने थकवा जातो .बरे वाटते
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।

Sunday, December 14, 2008

प्रत्येक माणूस स्वभावाने वेगळा का असतो ?

त्रिगुण
माणूस म्हणून सगळी माणसे सारखी असतात .पण प्रत्येक जण आपल्या परीने वेगळा असतो .माणसाच्या निराळेपणात एक सामान्य तत्व असते .भारतीय तत्वज्ञानी कपिलाचार्यांनी सांगितले की की सर्व दृश्य विश्व सत्व,रज,तमया त्रिगुणांनी पंचमहाभूतांनी बनलेले आहे .तर माणूसही त्रिगुणात्मक आहे
प्रत्येक माणसात तीनही गुण एकत्र असतात .परंतु त्यातील एक गुण इतर दोन गुणांपेक्षा वरच असतो .त्या गुणांची लक्षणे त्या माणसात दिसतात .समर्थ म्हणतात ,
मुळी देह त्रिगुणाचासत्व रज तमाचात्यामध्ये सत्वाचाउत्तम गुण । । - - । ।
सत्वगुणे भगवत भक्तीरजोगुणे पुनरावृत्तीतमोगुणे अधोगतीपावती प्राणी। । - - । ।
समर्थांनी सत्व रज तमोगुणांचा माणसात दिसणारा परिणाम सांगितला आहे .सत्व गुणाने माणसात भगवत भक्ती
निर्माण होते ,रजोगुणाने पुनरावृती म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागते .तमोगुणाने माणूस खालच्या योनीत
जातो . गीतेत १४ व्या अध्यायात १८ व्या श्लोकात भगवंत म्हणतात ,
उर्ध्वम गच्छंति सत्वस्था ,मध्ये तिष्ठन्ति राजसा :। जघन्यगुणवृत्तिस्था अधो च्छन्ति तामसा :।
सत्व गुणी माणसे श्रेष्ठ गतीला जातात ,रजोगुणी मध्ये राहतात ,तमोगुणी खाली जातात
प्रत्येक गुणाचे दोन प्रकार आहेत . शुध्द .शबल
विदुराच्या शुध्द सत्व गुणामुळे तो द्युत होऊ नये म्हणून दुर्योधनाला उपदेश करत राहिला ,तर धर्मराजाचा सत्वगुण मलिन झाल्यामुळे तो द्युत खेळायला बसला
जीवनातील गतीमानता रजोगुण आहे .जेव्हा एखादी व्यक्ती देव ,देश ,धर्म यांच्या उत्कर्षासाठी कार्य करते तेव्हा
तो शुध्द रजोगुण ,तर फक्त संसार ,मी ,माझा व्यवसाय ,माझी मुले ,यांचा विचार करतो तो शबल रजोगुण
युध्द खेळणे पहाणे हा तमोगुण .श्रीरामांनी वाली ,रावणाबरोबर युध्द केल ते दुष्टांचा नाश करण्यासाठी ,
म्हणून तो शुध्द तमोगुण .इतर सर्व तमोगुणी लक्षणे शबल तमोगुणाची
रामकृष्ण परमहंस सत्व तम रजो गुणांची संसारी माणसातील लक्षणे सांगतात : सत्वगुणी संसारी माणूस शांत
शालीन दयाळू ,आतबाहेर एक असलेला ,फारशा कामना ,वासना नसलेला असतो .संसारी रजोगुणी माणूस घरात
सर्व साफ सफाई करणार ,घराला रंग रंगोटी करणार ,वेगवेगळे छान पोशाख करणार ,थाटमाट करणारा असतो
संसारी तमोगुणी काम ,क्रोध मत्सर ,अंहकार झोपेनी व्याप्त असतो
भक्तीत सुध्दा सत्व ,रज ,तम गुण दिसतात .सत्व गुणी भक्त एकांतात ध्यान करतो ,शरीरावर त्याची फारशी
ममता नसते ,जीभेचे चोचले नसतात ,डामडौल नसतो ,सामानाचे प्रदर्शन नसते .रजोगुणी भक्त कपाळावर टिळा,
गळ्यात रुद्राक्षांच्या माळा,मधून सोन्याचे मणी ,असा थाट करणारा असतो .तमोगुणी भक्ताचा ईश्वरावरील विश्वास
जळजळीत असतो
रजोगुण
बरे खावे बरे जेवावेबरे ल्यावे बरे नसावेदुस-याचे अभिलाषावेतो रजोगुण
आपण बरे पला संसार बरा ,आपल चांगल असाव ,मिळाल तर दुस-याचही घ्याव ,असा रजोगुण असतो धनधान्याची साठवण करतो ,द्रव्याची त्याला आसक्ती असते ,कृपणता असते .तृष्णा रजोगुणाचा स्वभाव असतो
संसाराची आसक्ती असते ,दुस-यासारखे वैभव आपलेही असावे असे वाटते ,ते मिळाले नाही तर दु:खी होतो .तो
दुस-याची टवाळी करतो ,थट्टा करतो ,निंदा करतो ,त्याच्या बोलण्याने वाद होतो ,अंमल किंवा धुंदी आणणा-या
पदार्थांवर प्रेम असते .देहाला ,इंद्रियांना सुख देण्याच्या मागे असल्याने भक्ती ,वैराग्य आवडत नाहीत .देवाचे कार्य
करायला लाज वाटते ,पण प्रपंचा साठी खूप कष्ट घेतो .रजोगुणा मुळे वासना प्रपंचात गुंतते .ती सुटण्यासाठी काय
करावे असे श्रोत्यानी विचारताच समर्थ म्हणतात ,
उपाय एक भगवद भक्तीजरी ठाकेना विरक्तीतरी यथानुशक्तीभजन करावे । । - - ३६ । ।
तमोगुण
तमोगुणी माणसात शबल रजोगुणी माणसाचे सगळे गुण असतात ,पण त्यांचे वैशिष्ठ्य असे की प्रत्येक ठिकाणी
अतिशयोक्ती असते .मनाच्या श्लोकातील ६४ व्या श्लोकात तमोगुणाचे सुंदर वर्णन समर्थांनी केले आहे
अति मूढ़ त्या दृढ़ बुध्दी असेना
अति काम त्या राम चित्ती वसेना
अति लोभ त्या क्षोभ होइल जाणा
अति विषयी सर्वदा दैन्यवाणा।। ६४ । ।
तमोगुणी अतिशय लोभी असतो ,त्याला हवी असलेली गोष्ट मिळाली नाही तर परमावधीचा संताप येतो ,क्रोध आला की आई ,बाप ,भाऊ,बहीण कोणालाही ओळखत नाही ,नेहमी विषयात गुरफटलेला असतो ,दुस-याच्या दु:खाने संतोष होतो ,लोकांमध्ये भांडण लावून देण्यात त्याला मजा वाटते .दुस -याची त्याला दया येत नाही .देवाची
निंदा करतो कारण वासनेत अडकलेला असतो .समर्थांनी तमोगुणाचे वर्णन करण्याचे कारण तमोगुण अधोगतीला
नेतो .तो सोडून द्यावा .समर्थ दशक १४ समास मध्ये म्हणतात ,
रूप लावण्य अभ्यासिता येसहजगुणास चाले उपाये
काहीतरी धरावी सोयेअगांतुक गुणांची । । १४ - - । ।
अवगुण सोडून जातीउत्तम गुण अभ्यासिता येतीकुविद्या सोडून शिकतीशहाणे विद्या । । १४ - - । ।
सत्वगुण
सत्वगुणे भगवद भक्तीसत्वगुणे ज्ञान प्राप्तीसत्वगुणे सायोज्यमुक्तीपाविजेते । । -८- ८७ । ।
सत्वगुणाने भगवंताची भक्ती ,ज्ञानाची प्राप्ती ,सायोज्यमुक्ती मिळते म्हणून सत्वगूण अंगी बाणवायचा प्रयत्न करावा
लागतो .सत्वगुण अज्ञानाचा नाश करतो ,परमार्थाचा मार्ग दिसायला लागतो ,ईश्वरावरचे प्रेम ,विवेकी वृती ,परमार्थाची आवड ,हरिकथेची आवड ,ही सत्वगुणाची महत्वाची लक्षणे आहेत .सत्वगुणाने दु:खाचा विसर पडतो ,
भक्तिमार्ग स्पष्ट दिसतो . सत्वगुणाचे थोडक्यात वर्णन असे करता येइल ,
परपीडेचे वाहे दु:परसंतोषाचे सुखवैराग्य देखोनी हरिखमानी तो सत्वगुण । । - ७- ८३। ।
आता असो हे बहूतदेवीधर्मी ज्याचे चित्तभजे कामना रहिततो सत्वगुण । । - -८५ । ।