सख्य भक्ती
प्रा.के .वि .बेलसरे म्हणतात ,'भगवंताची अनुरक्ती +देह्सुखाची विरक्ती +प्राणिमात्रांबद्दल करुणावृत्ती =सख्यभक्ती
भक्ताच्या प्रेमाने पवित्र झालेला आपलेपणा व भगवंताचा मंगलमय मित्रपणा यांचा मधुर संगम सख्यभक्तीत दिसतो. यात भगवंताची इच्छा तोच धर्म मानला जातो .तेच शास्त्र ,तेच कर्तव्य व तोच व्यवहार होतो .भगवंताच्या अखंड सानिध्यात राहणारा भक्त सखा सर्व जीवांचा मित्र होतो .लोभ ,मोह ,योग ,त्याग ,संग्रह ,सुख ,दुःख : हे काहीच त्याच्या त्या अवस्थेत तो अनुभवत नाही जगाचे मंगल करीत तो जीवन जगतो .
समर्थ सख्य भक्तीची व्याख्या करतात :
देवासी परम सख्य करावे । प्रेम प्रीतीने बांधावे । आठवे भक्तीचे जाणावे । लक्षण ऐसे । । ४ -८ -२ । ।
देवाशी सख्य केव्हा घडते ?
देवास जयाची अत्यंत प्रीति। आपण वर्तावे येणे रिती । येणे करिता भगवंती। सख्य घडावे नेमस्त । ।
भगवंताला जे आवडते ते आपण करावे ,त्याप्रमाणे आपण वागावे ,म्हणजे भगवंताशी सख्य घडते ।
भगवंताला काय आवडते ?
भक्ती भाव भजन । निरूपण आणि कथाकीर्तन । प्रेमळ भक्तांचे गायन । आवडे देवा । ४ - ८ -४ । ।
भगवंताला भक्ती आवडते .भक्ती म्हणजे काय ते आपण आधी पाहिले आहे .परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल नि:शंक असणे हा भाव ! ईश्वर आहे ही जाणीव ठेवून ,ही भावना जागृत ठेवून वागणे हा भावार्थ ! भाव असला की ईश्वराच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते .भावार्थ असला की आचार विचार व उच्चार यात ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसते ।
जैसा भाव जयापासी । तैसा भाव तयासी । जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणीमात्रांचा। । ज्याप्रमाणे भाव महत्वाचा आहे त्याप्रमाणे देवाच्या सख्यत्वासाठी काहीही करायची तयारी हवी.
देवाच्या सख्यत्वासाठी । पडाव्या जिवलगांच्या तुटी। सर्व अर्पावे सेवटी । प्राण तोही वेचावा । । ४ -८ -८ । ।
आपुले अवघेचि जावे । परी देवासि सख्य रहावे । ऐसी प्रीति जीवेभावे । भगवंती लागावी । । ४ - ८ -९ । ।
देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणासि न करावे निर्वाण । परम प्रीतिचे लक्षण । ते हे ऐसे असे । । ४ -८ -१० । ।
जेव्हा भक्त भगवंताशी अनन्य होतो ,त्याच्या बद्दल भक्तांच्या मनात प्रेम दाटून येते ,देवाशी सख्य जोडले तर देवाला भक्ताची काळजी वाटते .लाक्षागृहातून पांडवांना भगवंतानी सुरक्षित बाहेर काढले ।
त्यासाठी काय करावे ते समर्थ सांगतात :
सखा मानावा भगवंत । माता पिता गणगोत । विद्या लक्ष्मी धन वित्त । सकळ परमात्मा । । ४ - ८ -१८ । ।
सख्यत्व होते तेव्हा काय होते ?
देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसी तारी । देव होय साहाकारी । अनाथांचा । । ४ -८ -२६। ।
देव कृपेचा सागरु । देव करूणेचा जळधरू। देवासि भक्तांचा विसरू । पडणार नाही । । ४ -८ -२८ । ।
म्हणोनि सख्य देवासि करावे । हितगुज तयासि सांगावे । आठवे भक्तीचे जाणावे । लक्षण ऐसे । । ४ -८ -३१ । ।
सख्य भक्ती झाली की भगवंतालाच भक्ताशिवाय करमत नाही .कबीर म्हणतो :
मनवा तो मरही गयो । दुर्बल भयो शरीर । पीछे फिरत प्रभूराम । कहत कबीर कबीर ।
भक्ताच्या प्रेमाने पवित्र झालेला आपलेपणा व भगवंताचा मंगलमय मित्रपणा यांचा मधुर संगम सख्यभक्तीत दिसतो. यात भगवंताची इच्छा तोच धर्म मानला जातो .तेच शास्त्र ,तेच कर्तव्य व तोच व्यवहार होतो .भगवंताच्या अखंड सानिध्यात राहणारा भक्त सखा सर्व जीवांचा मित्र होतो .लोभ ,मोह ,योग ,त्याग ,संग्रह ,सुख ,दुःख : हे काहीच त्याच्या त्या अवस्थेत तो अनुभवत नाही जगाचे मंगल करीत तो जीवन जगतो .
समर्थ सख्य भक्तीची व्याख्या करतात :
देवासी परम सख्य करावे । प्रेम प्रीतीने बांधावे । आठवे भक्तीचे जाणावे । लक्षण ऐसे । । ४ -८ -२ । ।
देवाशी सख्य केव्हा घडते ?
देवास जयाची अत्यंत प्रीति। आपण वर्तावे येणे रिती । येणे करिता भगवंती। सख्य घडावे नेमस्त । ।
भगवंताला जे आवडते ते आपण करावे ,त्याप्रमाणे आपण वागावे ,म्हणजे भगवंताशी सख्य घडते ।
भगवंताला काय आवडते ?
भक्ती भाव भजन । निरूपण आणि कथाकीर्तन । प्रेमळ भक्तांचे गायन । आवडे देवा । ४ - ८ -४ । ।
भगवंताला भक्ती आवडते .भक्ती म्हणजे काय ते आपण आधी पाहिले आहे .परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल नि:शंक असणे हा भाव ! ईश्वर आहे ही जाणीव ठेवून ,ही भावना जागृत ठेवून वागणे हा भावार्थ ! भाव असला की ईश्वराच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते .भावार्थ असला की आचार विचार व उच्चार यात ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसते ।
जैसा भाव जयापासी । तैसा भाव तयासी । जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणीमात्रांचा। । ज्याप्रमाणे भाव महत्वाचा आहे त्याप्रमाणे देवाच्या सख्यत्वासाठी काहीही करायची तयारी हवी.
देवाच्या सख्यत्वासाठी । पडाव्या जिवलगांच्या तुटी। सर्व अर्पावे सेवटी । प्राण तोही वेचावा । । ४ -८ -८ । ।
आपुले अवघेचि जावे । परी देवासि सख्य रहावे । ऐसी प्रीति जीवेभावे । भगवंती लागावी । । ४ - ८ -९ । ।
देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणासि न करावे निर्वाण । परम प्रीतिचे लक्षण । ते हे ऐसे असे । । ४ -८ -१० । ।
जेव्हा भक्त भगवंताशी अनन्य होतो ,त्याच्या बद्दल भक्तांच्या मनात प्रेम दाटून येते ,देवाशी सख्य जोडले तर देवाला भक्ताची काळजी वाटते .लाक्षागृहातून पांडवांना भगवंतानी सुरक्षित बाहेर काढले ।
त्यासाठी काय करावे ते समर्थ सांगतात :
सखा मानावा भगवंत । माता पिता गणगोत । विद्या लक्ष्मी धन वित्त । सकळ परमात्मा । । ४ - ८ -१८ । ।
सख्यत्व होते तेव्हा काय होते ?
देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसी तारी । देव होय साहाकारी । अनाथांचा । । ४ -८ -२६। ।
देव कृपेचा सागरु । देव करूणेचा जळधरू। देवासि भक्तांचा विसरू । पडणार नाही । । ४ -८ -२८ । ।
म्हणोनि सख्य देवासि करावे । हितगुज तयासि सांगावे । आठवे भक्तीचे जाणावे । लक्षण ऐसे । । ४ -८ -३१ । ।
सख्य भक्ती झाली की भगवंतालाच भक्ताशिवाय करमत नाही .कबीर म्हणतो :
मनवा तो मरही गयो । दुर्बल भयो शरीर । पीछे फिरत प्रभूराम । कहत कबीर कबीर ।
No comments:
Post a Comment