अनुभव आणि अनुभविता । सकळ ये मायेची करिता । ते माया मुळीच नस्तां । त्यासी काय म्हणावे । । ६ -१० -३३ । ।
अनुभव व अनुभव घेणारा हे दोन्ही मायेमुळे निर्माण होते .मायाच नाहीशी झाली तर अनुभवाला जागाच राहात नाही .त्यामुळे मी आत्मा अनुभवला असे बोलता येत नाही .वेगळेपणा किंवा दोनपणा मायेने निर्माण
होतात .ज्याप्रमाणे वांझ बाईची मुलगी खोटी असते त्याप्रमाणे माया खोटी असते ,वेगळेपण खोटे असते .जीवात्मा परमात्मा एकच अभिन्न असतो .ही कल्पना स्पष्ट करण्यासाठी समर्थ सांगतात :
अजन्मा होता निजेला। तेणे स्वप्नी स्वप्न देखिला । सद्गुरूस शरण गेला । संसार दु:खे । । ६ -१०-३६ । ।
सद्गुरुकृपेस्तव । जाला संसार वाव । ज्ञान जालिया ठाव । पुसे अज्ञानाचा । । ६ -१० -३७ । ।
आहे तितुके नाही जाले । नाही नाहीपणे निमाले । आहे नाही जाऊन उरले । नसोनि काही । । ६ -१० -३८ । ।
ज्याला जन्म मरण नाही असा अजन्मा झोपला ,झोपेत त्याने एक स्वप्न पाहिल ,की आपल्याला खूप संसारदु :ख
झाले आणि आपण सद्गुरुला शरण गेलो .सद्गुरू कृपेने कळले की हा संसार मिथ्या आहे .मी देह आहे हे अज्ञानही मावळले .मी आत्मा आहे हे ज्ञान झाले .
अजन्मा म्हणजे मूळ स्वयंप्रकाशी आत्मस्वरूप स्वानंदात होते .त्याला झोप लागली .झोप म्हणजे अज्ञान त्यामुळे
स्वस्वरूपाचा विसर पडला .त्याला स्वप्न पडले म्हणजे आपण देहरूप आहोत असा भास झाला .त्याला भेदाने भरलेले दृश्य विश्व दिसू लागले .त्याला संसार दु :ख झाले म्हणजे दृश्यातील द्वैतामुळे त्याला भय वाटले .स्वप्नात स्वप्न पडले की आपण सद्गुरूंना शरण गेलो ,त्यांनी आपल्यावर कृपा केली .सद्गुरू कृपेने ज्या संसाराला आपण घाबरलो ते स्वप्न होते हे कळले .दृश्य विश्व स्वप्नवत आहे .ते खरे मानून त्यात कल्पनेने होणारे
व्यवहार ,स्वप्नातील स्वप्ना प्रमाणे असतात हे कळले .
झोपलेल्या माणसाला जागा झाल्यावर स्वप्नात पाहिलेले खोटे हे त्याला कळते ,तस देह्बुध्दी मरून अज्ञान विरले संसार मिथ्या वाटतो .वस्तू आहे व नाही हे दोन्ही अनुभव अज्ञानाच्या कक्षेत येतात .त्यामुळे ते अनुभव फक्त दृश्य विश्वाला च लागू पडतात .
Tuesday, April 28, 2009
Wednesday, April 22, 2009
समाधान कसे असते ?
समाधान
समाधान पुसता काही । म्हणती बोलिजे ऐसे नाही । तरी ते कैसे आहे सर्वही । निरोपावे । । ६ -१० -१ । ।
मुक्याने गुळ खादला । गोडी न ये सांगाव्याला । याचा अभिप्राव मजला । निरूपण कीजे ।६ -१० -२ । ।
अनुभव पुसो जाता । म्हणती न ये की सांगता । कोणापासी पुसो आता । समाधान । । ६ - १० -३ । ।
समाधान कसे असते असे विचारले तर ते सांगता येत नाही .शब्दाने वर्णन करता येत नाही .जशी गुळाची किंवा साखरेची गोडी गूळ किंवा साखर खाल्याशिवाय कळत नाही .त्याच प्रमाणे समाधानाचा अनुभव मिळाल्याशिवाय समाधान कसे असते ते कळत नाही .समर्थ म्हणतात ,
जे बोलास आकळेना। बोलल्याविणहि कळेना। ज्यास कल्पिता कल्पना । हिंपुटी होये। । ६ -१० -७ । ।
समाधान शब्दाने सांगावे म्हटले तर शब्दात गोवता येत नाही ,पण शब्दाने सांगितल्या वाचून समजतही
नाही .त्याची कल्पना करावी म्हटले तर कल्पनाशक्ति पराभूत होते .समाधान केवळ संत संगतीनेच प्राप्त होते.सद्गुरुकृपेने समाधानाची प्राप्ती करून घेण्याचा क्रम समर्थ सांगतात -
दृढ करूनिया बुध्दी । आधी घ्यावी आपशुध्दी। तेणे लागे समाधी । अकस्मात । । ६ -१० -१२ । ।
बुध्दीचा दृढ निश्चय केला की मी कोण आहे याचा शोध सद्गुरु कृपेने घेता येतो .शोध घेता घेता एकदम समाधी
लागते . आत्मबोध होउन बुध्दी स्थिर होते .
आपले मूळ बरे शोधिता । आपली तो माईक वार्ता । पुढे वस्तूच तत्वता । समाधान । । ६ -१० -१३ । ।
जेव्हा आपले आपण मूळ शोधायला जातो म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायला जातो तेव्हा कळत की आपल
शरीर म्हणजे एक तत्वांच गाठोडं आहे .म्हणजे आपले शरीर पंचमहाभूतांचे बनलेल आहे .पंचमहाभूते नाशिवंत आहेत .आपला सूक्ष्म देह हा विचारांचे तरंग आहे .आपला कारण देह ही अज्ञानाची अवस्था आहे .महाकारण देह ही ज्ञानाची अवस्था आहे .आपला स्थूल ,सूक्ष्म ,कारण ,महाकारण हे सर्व देह म्हणजे मी नाही हे
कळते ,आपल्यामधील चैतन्य शक्ती म्हणजे आपले आत्मस्वरूप म्हणजे मी याचा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे समाधान !याचा अनुभव येण्यासाठी घालवावा लागतो मीपणा! समर्थ म्हणतात -
जेथे मुराले मीपण । तेचि अनुभवाची खूण। अनुर्वाच्य समाधान । याकारणे बोलिजे । । ६ -१० -१७ । । जेव्हा मीपणा संपूर्ण विरतो ,तेव्हा परमात्म वस्तूचा अनुभव येतो .त्यामुळेच मिळणारे समाधान मीपणाने वेगळेपणाने सांगता येत नाही .
मुक्याने गुळ खादला । गोडी न ये सांगाव्याला । याचा अभिप्राव मजला । निरूपण कीजे ।६ -१० -२ । ।
अनुभव पुसो जाता । म्हणती न ये की सांगता । कोणापासी पुसो आता । समाधान । । ६ - १० -३ । ।
समाधान कसे असते असे विचारले तर ते सांगता येत नाही .शब्दाने वर्णन करता येत नाही .जशी गुळाची किंवा साखरेची गोडी गूळ किंवा साखर खाल्याशिवाय कळत नाही .त्याच प्रमाणे समाधानाचा अनुभव मिळाल्याशिवाय समाधान कसे असते ते कळत नाही .समर्थ म्हणतात ,
जे बोलास आकळेना। बोलल्याविणहि कळेना। ज्यास कल्पिता कल्पना । हिंपुटी होये। । ६ -१० -७ । ।
समाधान शब्दाने सांगावे म्हटले तर शब्दात गोवता येत नाही ,पण शब्दाने सांगितल्या वाचून समजतही
नाही .त्याची कल्पना करावी म्हटले तर कल्पनाशक्ति पराभूत होते .समाधान केवळ संत संगतीनेच प्राप्त होते.सद्गुरुकृपेने समाधानाची प्राप्ती करून घेण्याचा क्रम समर्थ सांगतात -
दृढ करूनिया बुध्दी । आधी घ्यावी आपशुध्दी। तेणे लागे समाधी । अकस्मात । । ६ -१० -१२ । ।
बुध्दीचा दृढ निश्चय केला की मी कोण आहे याचा शोध सद्गुरु कृपेने घेता येतो .शोध घेता घेता एकदम समाधी
लागते . आत्मबोध होउन बुध्दी स्थिर होते .
आपले मूळ बरे शोधिता । आपली तो माईक वार्ता । पुढे वस्तूच तत्वता । समाधान । । ६ -१० -१३ । ।
जेव्हा आपले आपण मूळ शोधायला जातो म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायला जातो तेव्हा कळत की आपल
शरीर म्हणजे एक तत्वांच गाठोडं आहे .म्हणजे आपले शरीर पंचमहाभूतांचे बनलेल आहे .पंचमहाभूते नाशिवंत आहेत .आपला सूक्ष्म देह हा विचारांचे तरंग आहे .आपला कारण देह ही अज्ञानाची अवस्था आहे .महाकारण देह ही ज्ञानाची अवस्था आहे .आपला स्थूल ,सूक्ष्म ,कारण ,महाकारण हे सर्व देह म्हणजे मी नाही हे
कळते ,आपल्यामधील चैतन्य शक्ती म्हणजे आपले आत्मस्वरूप म्हणजे मी याचा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे समाधान !याचा अनुभव येण्यासाठी घालवावा लागतो मीपणा! समर्थ म्हणतात -
जेथे मुराले मीपण । तेचि अनुभवाची खूण। अनुर्वाच्य समाधान । याकारणे बोलिजे । । ६ -१० -१७ । । जेव्हा मीपणा संपूर्ण विरतो ,तेव्हा परमात्म वस्तूचा अनुभव येतो .त्यामुळेच मिळणारे समाधान मीपणाने वेगळेपणाने सांगता येत नाही .
Thursday, April 16, 2009
दृश्य का दिसते ?
दृश्य मिथ्या तरी का दिसते ?
मागा श्रोती पुसिले होते । दृश्य मिथ्या तरी का दिसते । याचे उत्तर बोलिजेल ते । सावध ऐका। ।
६ -८ -१ । ।
जे आपल्या डोळ्यांना दिसते ते मिथ्या आहे तरी ते का दिसते असे शिष्य समर्थांना विचारतात .या प्रश्नाचे उत्तर देताना समर्थ अनेक दृष्टांत देतात व दाखवून देतात की इंद्रियांना जे दिसते ते खरे नसते .
मृगे देखिले मृगजळ । तेथे धावते बरळ।
जळ नव्हे मिथ्या सकळ। त्या पशूस कोणे म्हणावे । । ६ -८ -५ । ।
हरिण मृगजळ पाहते व तेथे खरोखर पाणी असे वाटून वेड्यासारखे धावत सुटते .
रात्री स्वप्ने पडतात ,त्या स्वप्नात एखाद्याने पाहिले की खूप धन सापडले आहे व त्याने ते देणेक-यांना दिले .पण स्वप्नात दिलेले धन प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडत नाही .
एका कुशल चिता-याने सुंदर चित्र तयार केले .एका माणसाचे त्या चित्रावर प्रेम बसले .पण खरे काय आहे ते तो पाहू लागल्यावर त्याच्या हाताला माती लागते .लाकडाच्या ,पाषाणाच्या सुंदर प्रतिमा मनाला मोहून जातात ,पण जवळ जाऊन पाहू लागल्यास लाकूड किंवा दगड हाताला लागतात .
या सर्व उदाहरणावरून समर्थ सांगतात -
मिथ्या साचासारिखे देखिले। परी ते पाहिजे विचारिले ।
दृष्टी तरळता भासिले । ते साच कैसे मानावे । ।६-८ -१३ ।।
खोटे ख-या सारखे दिसते तेव्हा ते खरोखर खरे आहे का याचा विचार केला तर ते खरे नाही मिथ्या आहे हे कळते.ईंद्रियाना जे दिसते ते फसवे असते ते सांगण्यासाठी समर्थानी उदाहरणे दिली आहेत -
नृपतीने चितारी आणिले । ज्याचे त्या ऐसे पुतळे केले ।
पाहता तेचि ऐसे गमले । परी अवघे माईक । ।६ -८-१५ । ।
राजाने शिल्पकार बोलावून पुतळे बनवून घेतले .पुतळे पाहिल्यावर प्रत्यक्ष व्यक्ती आहे असे वाटे पण ते पुतळे होते व्यक्ती नव्हत्या .जादुगार जादूचे खेळ करतो .त्याने निर्माण केलेल्या वस्तू ख-या वाटतात .पण खेळ संपल्यावर पाहिले तर त्या खोट्या होत्या असे कळते .जशी माणसांची जादूगरी असते ,राक्षस कृत्रिम निर्माण करतात ते इंद्रजाल किंवा वोडंबरी असते ,तसे भगवंतानी जे कृत्रिम निर्माण केलेले असते त्याला माया म्हणतात .
हे साचासारिखेच दिसे । विचारिताच नसे ।
मिथ्याची भासे । निरंतर पाहता । । ६ -८ -३४ । ।
भगवंताची माया सुध्दा ख-या सारखी वाटते ,पण विचार केला तर ती खोटी आहे हे कळते ,कारण -
साच म्हणावी तरी हे नासे। मिथ्या म्हणावे तरी हे दिसे ।
दोहीं पदार्थी अविश्वासे । सांगता मन । । ६ -८ -३५ । ।
माया खरी मानावी तर ती नाश पावते ,खोटी मानावी तर प्रत्यक्ष दिसते .त्यामुळे ती खरी आहे हे मनाला पटत नाही खोटी आहे यावर विश्वास ठेवत नाही .मन दोलायमान होते .विचारात गोंधळ होतो कारण असते अविद्या !
दृश्य खरे वाटणे ही अविद्या आपला देह खरा वाटणे ही सुध्दा अविद्या ! देह्बुध्दी मुळे जे जे दिसते ते ते खरे वाटणे ही माया ! द्रष्टा आपला देह खरा आहे असे मानतो ,बघितलेली वस्तू खरी मानतो ,त्यामुळे द्रष्टा व दृश्य यात वेगळेपणा
निर्माण होतो व दृश्य मिथ्या तरी ते दिसते .
६ -८ -१ । ।
जे आपल्या डोळ्यांना दिसते ते मिथ्या आहे तरी ते का दिसते असे शिष्य समर्थांना विचारतात .या प्रश्नाचे उत्तर देताना समर्थ अनेक दृष्टांत देतात व दाखवून देतात की इंद्रियांना जे दिसते ते खरे नसते .
मृगे देखिले मृगजळ । तेथे धावते बरळ।
जळ नव्हे मिथ्या सकळ। त्या पशूस कोणे म्हणावे । । ६ -८ -५ । ।
हरिण मृगजळ पाहते व तेथे खरोखर पाणी असे वाटून वेड्यासारखे धावत सुटते .
रात्री स्वप्ने पडतात ,त्या स्वप्नात एखाद्याने पाहिले की खूप धन सापडले आहे व त्याने ते देणेक-यांना दिले .पण स्वप्नात दिलेले धन प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडत नाही .
एका कुशल चिता-याने सुंदर चित्र तयार केले .एका माणसाचे त्या चित्रावर प्रेम बसले .पण खरे काय आहे ते तो पाहू लागल्यावर त्याच्या हाताला माती लागते .लाकडाच्या ,पाषाणाच्या सुंदर प्रतिमा मनाला मोहून जातात ,पण जवळ जाऊन पाहू लागल्यास लाकूड किंवा दगड हाताला लागतात .
या सर्व उदाहरणावरून समर्थ सांगतात -
मिथ्या साचासारिखे देखिले। परी ते पाहिजे विचारिले ।
दृष्टी तरळता भासिले । ते साच कैसे मानावे । ।६-८ -१३ ।।
खोटे ख-या सारखे दिसते तेव्हा ते खरोखर खरे आहे का याचा विचार केला तर ते खरे नाही मिथ्या आहे हे कळते.ईंद्रियाना जे दिसते ते फसवे असते ते सांगण्यासाठी समर्थानी उदाहरणे दिली आहेत -
नृपतीने चितारी आणिले । ज्याचे त्या ऐसे पुतळे केले ।
पाहता तेचि ऐसे गमले । परी अवघे माईक । ।६ -८-१५ । ।
राजाने शिल्पकार बोलावून पुतळे बनवून घेतले .पुतळे पाहिल्यावर प्रत्यक्ष व्यक्ती आहे असे वाटे पण ते पुतळे होते व्यक्ती नव्हत्या .जादुगार जादूचे खेळ करतो .त्याने निर्माण केलेल्या वस्तू ख-या वाटतात .पण खेळ संपल्यावर पाहिले तर त्या खोट्या होत्या असे कळते .जशी माणसांची जादूगरी असते ,राक्षस कृत्रिम निर्माण करतात ते इंद्रजाल किंवा वोडंबरी असते ,तसे भगवंतानी जे कृत्रिम निर्माण केलेले असते त्याला माया म्हणतात .
हे साचासारिखेच दिसे । विचारिताच नसे ।
मिथ्याची भासे । निरंतर पाहता । । ६ -८ -३४ । ।
भगवंताची माया सुध्दा ख-या सारखी वाटते ,पण विचार केला तर ती खोटी आहे हे कळते ,कारण -
साच म्हणावी तरी हे नासे। मिथ्या म्हणावे तरी हे दिसे ।
दोहीं पदार्थी अविश्वासे । सांगता मन । । ६ -८ -३५ । ।
माया खरी मानावी तर ती नाश पावते ,खोटी मानावी तर प्रत्यक्ष दिसते .त्यामुळे ती खरी आहे हे मनाला पटत नाही खोटी आहे यावर विश्वास ठेवत नाही .मन दोलायमान होते .विचारात गोंधळ होतो कारण असते अविद्या !
दृश्य खरे वाटणे ही अविद्या आपला देह खरा वाटणे ही सुध्दा अविद्या ! देह्बुध्दी मुळे जे जे दिसते ते ते खरे वाटणे ही माया ! द्रष्टा आपला देह खरा आहे असे मानतो ,बघितलेली वस्तू खरी मानतो ,त्यामुळे द्रष्टा व दृश्य यात वेगळेपणा
निर्माण होतो व दृश्य मिथ्या तरी ते दिसते .
Subscribe to:
Posts (Atom)