मनुष्याच्या जीवनात पाण्याचे महत्व कोणते ?
सजीवाची निर्मिती पाण्यात झाली .जीव पाण्यावाचून राहू शकत नाही .म्हणून पाण्याला आपोनारायण
म्हणतात .या पाण्याचा साठा कोठे कोठे आढळतो याचे वर्णन या संपूर्ण समासात समर्थ करतात .हे
बघून समर्थांची निरीक्षण शक्ती किती प्रगल्भ होती याबद्दल अचंबा वाटतो .
पृथ्वीला आवरणोदकाचा आधार आहे .पृथ्वीवर सात समुद्रांचे पाणी आहे .पावसाचे पाणी नद्यांमधून
वहात जाउन समुद्राला मिळते ।नद्या कमी जास्त लांबीच्या असतात ।नद्या पर्वतावर उगम पावतात
,धबधब्याने वाहतात .आड ,विहिरी ,सरोवरे ,यांचे प्रचंड जलाशय असतात . गायमुखे ,पाट,कालव्यातून
पाणी वाहते ।झरे झिरपतात.पर्वत फुटून जलाशय तयार होतात .झरे ,ओढे ,कारंज्यासारखे पाणी
उडते .डोह ,डबकी ,लहान टाकी मोठी टाकी ,असे जलाशय डोंगरात आढळतात .
तीर्थात पवित्र ,पुण्यकारक असते ।तीर्थांचे पाणी पुण्यकारक असते ।अनेक ठिकाणी पाणी थंड
असते ,अनेक ठिकाणी गरम असते ।सर्व प्रकारच्या वेलींमध्ये ,फळांमध्ये ,फुलांमध्ये पाणी
असते .कंदमुळांमध्ये गुणकारक पाणी असते .खारे ,गोडे ,विषारी ,मधुर पाणी असते .अनेक
प्रकारचे उसाचे रस ,फळांचे रस ,गोरस ,मादक रस पारद रस काकवी ,गुळवणी हे गुळाचे रस
अशा अनेक प्रकाराने पाणी ह्या सृष्टीत आढळते .
निरनिराळ्या मोत्यांना पाणी असते .रत्नांचे पाणी झळकते .हत्यारांना पाणी देतात .रक्त ,रेत ,लाळ,मूत्र
,घाम ही पाण्याचीच रूपे .देह ,पृथ्वी पाण्यापासून झाले आहेत .सूर्यमंडळ ,चंद्रमंडळ सुध्दा
पाण्यापासून झाले आहेत .
खारा समुद्र ,दुधाचा समुद्र ,दारूचा समुद्र ,तुपाचा समुद्र ,दह्याचा समुद्र , उसाच्या रसाचा समुद्र ,
शुध्द गोड पाण्याचा समुद्र असे सगळीकडे पाणी पसरलेले असते ।आपले शरीरही पाण्यापासून तयार
झाले आहे .त्यानंतर ही शरीराला पाणी लागतेच .पाणी माणसाला अनेक प्रकारे सुख देते .
No comments:
Post a Comment