Wednesday, February 2, 2011


मूळमाया विश्वरचना कशी घडवून आणते ?

मूळमाया जाणीवेची | मुळींच्या मूळ संकल्पाची |वोळखी षड्गुनैश्वराची |येणेची न्याये ||१५-७-२ ||

प्रकृती पुरुष शिवशक्ती |अर्धनारी नटेश्वर म्हणती |परी ते आवघी जगज्जोती |मूळ त्यासी |\१५-७-३ ||

संकल्पाचे जे चळण |तेंचि वायोचे लक्षण | वायो आणि त्रिगुण | आणि पंचभूते ||१५-७-४ ||

मूळमाया जाणीवेची बनलेली असते .मूळ परब्रह्मा मधील तो पहिला संकल्प होता .तो जाणीव रूप होता व तेच मूळमायेचे स्वरूप आहे .मूळ मायेची दोन रूपे आहेत .१ जाणीव २ शक्ती .जाणीवेत ऐश्वर्य ,धर्म ,यशश्री ,ज्ञान ,वैराग्य हे सहा गुण आहेत ,तोच ईश्वर आहे .शक्तिरूप आहे शारदा ! प्रकृती पुरुष ,शिवशक्ती ,अर्धनारी नटेश्वर अशी नावे तिला मूळमायेला आहेत .या सर्वांचे मूळ आहे जगज्जोती !

मूळ संकल्प म्हणजे मूळमाया म्हणजे निश्चळात चंचळ निर्माण झाले .संकल्पात चंचल निर्माण झाले .संकल्पात चंचलपण आणण्याची शक्ती म्हणजे वायू असतो .वायू त्रिगुण व पंचभूते आणतो .पण ती सूक्ष्म रूपात असतात .त्यासाठी वेलीचे रूपक सागितले आहे .वेलीवर दिसणा-या पानांचे ,फुलांचे ,फळांचे मूळ वेलींच्या मुळात असते वेलीचे रंग ,आकार ,विकार हे सर्व वेलीच्या मुळांमध्ये असतात तसे त्रिगुण व पंचमहाभूते सूक्ष्म रूपात मूळ मायेत असतात .त्रिगुण आणि पंचभूते यांच्या सहाय्याने सृष्टी निर्माण होते .वेलीचे मूळ उपटून टाकले की मग ती पून्हा उगवत नाही .तसेच मायेचे असते .मायेचे मूळ जोपर्यंत असते तोपर्यंत जन्ममृत्यू चे चक्र चालू असते .आत्मज्ञानाने मायेचे मूळ उपटले की जन्ममृत्यू आटतात .जन्म मरण उरत नाही ..आत्मज्ञानी माणसाला जन्ममृत्यूच्या फे-या घालाव्या लागत नाहीत .

No comments: