Thursday, February 24, 2011

पृथ्वी स्तवन


श्री समर्थ पृथ्वी स्तवन का करतात ?

सगळे जीव पृथ्वीच्या आधाराने जगतात ,देह पृथ्वी तत्वाचा बनला आहे .देहाला पृथ्वी शिवाय आधार

नाही। आकाशात राहणा-या ,उडणा-या पक्षानाही पृथ्वीचाच आधार असतो ,कारण त्यांचा देह पृथ्वी

तत्वाचा बनलेला असतो. पृथ्वीला माता म्हणतात .पण ह्याच पृथ्वीलाच लोक माता म्हणतात .ह्याच

पृथ्वीला लोक जाळतात, पोळतात, खणतात ,पोळतात ,नांगरतात .तिच्यावर लोक ,प्राणी ,पक्षी मलमूत्र

टाकतात ।तरीही पृथ्वी माता तिच्या ह्या लेकरांवर रागवत नाही .ती त्यांच्या अन्न ,वस्त्र ,निवा-याची

सोय करते ।

पृथ्वीच्या पोटात धातू ,द्रव्ये असतात .देव ,दानव ,मानव ,किल्ले ,शहरे ,गड कोट ,गावे शहरे

अनेक देश ,या पृथ्वीवरच आहेत .मेरू , मंदार ,हिमालय असे पर्वत ,अनेक पक्षी ,मासे ,साप

असे अनेक प्राणी पृथ्वीवरच राहतात . पृथ्वी भोवती असलेले आवर्णोदक इतके अपार आहे की

त्याचा अंत लागत नाही .त्यात प्रचंड शरीराचे जलचर प्राणी आहेत .या आवरणोदकाला वायूचा

आधार आहे .वायू गहन ,दाट ,घट्ट ,आहे .म्हणून ते पाणी कोणत्याही बाजूने वाहून जात नाही .

अशा अनेक गोष्टी पृथ्वीवर आहेत .म्हणून समर्थ म्हणतात :

बहुरत्न हे वसुंधरा | ऐसा पदार्थ कैचा दुसरा | अफाट पडिले सैरावैरा | जिकडे तिकडे ||१६-३-२० ||

म्हणून या पृथ्वीला समर्थ वसुंधरा म्हणतात .पृथ्वी सारखा दुसरा पदार्थ नाही .

No comments: