Thursday, February 24, 2011

वाल्मिकी स्तवन

श्री समर्थ वाल्मिकी स्तवन का करतात ?

साधकांसाठी वाल्मिकी चरित्र अत्यंत महत्वाचे आहे त्यांची नामनिष्ठा ,त्यांची उपरती ,त्यांचा अनुताप

आणि त्यांची तप:श्चर्या साधकांसाठी आदर्श आहे .ह्या चारही गोष्टी समर्थांनी वाल्मिकी स्तवनात

सांगीतल्या आहेत .

वाल्मिकी नामाने कसा तरला ?

पूर्वी केली दृष्ट कर्मे | परी पावन झाला रामनामे | नाम जपता दृढ नेमे | पुण्ये सीमा सांडिली ||१६-१-८ |

उफराटे नाम म्हणता वाचे | पर्वत फुटले पापाचे | ध्वज उभारले पुण्याचे | ब्रह्मांडावरुते || १६-१-९ ||

वाल्मीके जेथे तप केले | ते वन पुण्य पावन झाले | शुष्क काष्ठी अंकुर फुटले |तपोबळे जयाच्या ||१६-१-१० ||

|पूर्व आयुष्यात वाल्मिकीने दुष्ट कर्मे केली पण उरफाटे रामनाम दृढतेने घेउन तो पवित्र झाला .पापांचा

नाश झाला. पापाचे पर्वत फुटले .पुण्याचे निशाण फडकले .त्याने ज्या वनात तप केले ते वन सुध्दा

इतके पवित्र झाले की कोरड्या लाकडाला अंकुर फुटला .

उपरती आणि अनुताप | तेथे कैचे उरेल पाप |देह्यांत तप पुण्यरूप | दुसरा जन्म जाला ||१६-१-१२ ||

त्याला उपरती झाली .पश्चात्ताप झाला .पाप उरले नाही .अखंड तप केल्यामुळे पुण्यरूप असा दुसरा

जन्म झाला.

अनुतापे आसन घातले | देह्यांचे वारूळ जाले | तेची नाम पुढे पडिले | वाल्मिक ऐसे || १६-१-१३ ||

पश्चात्ताप झाला ,आणि आसन घालून जप करायला बसला .,इतक्या दृढतेने जप करू लागला की

देहाभोवती वारूळ वाढले म्हणून लोक त्याला वाल्मिकी म्हणू लागले .

वाल्मिकीने केलेले कार्यही खूप मोठे आहे .

जो तापसांमध्ये श्रेष्ठ | जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ | जयाचे बोलणे स्पष्ट | निश्चयाचे ||१६-१-१५ ||

जो निष्ठावंताचे मंडण | रघुनाथ भक्तांचे भूषण | ज्याची धारणा असाधारण |साधका सुदृढ करी ||१६-१-१६

वाल्मिक ॠशी बोलिला नसता| तरी आम्हांसी कैसी रामकथा | म्हणोनिया समर्था | काय म्हणोन वर्णावे ||१६-१-१८ ||

वाल्मिकी तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ आहे .कविगणांमध्ये वरच्या दर्जाचा आहे .त्याची नामनिष्ठा असाधारण

आहे ।रामभक्तीचे भूषण आहे ।त्याची धारणा विलक्षण आहे ।निश्चयाचे बोलणे आहे ।तो निष्ठावंतां

मध्ये शोभून दिसतात , अशा वाल्मिकीने जर रामकथा सांगितली नसती तर आज आपल्याला रामकथा

ऐकायला मिळाली नसती ।.ती रामकथा इतकी अद्वितीय आहे की देव ,मानव ,दानव सर्वांना ती हवी

आहे।शतकोटी रामायणाचे तीन भाग करून शंकरानी देव ,दानव व मानव या तिघांना सारखी वाटली

।उरलेली दोन अक्षरे राम ही आपल्या कंठात धारण केले .

या सर्व गोष्टींमुळे वाल्मीकींचे स्तवन !

No comments: