दास्य भक्ती
दास्य भजन ते दास्य जाणे। पडिले कार्य तितुके करावे । सदा सन्निधचि असावे । देवद्वारी । । ४ -७ -२ । ।
दास्य भक्ती म्हणजे देवाजवळ सतत राहून पडेल ते काम करावे ,काम प्रेमपूर्वक व मन :पूर्वक करावे .
दास्यभक्तीच्या नावातच भक्ताने परमेश्वराचा दास व्हावयाचे आहे .या भक्तीत संपूर्ण शरणागती अपेक्षित आहे .दास्य भक्तीत अग्रगण्य मारूती आहे .मारूतीने श्रीरामाचे जे दास्य केले त्याला कोठेही तोड़ नाही .अहंकाराचे संपूर्ण विसर्जन करून रोमारोमात श्रीरामांची मूर्ती धारण करणारा हनुमंत अजोड आहे .
श्रीसमर्थ स्वत:ला रामदास म्हणवतात .कबीर म्हणतात -मै गुलाम मैं गुलाम ,मैं गुलाम तेरा । तू साहिब है मेरा ।
तुकाराम महाराज म्हणतात :तरीच जन्मास यावे । दास विठ्ठलाचे व्हावे ।
दास्यभक्तीत दासाने केलेले कर्म हे भगवंत किंवा सद्गुरु घडवून आणतात असा भाव असतो .समर्थ म्हणतात :
भक्तांचेनि साभिमाने । कृपा केली दाशरथीने। समर्थ कृपेची वचने । तो हा दासबोध । । २० -१० -३० । ।
दाशरथी श्रीरामांनी आपल्यावर उदंड कृपा केली आहे .आणि ह्या भक्ताच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी श्रीरामांनी [येथे समर्थ हा शब्द्द श्रीरामांसाठी वापरला आहे .]जी वचने माझ्याकडून बोलावली तोच दासबोध आहे .
दास्य भक्तीत भगवंताच्या /सद्गुरूच्या सतत सहवासात राहून देवाचे वैभव वाढवावे ,कोणत्याही प्रकारची न्यूनता पडणार नाही याची काळजी घ्यायला समर्थ सांगतात .त्यासाठी देवळांची दुरुस्ती करणे,सोपे ,धर्मशाळा बांधावे ,
देवाच्या वैभवासाठी हत्ती ,रथ ,सिंहासने ,पालख्या ,निशाणे या वस्तूंचा सांभाळून ठेवणे असे सांगतात .देवांच्या मौल्यवान वस्तू नीट ठेवण्यासाठी जागा ठेवाव्या असे सांगतात .या सर्व सूचना समर्थांनी ४ ते २४ ओव्यांमध्ये केले आहे समर्थ २५ व्या ओवीत म्हणतात :
सकळांचे करावे पारपत्य । आलयाचे करावे आतित्य। ऐसी जाणावी सत्य । सातवी भक्ती । । देवा कड़े येणा-या सगळ्यांचा आदरसत्कार करावा ,त्यांचा पाहूणचार करावा त्यांना हवे नको पहावे .
वचने बोलावी करूणेची । नाना प्रकारे स्तुतीची । अंतरे निवती सकलांची । ऐसे वदावे । । ४ -८ -२७ । ।
देव कार्यासाठी सर्वस्व अर्पण करणे याला एकनाथ महाराज दास्य भक्ती म्हणतात ।
मी देवासाठी आहे अशा भावनेने काम करून देवाकडे येणा-या सर्वांची सेवा करण्यास तत्पर व्हावे ,आपल्या वाट्याला आलेले काम तत्परतेने करायला सांगतात .
दास्यभक्ती अहंकारातून नाही तर निरपेक्ष आनंदातून घडावी असे सर्व संत सांगतात ।
भक्ते न धरावा अभिमान । नापेक्षावा मानसन्मान । न करावे दांभिक भजन । अभिलाष जाण न धरावा । ।
दास्यपर अभंगात श्रीसमर्थ म्हणतात :
रामदास्य आणि हे वाया जाइल। हे न घडे कदाकाळी ।
कदाकाळी रामदास उपेक्षिना। रामुपासना ऐसी आहे ।
ऐसी आहे सार राघोबाची भक्ती । विभक्तीची शक्ती तेथे नाही ।
जेथे नाही काही वाऊगे मायिक । राम उपासक दास म्हणे ।
सेवा केल्याशिवाय खाणे पिणे न रुचणे ,सेवा झाली नाही तर चित्त व्याकुळ होणे,ही परिसीमा आहे .
दास्य भक्ती म्हणजे देवाजवळ सतत राहून पडेल ते काम करावे ,काम प्रेमपूर्वक व मन :पूर्वक करावे .
दास्यभक्तीच्या नावातच भक्ताने परमेश्वराचा दास व्हावयाचे आहे .या भक्तीत संपूर्ण शरणागती अपेक्षित आहे .दास्य भक्तीत अग्रगण्य मारूती आहे .मारूतीने श्रीरामाचे जे दास्य केले त्याला कोठेही तोड़ नाही .अहंकाराचे संपूर्ण विसर्जन करून रोमारोमात श्रीरामांची मूर्ती धारण करणारा हनुमंत अजोड आहे .
श्रीसमर्थ स्वत:ला रामदास म्हणवतात .कबीर म्हणतात -मै गुलाम मैं गुलाम ,मैं गुलाम तेरा । तू साहिब है मेरा ।
तुकाराम महाराज म्हणतात :तरीच जन्मास यावे । दास विठ्ठलाचे व्हावे ।
दास्यभक्तीत दासाने केलेले कर्म हे भगवंत किंवा सद्गुरु घडवून आणतात असा भाव असतो .समर्थ म्हणतात :
भक्तांचेनि साभिमाने । कृपा केली दाशरथीने। समर्थ कृपेची वचने । तो हा दासबोध । । २० -१० -३० । ।
दाशरथी श्रीरामांनी आपल्यावर उदंड कृपा केली आहे .आणि ह्या भक्ताच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी श्रीरामांनी [येथे समर्थ हा शब्द्द श्रीरामांसाठी वापरला आहे .]जी वचने माझ्याकडून बोलावली तोच दासबोध आहे .
दास्य भक्तीत भगवंताच्या /सद्गुरूच्या सतत सहवासात राहून देवाचे वैभव वाढवावे ,कोणत्याही प्रकारची न्यूनता पडणार नाही याची काळजी घ्यायला समर्थ सांगतात .त्यासाठी देवळांची दुरुस्ती करणे,सोपे ,धर्मशाळा बांधावे ,
देवाच्या वैभवासाठी हत्ती ,रथ ,सिंहासने ,पालख्या ,निशाणे या वस्तूंचा सांभाळून ठेवणे असे सांगतात .देवांच्या मौल्यवान वस्तू नीट ठेवण्यासाठी जागा ठेवाव्या असे सांगतात .या सर्व सूचना समर्थांनी ४ ते २४ ओव्यांमध्ये केले आहे समर्थ २५ व्या ओवीत म्हणतात :
सकळांचे करावे पारपत्य । आलयाचे करावे आतित्य। ऐसी जाणावी सत्य । सातवी भक्ती । । देवा कड़े येणा-या सगळ्यांचा आदरसत्कार करावा ,त्यांचा पाहूणचार करावा त्यांना हवे नको पहावे .
वचने बोलावी करूणेची । नाना प्रकारे स्तुतीची । अंतरे निवती सकलांची । ऐसे वदावे । । ४ -८ -२७ । ।
देव कार्यासाठी सर्वस्व अर्पण करणे याला एकनाथ महाराज दास्य भक्ती म्हणतात ।
मी देवासाठी आहे अशा भावनेने काम करून देवाकडे येणा-या सर्वांची सेवा करण्यास तत्पर व्हावे ,आपल्या वाट्याला आलेले काम तत्परतेने करायला सांगतात .
दास्यभक्ती अहंकारातून नाही तर निरपेक्ष आनंदातून घडावी असे सर्व संत सांगतात ।
भक्ते न धरावा अभिमान । नापेक्षावा मानसन्मान । न करावे दांभिक भजन । अभिलाष जाण न धरावा । ।
दास्यपर अभंगात श्रीसमर्थ म्हणतात :
रामदास्य आणि हे वाया जाइल। हे न घडे कदाकाळी ।
कदाकाळी रामदास उपेक्षिना। रामुपासना ऐसी आहे ।
ऐसी आहे सार राघोबाची भक्ती । विभक्तीची शक्ती तेथे नाही ।
जेथे नाही काही वाऊगे मायिक । राम उपासक दास म्हणे ।
सेवा केल्याशिवाय खाणे पिणे न रुचणे ,सेवा झाली नाही तर चित्त व्याकुळ होणे,ही परिसीमा आहे .
No comments:
Post a Comment