Sunday, June 27, 2010
सृष्टीची उभारणी व संहारणी
सृष्टीची उभारणी व संहारणी कशी होते असा प्रश्न श्रोत्यांनी विचारल्यावर समर्थ सांगतात :
आकाशापासून वायो होतो । हा तों प्रत्यया येतो । वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका। । ११-१-१ । ।
वायोची कठीण घासणी । तेथे निर्माण जाला वन्ही । मंद वायो सीतळ पाणी । तेथुनि जाले। । ११-१-२ । ।
आपापासून जाली पृथ्वी । ते नाना बीजरूप जाणावी।
बीजापासून उत्पत्ति व्हावी । हा स्वभावची आहे । । ११-१-३ । ।
मुळीं सृष्टी कल्पनेची । कल्पना आहे मुळींची । जयेपासून देवत्रयाची काया जाली । । ११-१-४ । ।
निश्चळामध्ये चंचळ । ते ची कल्पना केवळ । अष्टधा प्रकृतीचे मूळ । कल्पनारूप । । ११-१-५ । ।
कल्पना तेची अष्टधा प्रकृती । अष्टधा तेची कल्पनामूर्ती । मूळाग्रापासून उत्पत्ती । अष्टधा जाणावी । । ११-१-६ । ।
पांच भूते तीन गुण । आठ जाली दोनी मिळून । म्हणोनि अष्टधा प्रकृति जाण । बोलिजेते । । ११-१-७ । ।
मुळी कल्पनारूप जाली । पुढे तेचि फाफावली। केवळ जडत्वास आली । सृष्टीरूपे । । ११-१-८ । ।
आकाशापासून वायू निर्माण होतो हा आपल्याला प्रत्यय येतो .वायू मधील कठीण घासणी मुळे अग्नी निर्माण
होतो .मंद वायूपासून पाणी तयार होते .पाणी आळून पृथ्वी तयार होते .पृथ्वीवर अनेक प्रकाराची बीजे साठवलेली असतात .त्या बीजांपासून प्राणी ,वनस्पती तयार होतात .
निर्गुण निराकार ,त्रिगुणातीत परब्रह्मामध्ये जे स्फुरण झाले '-एको हं बहुस्याम ''' मी एक आहे ,अनेक व्हावे '' हे स्फुरण म्हणजे मूळमाया !तिच्यामध्ये तीन गुण निर्माण झाले म्हणून ती गुणमाया झाली .तिच्यापासून
सत्व ,रज,तम हे त्रिगुण निर्माण झाले .या तीनही गुणांचे स्वामी असलेले ब्रह्मा ,विष्णू ,महेश हे देहधारी देव निर्माण झाले .रजोगुणाचा स्वामी ब्रह्मा ,सत्वगुणाचा स्वामी विष्णू ,व तमोगुणाचा स्वामी महेश निर्माण
झाले .तमोगुणापासून पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते निर्माण झाली .पंचमहाभूते व त्रिगुण यापासून अष्टधा प्रकृती निर्माण झाली .मूळात ही मूळमाया ही सूक्ष्म कल्पना ,अष्टधा प्रकृतीच्या रूपाने फाफावली ,विस्तार पावली ,दृश्य विश्व निर्माण झाले .चार खाणी,चार वाणी ,८४ लक्ष जीवयोनी निर्माण झाल्या .
अशा प्रकारे सृष्टीची उभारणी सांगुन झाल्यावर श्रीसमर्थ संहारणी सांगतात :
शत वरुषे अनावृष्टी । तेथे आटेल जीवसृष्टी । ऐशा कल्पांताच्या गोष्टी । शास्त्री निरोपिल्या । । ११-१-१३ । ।
बाराकळी तपे सूर्य । तेणे पृथ्वीची रक्षा होये । मग ते रक्षा विरोन जाये। जळांतरी । । ११-१ -१४ । ।
ते जळ शोषी वैश्वानरू । वन्ही झडपी समीरू । समीर वितुळे निराकारू । जैसे तैसे । । ११-१-१५ । ।
शंभर वर्षे पाऊस न पडल्यामुळे पृथ्वी वरील सर्व जीवांचा नाश होइल .बारा प्रकाराच्या किरणांनी सूर्य तापेल .पृथ्वी जळून राख होइल .राख पाण्यात विरघळेल.अग्नी पाणी शोषेल.अग्नीला वायू विझवेल.वायू नाहीसा
होइल .निराकार ब्रह्म शिल्लक राहील .
Thursday, June 10, 2010
प्रपंच व परमार्थात प्रचितीचे महत्त्व कोणते ?
प्रपंच व परमार्थात ज्ञानाची लक्षणे सारखीच असतात .त्यांची प्रचिती महत्वाची असते .प्रपंचात जे ज्ञान असते ते इंद्रिय गोचर असते .त्यामुळे ते पारखून घेता येते .त्याची प्रत्यक्ष प्रचिती घेता येते .उदा:बीज उगवेलेसे पहावे । तरी मग द्रव्य घालून घ्यावे .बी उगवते असे पाहून मग द्रव्य खर्च करून ते घ्यावे .देहाला झालेला रोग अमुक एक मात्रेने बरा होतो असा अनुभव आला ती मात्रा घेता येते .एखादा किमयागार लोखंडाचे सोने करून देतो म्हणाला तरी त्याच्या विद्येचा प्रत्यक्ष अनुभव नसताना त्याला काही देऊ नये नाही तर तो हातोहात फसवतो.नीट चौकशी केल्याशिवाय जर काम अंगावर घेतले ,तर काम तडिला जात नाही .तर उलट आपल्या जिवीताला धोका पोचण्याची शक्यता असते .रोग्याला औषध देण्याची सवय नसलेला वैद्य आणला तर तो रोगी दगावतोच.समर्थ म्हणतात :
दिवाळखोराचा मांड। पाहाता वैभव दिसे उदंड । परी ते अवघे थोतांड । भंड पुढे । । १०-८-१५ । ।
एखादा दिवाळखोर असा बडेजाव दाखवतो की त्यापाशी खूप दौलत आहे पण त्याचा बडेजाव थोतांड असते .पुढे त्याची फजिती होते .ही सर्व उदाहरणे समर्थांनी प्रपंचातली दिली .आता परमार्थातल्या प्रचिती विषयी सांगतात :
तैसे प्रचितीवीण ज्ञान । तेथे नाही समाधान । करून बहुतांचा अनुमान । अन्हीत जाले । । १०-८-१६ । ।
ज्या पुरुषाला स्वानुभव नसतो ,त्याचे ज्ञान थोतांडच असते .त्याचे ज्ञान शाब्दिक असते प्रत्यक्ष प्रचिती त्याला आलेली नसते .त्यामुळे तो स्वत :चे व दुस-याचे हीत करू शकत नाही .परमार्थात आत्मप्रचिती आलेली कशी
ओळखावी ते समर्थ सांगतात :
पापाची खंडणा जाली । जन्मयातना चुकली । ऐसी स्वये प्रचित आली । म्हणिजे बरे । । १०-८-२१ । ।
परमेश्वरास वोळखिले । आपण कोणसें कळले । आत्मनिवेदन जाले । म्हणिजे बरे । । १०-८-२२ । ।
ब्रह्मांड कोणे केले । कासयाचे उभारले । मुख्य कर्त्यास वोळखिले । म्हणिजे बरे । । १०-८-२३ । ।
पाप नाश पावले ,जन्मास येऊन यातना भोगणे थांबले असा प्रत्यक्ष अनुभव आला की आत्मज्ञान
झाले .परमेश्वराची ओळख झाली ,खरा मी कोण कळले ,संपूर्ण शरणागती साधता आली की आत्मज्ञान झाले .विश्व कोणी निर्माण केले ,ते कशाचे आहे ,त्या विश्वाचा खरा कर्ता कोण हे कळले की आत्मज्ञान झाले .हीच परमार्थातील प्रचिती !
दिवाळखोराचा मांड। पाहाता वैभव दिसे उदंड । परी ते अवघे थोतांड । भंड पुढे । । १०-८-१५ । ।
एखादा दिवाळखोर असा बडेजाव दाखवतो की त्यापाशी खूप दौलत आहे पण त्याचा बडेजाव थोतांड असते .पुढे त्याची फजिती होते .ही सर्व उदाहरणे समर्थांनी प्रपंचातली दिली .आता परमार्थातल्या प्रचिती विषयी सांगतात :
तैसे प्रचितीवीण ज्ञान । तेथे नाही समाधान । करून बहुतांचा अनुमान । अन्हीत जाले । । १०-८-१६ । ।
ज्या पुरुषाला स्वानुभव नसतो ,त्याचे ज्ञान थोतांडच असते .त्याचे ज्ञान शाब्दिक असते प्रत्यक्ष प्रचिती त्याला आलेली नसते .त्यामुळे तो स्वत :चे व दुस-याचे हीत करू शकत नाही .परमार्थात आत्मप्रचिती आलेली कशी
ओळखावी ते समर्थ सांगतात :
पापाची खंडणा जाली । जन्मयातना चुकली । ऐसी स्वये प्रचित आली । म्हणिजे बरे । । १०-८-२१ । ।
परमेश्वरास वोळखिले । आपण कोणसें कळले । आत्मनिवेदन जाले । म्हणिजे बरे । । १०-८-२२ । ।
ब्रह्मांड कोणे केले । कासयाचे उभारले । मुख्य कर्त्यास वोळखिले । म्हणिजे बरे । । १०-८-२३ । ।
पाप नाश पावले ,जन्मास येऊन यातना भोगणे थांबले असा प्रत्यक्ष अनुभव आला की आत्मज्ञान
झाले .परमेश्वराची ओळख झाली ,खरा मी कोण कळले ,संपूर्ण शरणागती साधता आली की आत्मज्ञान झाले .विश्व कोणी निर्माण केले ,ते कशाचे आहे ,त्या विश्वाचा खरा कर्ता कोण हे कळले की आत्मज्ञान झाले .हीच परमार्थातील प्रचिती !
Wednesday, June 9, 2010
निष्काम सगुणोंपासना का करावी ?
अनेक पुरश्चरणे करणे,अनेक तीर्थ हिंडणे,प्रबळ वैराग्य धारण करणे ,अशा अनेक प्रकारच्या शक्ती अंगी
बाणणे ,म्हणजे पुण्यमार्ग अवलंबणे असे समर्थ म्हणतात .मी आत्मस्वरूप आहे अशा निश्चयाने ज्ञानमार्ग साधतो व सामर्थ्यही चढते,पण एक सद्गुरु किंवा देव या दोघांपैकी एकावर संपूर्ण निष्ठा असायला हवी.एखाद्याला निर्गुणाचा अनुभव आला म्हणून सगुणाची उपासना सोडली म्हणजे सद्गुरुची किंवा देवाची उपासना सोडली तर निर्गुणही स्वाधीन होत नाही आणि सगुणही हाताशी लागत नाही .
नाही भक्ती नाही ज्ञान । मध्येच पैसावला अभिमान । म्हणौनिया जपध्यान । सांडूच नये। । १०-७-१७ । ।
भक्ती नसेल तर ज्ञानही नसते पण अभिमान मात्र येतो .म्हणून समर्थ सांगतात की जप ध्यान सोडू नये .
सांडील सगुणभजनासी । जरी तो ज्ञाता परी तो अपेसी । म्हणौनिया सगुण भजनासी । सांडूचि नये । । १०-७ -१८ ।
।
जो आत्मज्ञानी सगुणाची उपासना सोडतो ,तो ज्ञानी पण अपयशी ठरतो .म्हणून सगुणाची उपासना सोडू नये .जो कोणी ज्ञानाची ,कलेची ,विद्येची ,विज्ञानाची ,भगवंताची उपासना निष्काम भावनेने करू लागतो तेव्हा ती उपासना शुध्द व पवित्र बनते.तिच्यात सामर्थ्य उत्पन्न होते .तेव्हाच ते जगाच्या उध्दारासाठी उपयोगी पडते.ज्ञाता ज्यावेळेस उपासना करत नाही तेव्हा त्याच्या जवळ सामर्थ्य निर्माण होत नाही .म्हणून समर्थ म्हणतात :
नि :काम बुध्दीचिया भजना । त्रैलोकी नाही तुळणा । समर्थेविण घडेना । नि ;काम भजन । । १०-७ -१९ । ।
कामनेने फळ घडे । नि :काम भजने भगवंत जोडे । फळ भगवंता कोणीकडे । महदानंतर । । १०-७-२० । ।
निष्काम बुध्दीने म्हणजे अपेक्षा न ठेवता जेव्हा भगवंताची उपासना घडते ती अनमोल असते .तिची बरोबरी कोणी करू शकत नाही .समर्थेविण घडेना । याचा अर्थ प्रबळ आत्मबळ असणारी व्यक्तीच फक्त नि :काम भजन ,
नि :स्वार्थी भजन करू शकते .
आपेक्षा ठेवून उपासना केली तर अपेक्षा पूर्ण होते पण आपेक्षा न ठेवता उपासना केली तर प्रत्यक्ष भगवंताची गाठ पडते .भगवंत आपलासा होतो .पण आपेक्षा पूर्ण होणे व प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती यात खूपच फरक आहे .
नाना फळे देवापासी । आणि फळ अंतरी भगवंतासी । याकारणे परमेश्वरासी । नि :काम भजावे । । १०-७ -२१ । ।
आपल्या आपेक्षा ,वासना पूर्ण करण्याचे सामर्थ्य भगवंताकडे असते .पण आपण भगवंताकडे काही मागता कामा नये कारण आपले मागणे पूर्ण होते पण भगवंत आपल्या पासून दूर जातो .नि :काम उपासनेने कोणते फळ मिळते ते समर्थ सांगतात ;
नि :काम भजनाचे फळ आगळे । सामर्थ्य चढे मर्यादेवेगळे । तेथे बापुडी फळे । कोणीकडे । । १०-७-२२ । ।
भक्ते जे मनी धरावे । ते देवे आपणचि करावे । तेथे वेगळे भावावे । नलगे कदा । । १०-७-२३ । ।
दोनी सामर्थ्ये येक होता । काळास नाटोपे सर्वथा । तेथे इतरांची कोण कथा । कीटक न्याये। । १०-७-२४ । ।
म्हणोन नि :काम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान । तयास तुळिता त्रिभुवन । उणे वाटे। । १०-७-२५ । ।
नि :काम उपासकाच्या अंगी अमर्याद सामर्थ्य असते .त्यामुळे तो वाटेल ते करू शकतो .भक्ताच्या मनात आलेला कोणताही संकल्प भगवंत आपण सिध्दीला नेतो .आत्मज्ञान व भगवंताची भक्ती या दोन गोष्टी मिळून ज्ञानी भक्ता पुढे काळही काही करू शकत नाही .म्हणजे निष्काम उपासना व ब्रह्मज्ञान असा योग जेव्हा एखाद्या ज्ञात्यामध्ये असतो तेव्हा त्रिभुवन उणे पडते .त्याचा प्रताप ,यश ,कीर्ती दिवसां दिवस वाढत जातात .
बाणणे ,म्हणजे पुण्यमार्ग अवलंबणे असे समर्थ म्हणतात .मी आत्मस्वरूप आहे अशा निश्चयाने ज्ञानमार्ग साधतो व सामर्थ्यही चढते,पण एक सद्गुरु किंवा देव या दोघांपैकी एकावर संपूर्ण निष्ठा असायला हवी.एखाद्याला निर्गुणाचा अनुभव आला म्हणून सगुणाची उपासना सोडली म्हणजे सद्गुरुची किंवा देवाची उपासना सोडली तर निर्गुणही स्वाधीन होत नाही आणि सगुणही हाताशी लागत नाही .
नाही भक्ती नाही ज्ञान । मध्येच पैसावला अभिमान । म्हणौनिया जपध्यान । सांडूच नये। । १०-७-१७ । ।
भक्ती नसेल तर ज्ञानही नसते पण अभिमान मात्र येतो .म्हणून समर्थ सांगतात की जप ध्यान सोडू नये .
सांडील सगुणभजनासी । जरी तो ज्ञाता परी तो अपेसी । म्हणौनिया सगुण भजनासी । सांडूचि नये । । १०-७ -१८ ।
।
जो आत्मज्ञानी सगुणाची उपासना सोडतो ,तो ज्ञानी पण अपयशी ठरतो .म्हणून सगुणाची उपासना सोडू नये .जो कोणी ज्ञानाची ,कलेची ,विद्येची ,विज्ञानाची ,भगवंताची उपासना निष्काम भावनेने करू लागतो तेव्हा ती उपासना शुध्द व पवित्र बनते.तिच्यात सामर्थ्य उत्पन्न होते .तेव्हाच ते जगाच्या उध्दारासाठी उपयोगी पडते.ज्ञाता ज्यावेळेस उपासना करत नाही तेव्हा त्याच्या जवळ सामर्थ्य निर्माण होत नाही .म्हणून समर्थ म्हणतात :
नि :काम बुध्दीचिया भजना । त्रैलोकी नाही तुळणा । समर्थेविण घडेना । नि ;काम भजन । । १०-७ -१९ । ।
कामनेने फळ घडे । नि :काम भजने भगवंत जोडे । फळ भगवंता कोणीकडे । महदानंतर । । १०-७-२० । ।
निष्काम बुध्दीने म्हणजे अपेक्षा न ठेवता जेव्हा भगवंताची उपासना घडते ती अनमोल असते .तिची बरोबरी कोणी करू शकत नाही .समर्थेविण घडेना । याचा अर्थ प्रबळ आत्मबळ असणारी व्यक्तीच फक्त नि :काम भजन ,
नि :स्वार्थी भजन करू शकते .
आपेक्षा ठेवून उपासना केली तर अपेक्षा पूर्ण होते पण आपेक्षा न ठेवता उपासना केली तर प्रत्यक्ष भगवंताची गाठ पडते .भगवंत आपलासा होतो .पण आपेक्षा पूर्ण होणे व प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती यात खूपच फरक आहे .
नाना फळे देवापासी । आणि फळ अंतरी भगवंतासी । याकारणे परमेश्वरासी । नि :काम भजावे । । १०-७ -२१ । ।
आपल्या आपेक्षा ,वासना पूर्ण करण्याचे सामर्थ्य भगवंताकडे असते .पण आपण भगवंताकडे काही मागता कामा नये कारण आपले मागणे पूर्ण होते पण भगवंत आपल्या पासून दूर जातो .नि :काम उपासनेने कोणते फळ मिळते ते समर्थ सांगतात ;
नि :काम भजनाचे फळ आगळे । सामर्थ्य चढे मर्यादेवेगळे । तेथे बापुडी फळे । कोणीकडे । । १०-७-२२ । ।
भक्ते जे मनी धरावे । ते देवे आपणचि करावे । तेथे वेगळे भावावे । नलगे कदा । । १०-७-२३ । ।
दोनी सामर्थ्ये येक होता । काळास नाटोपे सर्वथा । तेथे इतरांची कोण कथा । कीटक न्याये। । १०-७-२४ । ।
म्हणोन नि :काम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान । तयास तुळिता त्रिभुवन । उणे वाटे। । १०-७-२५ । ।
नि :काम उपासकाच्या अंगी अमर्याद सामर्थ्य असते .त्यामुळे तो वाटेल ते करू शकतो .भक्ताच्या मनात आलेला कोणताही संकल्प भगवंत आपण सिध्दीला नेतो .आत्मज्ञान व भगवंताची भक्ती या दोन गोष्टी मिळून ज्ञानी भक्ता पुढे काळही काही करू शकत नाही .म्हणजे निष्काम उपासना व ब्रह्मज्ञान असा योग जेव्हा एखाद्या ज्ञात्यामध्ये असतो तेव्हा त्रिभुवन उणे पडते .त्याचा प्रताप ,यश ,कीर्ती दिवसां दिवस वाढत जातात .
Subscribe to:
Posts (Atom)