Wednesday, February 2, 2011

आत्मज्ञान सर्वांना का प्राप्त होत नाही ?

आत्मज्ञान सर्वांना प्राप्त का होत नाही ?

प्रत्येकाच्या अंतरात आत्मज्ञान असते पण ते आहे हे सर्वांना कळत नाही .कारण त्या आत्मस्वरूपावर अज्ञानाचे ,मायेचे आवरण असते .ते आवरण काढून टाकण्यासाठी साधना करावी लागते .आत्मस्वरूपाचे सर्वांना भान नसते .पण प्रत्येक प्राणी त्याच्या प्रकाशात जगतो .ते स्वरूप खूप सूक्ष्म असते .सूक्ष्म बनून आपण ते पाहू शकतो .सूक्ष्म मन बनवावे लागते .त्यासाठी स्थूळाचा त्याग करावा लागतो .सूक्ष्माच्या क्षेत्रात शिरावे लागते .आपल्या अंतर्यामी जे स्वरूप आहे तेच जगाच्या अंतर्यामी आहे असा सूक्ष्म विचार करावा लागतो .प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात भेद दिसला तरी जाणीवेच्या दृष्टिने त्यांच्या दृष्टीने त्यांच्या अंतरात्म्याच्या ठिकाणी भेद नसतो .त्यामुळे ज्या जाणीवेने एका शरीराला त्याचे दु:ख कळते त्याच जाणीवेने दुस-या शरीराला त्याचे दु:ख कळते .म्हणजेच आपल्या विचारावरून दुस-याचा विचार काय आहे ते कळते .आपल्या अंतरंगावरून दुस-याचे अंतरंग कसे आहे ते ओळखते ,दुस-याच्या अंतकारणाशी तदाकार होऊन त्याचे अंतकरण् जाणावे लागते .म्हणजे दुस-याच्या अंतकारणाचे प्रतिबिंब ज्ञात्याचे अंतकरणात पडते त्यावरून दुस-याचे विचार ,भावना ,वासना ,विकार सूक्ष्मात शिरलेल्या ज्ञात्याला समजतात .त्यालाच समर्थ सूक्ष्मे सूक्ष्म समजावे असे समर्थ म्हणतात .विवेकानेच हे शक्य होते .म्हणून ज्याच्या जवळ हा बिवेक आहे तोच आत्मज्ञानी बनू शकतो .

No comments: