
ज्ञाने दृश्य मिथ्या जाले। तरी का भजन पाहिजे केले । तेणे काय प्राप्त जाले । मज निरोपावे।। ६ -७ -१। ।
ज्ञानाहूनि श्रेष्ठ असेना । तरी का पाहिजे उपासना । उपासनेने जना । काय प्राप्त । । ६ -७ -२ । ।
मुख्य सार निर्गुण । तिथे दिसेना सगुण । भजन केलियाचा गुण। मज निरोपावा । । ६ -७ -३ । ।
जे समस्त नाशिवंत । त्यासि भजावे किंनिमित्त । सत्य सांडूनि असत्य । कोणे भजावा । । ६ -७ -४ । ।
निर्गुणाने मोक्ष होतो । प्रत्यक्ष प्रत्यया येतो । सगुण काय देऊ पहातो । सांगा स्वामी । । ६ -७-६ । ।
शिष्य समर्थांना विचारतात की ज्ञानाने दृश्य खोटे आहे असे कळले तर मग भजन का करायचे ?ज्ञानाहून श्रेष्ठ काही नाही तर मग उपासना का करायची ?सगुणाची उपासना केल्याने काय मिळते?
सगुण नासिवंत ऐसे सांगता। पुन्हा भजन करावे म्हणता। तरी कशासाठी आता। भजन करू ।। ६ -७ -७ । ।
या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी द्यायला सुरुवात करतात :
गुरुचे वचन पाळणे। हेची परमार्थाचे मुख्य लक्षण। । गुरुचे वचन पाळून त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे हेच परमार्थाचे मुख्य लक्षण आहे .गुरुने सांगितले की सगुण भजन करावे व मग ते मानावे .श्रोता पुन्हा आक्षेप घेतो :
काय मानिला उपकार । कोण जाला साक्षात्कार। किंवा प्रारब्धाचे अक्षर । पुसिले देवे । । ६ -७ -१२ । ।
होणार हे तों पालटेना। भजने काय करावे जना। हे तों पाहतां अनुमाना । कांहीच न ये । । ६ -७ -१३ । ।
स्वामींची आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण। परंतु याचा काय गुण। मज निरोपावा । । ६ -७ -१४। ।या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी द्यायला सुरुवात करतात :गुरुचे वचन प्रतिपाळणे। हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे .गुरुने सांगितले की सगुण भजन करावे की करावे .श्रोता पुन्हा आक्षेप घेतो -
काय मानिला उपकार । कोण जाला साक्षात्कार। किंवा प्रारब्धाचे अक्षर । पुसिले देवे । । ६ -७ -१२ । ।
होणार ते पालटेना। भजने काय करावे जना। हे तो पाहता अनुमाना । काहींच न ये । । ६ -७ -१३ । ।
स्वामींची आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण। परंतु याचा काय गुण। मज निरोपावा । । ६ -७ -१४ । ।
समर्थ म्हणतात :आत्मज्ञान झाल्यावर कर्म नाश पावते .निर्गुण आत्मस्वरुप खरे असा प्रत्यय येतो ,परंतु ज्ञानी पुरुषाला सुध्दा देहाचे नित्यकर्म ,प्राथमिक गरजा ,दैनंदिन लोकव्यवहार चुकत नाहीत .म्हणजे ज्ञानी पुरूष अज्ञानी पुरुषासारख्या देहाच्या हालचाली करतो .ज्ञानी व अज्ञानी मध्ये देहाच्या बाह्य स्वरूपात फरक नसतो ,पण
अंतर्यामी असतो .ज्ञानी सगुणाला भजतो पण त्याच्या भजनात भ्रम नसतो .तर अज्ञानी सगुणाला भजतो तो भ्रमाने व भितीने ! प्रपंचातील अडचणी सोडविण्यासाठी अज्ञानी ,सकाम भजन करतो .
समर्थ म्हणतात :तुला जेवायला ,पाणी प्यायला ,मलमूत्राचा त्याग करावा लागतो ,तुझ्याशी संबंधित सर्वांच बर चालाव अस तुला वाटत ,मग सगुणाच भजन का सोडायचे ?तुला आत्मज्ञान झाले ,सगळे दृश्य मिथ्या आहे हे विवेकाने कळले तरी देह असे पर्यंत देह सांभाळावाच लागतो .दृश्याचा संपूर्ण त्याग करता येत नाही ,मग भजनाने काय केले ?
हरिहर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक । तू येक मानवी रंक । भजेसिना तरी काय झाले । ।
६ -७ -२० । ।
ब्रह्मा ,विष्णू आणि महेश हे देवही ईश्वराच्या आज्ञा पाळतात ,मग तुझ्या सारख्या क :पदार्थ असलेल्या मानवाला भजन पूजन केल्याने काय होणार आहे ?
आमच्या कुळाचे रघुनाथ हे दैवत आहे .त्याच्या कृपेने माझा परमार्थ चालतो .देवांना ही सोडविणा-या श्री रामाचा मी सेवक आहे .त्या सेवेनेच मला हे ज्ञान प्राप्त झाले आहे .जो माणूस आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवत नाही व ठेवत नाही असे ही म्हणत नाही त्याला देहाभिमान असतोच .त्यामुळे त्याला आत्मज्ञान ही मिळत नाही व सगुण भक्ती ही तो करत नाही .समर्थ म्हणतात :
रघुनाथ भजने ज्ञान झाले । रघुनाथ भजने महत्त्व वाढिले। म्हणोनिया तुंवा केले । पाहिजे आधी । ।
६ -७ -३१ । । रघुनाथ भजनानेच मला आत्मज्ञान प्राप्त झाले ,माझे महत्त्व वाढले ,हां माझा अनुभव आहे .म्हणून तू सगुणाची उपासना कर .
रघुनाथ स्मरोनि कार्य करावे । ते तत्काळचि सिध्दी पावे । कर्ता राम हे असावे । अभ्यांतरी। ।
६ -७ -३३ । ।
कर्ता राम म्हणे मी नव्हे आपण । ऐसे सगुण निवेदन । निर्गुणी ते अनन्य । निर्गुणचि होईजे । ।
६ -७ -३४ । ।
मी कर्ता ऐसे म्हणसी। तेणे तू कष्टी होसी । राम कर्ता म्हणता पावसी । यश कीर्ती प्रताप । ।
६ -७ -३६ । ।
म्हणून भगवंताची उपासना करावी .जो भगवंताची उपासना करतो त्याला पुष्कळ लोक मान देतात .अवाढव्य विश्वात भगवंताची प्रचंड शक्ती काम करते .,त्या शक्तीच्या कृपेने आपण जगतो ,कर्म करतो ,भोग भोगतो ,हे ध्यानात ठेवून जगणे हे उपासनेचे वर्म आहे .
ज्ञानाहूनि श्रेष्ठ असेना । तरी का पाहिजे उपासना । उपासनेने जना । काय प्राप्त । । ६ -७ -२ । ।
मुख्य सार निर्गुण । तिथे दिसेना सगुण । भजन केलियाचा गुण। मज निरोपावा । । ६ -७ -३ । ।
जे समस्त नाशिवंत । त्यासि भजावे किंनिमित्त । सत्य सांडूनि असत्य । कोणे भजावा । । ६ -७ -४ । ।
निर्गुणाने मोक्ष होतो । प्रत्यक्ष प्रत्यया येतो । सगुण काय देऊ पहातो । सांगा स्वामी । । ६ -७-६ । ।
शिष्य समर्थांना विचारतात की ज्ञानाने दृश्य खोटे आहे असे कळले तर मग भजन का करायचे ?ज्ञानाहून श्रेष्ठ काही नाही तर मग उपासना का करायची ?सगुणाची उपासना केल्याने काय मिळते?
सगुण नासिवंत ऐसे सांगता। पुन्हा भजन करावे म्हणता। तरी कशासाठी आता। भजन करू ।। ६ -७ -७ । ।
या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी द्यायला सुरुवात करतात :
गुरुचे वचन पाळणे। हेची परमार्थाचे मुख्य लक्षण। । गुरुचे वचन पाळून त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे हेच परमार्थाचे मुख्य लक्षण आहे .गुरुने सांगितले की सगुण भजन करावे व मग ते मानावे .श्रोता पुन्हा आक्षेप घेतो :
काय मानिला उपकार । कोण जाला साक्षात्कार। किंवा प्रारब्धाचे अक्षर । पुसिले देवे । । ६ -७ -१२ । ।
होणार हे तों पालटेना। भजने काय करावे जना। हे तों पाहतां अनुमाना । कांहीच न ये । । ६ -७ -१३ । ।
स्वामींची आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण। परंतु याचा काय गुण। मज निरोपावा । । ६ -७ -१४। ।या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी द्यायला सुरुवात करतात :गुरुचे वचन प्रतिपाळणे। हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे .गुरुने सांगितले की सगुण भजन करावे की करावे .श्रोता पुन्हा आक्षेप घेतो -
काय मानिला उपकार । कोण जाला साक्षात्कार। किंवा प्रारब्धाचे अक्षर । पुसिले देवे । । ६ -७ -१२ । ।
होणार ते पालटेना। भजने काय करावे जना। हे तो पाहता अनुमाना । काहींच न ये । । ६ -७ -१३ । ।
स्वामींची आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण। परंतु याचा काय गुण। मज निरोपावा । । ६ -७ -१४ । ।
समर्थ म्हणतात :आत्मज्ञान झाल्यावर कर्म नाश पावते .निर्गुण आत्मस्वरुप खरे असा प्रत्यय येतो ,परंतु ज्ञानी पुरुषाला सुध्दा देहाचे नित्यकर्म ,प्राथमिक गरजा ,दैनंदिन लोकव्यवहार चुकत नाहीत .म्हणजे ज्ञानी पुरूष अज्ञानी पुरुषासारख्या देहाच्या हालचाली करतो .ज्ञानी व अज्ञानी मध्ये देहाच्या बाह्य स्वरूपात फरक नसतो ,पण
अंतर्यामी असतो .ज्ञानी सगुणाला भजतो पण त्याच्या भजनात भ्रम नसतो .तर अज्ञानी सगुणाला भजतो तो भ्रमाने व भितीने ! प्रपंचातील अडचणी सोडविण्यासाठी अज्ञानी ,सकाम भजन करतो .
समर्थ म्हणतात :तुला जेवायला ,पाणी प्यायला ,मलमूत्राचा त्याग करावा लागतो ,तुझ्याशी संबंधित सर्वांच बर चालाव अस तुला वाटत ,मग सगुणाच भजन का सोडायचे ?तुला आत्मज्ञान झाले ,सगळे दृश्य मिथ्या आहे हे विवेकाने कळले तरी देह असे पर्यंत देह सांभाळावाच लागतो .दृश्याचा संपूर्ण त्याग करता येत नाही ,मग भजनाने काय केले ?
हरिहर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक । तू येक मानवी रंक । भजेसिना तरी काय झाले । ।
६ -७ -२० । ।
ब्रह्मा ,विष्णू आणि महेश हे देवही ईश्वराच्या आज्ञा पाळतात ,मग तुझ्या सारख्या क :पदार्थ असलेल्या मानवाला भजन पूजन केल्याने काय होणार आहे ?
आमच्या कुळाचे रघुनाथ हे दैवत आहे .त्याच्या कृपेने माझा परमार्थ चालतो .देवांना ही सोडविणा-या श्री रामाचा मी सेवक आहे .त्या सेवेनेच मला हे ज्ञान प्राप्त झाले आहे .जो माणूस आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवत नाही व ठेवत नाही असे ही म्हणत नाही त्याला देहाभिमान असतोच .त्यामुळे त्याला आत्मज्ञान ही मिळत नाही व सगुण भक्ती ही तो करत नाही .समर्थ म्हणतात :
रघुनाथ भजने ज्ञान झाले । रघुनाथ भजने महत्त्व वाढिले। म्हणोनिया तुंवा केले । पाहिजे आधी । ।
६ -७ -३१ । । रघुनाथ भजनानेच मला आत्मज्ञान प्राप्त झाले ,माझे महत्त्व वाढले ,हां माझा अनुभव आहे .म्हणून तू सगुणाची उपासना कर .
रघुनाथ स्मरोनि कार्य करावे । ते तत्काळचि सिध्दी पावे । कर्ता राम हे असावे । अभ्यांतरी। ।
६ -७ -३३ । ।
कर्ता राम म्हणे मी नव्हे आपण । ऐसे सगुण निवेदन । निर्गुणी ते अनन्य । निर्गुणचि होईजे । ।
६ -७ -३४ । ।
मी कर्ता ऐसे म्हणसी। तेणे तू कष्टी होसी । राम कर्ता म्हणता पावसी । यश कीर्ती प्रताप । ।
६ -७ -३६ । ।
म्हणून भगवंताची उपासना करावी .जो भगवंताची उपासना करतो त्याला पुष्कळ लोक मान देतात .अवाढव्य विश्वात भगवंताची प्रचंड शक्ती काम करते .,त्या शक्तीच्या कृपेने आपण जगतो ,कर्म करतो ,भोग भोगतो ,हे ध्यानात ठेवून जगणे हे उपासनेचे वर्म आहे .
No comments:
Post a Comment