Wednesday, January 5, 2011

चातुर्य लक्षणे -लोकसंग्रह करणा-या साठी


चातुर्य लक्षणे -लोकसंग्रह करणा -या साठी
समर्थांचा महंत ज्याने लोकसंग्रह करून देश ,देव ,धर्म याविषयी जागृती करायची आहे त्याच्या अंगी चातुर्याचीकोणती लक्षणे हवीत असा प्रश्न श्रोते विचारतात तेव्हा समर्थ उत्तर देतात :
अस्ति मासांची शरीरेत्यांत राहिजे जीवेश्वरेनाना विकारी विकारेप्रवीण होइजे । । १५-- | |
जीव जीवात घालावाआत्मा आत्म्यात मिसाळावाराहं राहो शोध घ्यावापरांतराचा । । १५-- | |
तैसेची हे मनास मनविवेके जावे मिळोनढिलेपणे अनुमानहोत आहे । । १५-- | |
या अस्थिमांसाने भरलेल्या शरीरात ईश्वर जीव रूपाने वास करतो .जसजसे शरीरात बदल होतात ,तसतसेजीवही आपल्यात बदल घडवून आणतो .प्रत्येकाच्या शरीरात असणारा जीवात्मा जाणीव मय असतो .त्याजाणीवेच्या सहाय्याने दस-याच्या अंत :करणात काय चालले आहे ते शोधता येते .आपल्या बोलण्यावागण्यानेदुस-याला काय वाटले असेल याची कल्पना करता येते .जसे ढिले ठेवलेले जानवे दिसायला चांगले दिसत नाहीत्याचे पदर गुंततात ,त्याउलट नीट ठेवलेले जानवे चांगले दिसते .तसे आपण विवेकाने दुस-याच्या भावना जाणूशकतो ,दुस -याच्या मनाचा ठाव घेता येतो
जो जगदांतरी मिळालातो जगदांतरचि जालाअरत्री परत्री तयालाकाय उणे । । १५--१४ | |
एकदा का माणूस दुस-याच्या मनाचा ठाव घ्यायला शिकला ,की तो जगाच्या अंतरंगाशी एकरूप होतो ,सर्व लोकांचेअंत :करण तोच होतो .जसे समर्थ बालपणापासून विश्वाची चिंता करत होते .मग अशा माणसाला जग किंमतदेते ,मान देते .मग त्यांना वशीकरणासारख्या क्षुद्र गोष्टींचा आधार घ्यावा लागत नाही
लोकसंग्रह करताना भोवताली जमा होणारी माणसे कशी असावीत ,ते समर्थ सांगतात :
आचार विचारेविणजे जे करणे तो तो सीणधूर्त आणि विचक्षणतेची शोधावे । । १५--२४ | |
जे लोक जे खरे नाही ते खरे मानतात ,त्याचा अभिमान धरतात ,जे खरे आहे ते सोडून देतात ,ते मूर्ख असतातआचार विचार सांभाळता जे लोक काम करतात ,ते वाया जाते .म्हणून लोकसंग्रह करणा-यांनी सरसकटकोणालाही आपल्या हाताखाली घेऊ नये.चतुर बुध्दीमान माणसे शोधून काढावी
याकारणे मुख्य मुख्यतयांसी करावे सख्ययेणे करिता असंख्यबाजारी मिळती । । १५--२६ | |
लोक संग्रह करण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित माणसांशी स्नेह जोडावा ,त्यांच्या बरोबर सख्य जोडले तर त्यांनामानणारे असंख्य लोक आपल्याला वश होतात
समर्थाचे राखता मनतेथे येती उदंड जनजन आणि सज्जनआर्जव करिती । । १५--२९ | |
वोळखीने वोळखी साधावीबुध्दीने बुध्दी बोधावीनीती न्याये वाट रोधावीपाषांडाची । । १५--३० | |
समाजातल्या प्रतिष्ठित माणसांना आपलेसे केले की सामान्य माणसे मेंढरासारखी मागे येतात म्हणून समर्थसांगतात की ओळखीने ओळख वाढवावी ,साधेपणाने रहात आपल्या बुध्दीने आपल्या शिकवणूकीतून लोकांची बुध्दी प्रगल्भ करावी .लोकां मध्ये आपलेपणा निर्माण करावा
वेष असावा बावळापरी अंतरी नाना कळासगट लोकांचा जिव्हाळामोडूं नये । । १५--३१ | |
निस्पृह आणि नित्य नूतनप्रत्ययाचे ब्रह्मज्ञानप्रगट जाणता सज्जनदुल्लभ जगी । । १५--३२ | |
नाना जिनस पाठांतरेनिवती सकळांची अंतरेचंचळपणे तदनंतरे सकळां ठायी । । १५--३३ | |
बाहेरून वेष बावळा असला तरी अन्तर्यामी अनेक कलांनी संपन्न असावे .लोकांचे अंत :करण सांभाळण्याचीहातोटी असावी .अत्यंत निस्पृह नेहमी ताजे असणारे आत्मज्ञान त्याच्या जवळ ओतप्रोत भरलेले असावे .अनेकलोकांना आकर्षून घेण्याची कला त्याच्या जवळ असावी .त्याने सतत फिरत असावे .एका ठिकाणी थांबू नयेथांबल्याने भेटी गाठी होत नाहीत .लोकसंग्रह थांबतो .
, . .

2 comments:

Unknown said...

Namaskar kaku ,
Me Mahavir Dhat , Heramb ch mitra
Khup chan mahiti dili ahe,
mala Avadali.


Regards,
Mahavir Dhat

Mukundayan said...

नमो नम: महोदया:

मला आवडला हा उपक्रम. छान आहे. अभिनंदन !

धन्यवाद

मुकुंद: भालेराव:

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य | भारतवर्ष

संकेतस्थल: www.mukundbhalerao.com