Thursday, February 24, 2011

समर्थ सूर्य स्तवन का करतात ?

पृथ्वीवरील सजीव सृष्टी साठी सूर्याचे महत्व फार आहे .त्याच्या शिवाय एकही दिवस सजीव जगू शकत

नाहीत .त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत .सूर्य उगवला की प्राण्यांचा दिवस सुरु होतो .

नाना धर्म नाना कर्मे | उत्तमे मध्यमे अधमे | सुगमे दुर्गमे नित्यनेमे | सृष्टीमध्ये चालती ||१६-२-४ ||

वेदशास्त्रे आणि पुराणे | मंत्र यंत्र नाना साधने | संध्या स्नान पूजा विधाने | सूर्येवीण बापुडी ||१६-२-५ ||

सूर्य प्रकाशाने सर्व प्राण्यांना उजाडते .उत्तम ,मध्यम ,अधम ,सुगम ,दुर्गम ,असे अनेक धर्म ,अनेक कर्म

जगात चालतात ।वेद ,शास्त्र ,पुराणे ,मंत्र ,यंत्र ,साधने ,संध्या स्नान ,पूजा या सर्व गोष्टी सूर्यावर

अवलंबून असतात .

प्रापंचिक आणि पारमार्थिक |कार्य करणे कोणी येक | दिवसेवीण निरर्थक | सार्थक नव्हे ||१६-२-७ ||

प्रापंचिक पारमार्थिक कोणतेही कार्य दिवसा उजेडी च करावे लागते .

सूर्याचे मानवी जीवनात महत्व कोणते ?

सूर्याचे अधिष्ठान डोळे | डोळे नसता सर्व आंधळे |याकारणे कांहीच न चले | सूर्येवीण ||१६-२-८ ||

म्हणाल अंध कवित्वे करिती | तरी हेही सूर्याचीच गती | थंड जालिया आपुली मती | मग मती प्रकाश कैचा ||१६-२-९ ||

प्राणिमात्रांच्या डोळ्यामध्ये सूर्याचे अधिष्ठान असते .डोळे नसतील तर आंधळेपणा येतो .त्यामुळे

सूर्याशिवाय कांहीच चालत नाहीत .आंधळी माणसे काव्य रचना करत असली तरी तो देखील सूर्याचाच

प्रभाव आहे । सूर्याचा प्रकाश उष्ण असतो .जगामध्ये हरीहाराचे पुष्कळ अवतार झाले .पण त्यांच्याही

आधी सूर्य होता आणि आताही आहे .म्हणजे सूर्य सर्वांपेक्षा वडील आहे .सूर्य विश्वाचा डोळा आहे .

म्हणून तो श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे .

सकळ दोषाचा परिहार | करितां सूर्यास नमस्कार | स्फूर्ती वाढे निरंतर | सूर्यदर्शन घेता || १६-२-२२ ||

सूर्याला नमस्कार केला की सर्व दोष नाहीसे होतात .सूर्यदर्शन घेतल्याने स्फूर्ती निरंतर वाढते .

म्हणून समर्थ सूर्य स्तवन करतात .

No comments: