समाधान
समाधान पुसता काही । म्हणती बोलिजे ऐसे नाही । तरी ते कैसे आहे सर्वही । निरोपावे । । ६ -१० -१ । ।
मुक्याने गुळ खादला । गोडी न ये सांगाव्याला । याचा अभिप्राव मजला । निरूपण कीजे ।६ -१० -२ । ।
अनुभव पुसो जाता । म्हणती न ये की सांगता । कोणापासी पुसो आता । समाधान । । ६ - १० -३ । ।
समाधान कसे असते असे विचारले तर ते सांगता येत नाही .शब्दाने वर्णन करता येत नाही .जशी गुळाची किंवा साखरेची गोडी गूळ किंवा साखर खाल्याशिवाय कळत नाही .त्याच प्रमाणे समाधानाचा अनुभव मिळाल्याशिवाय समाधान कसे असते ते कळत नाही .समर्थ म्हणतात ,
जे बोलास आकळेना। बोलल्याविणहि कळेना। ज्यास कल्पिता कल्पना । हिंपुटी होये। । ६ -१० -७ । ।
समाधान शब्दाने सांगावे म्हटले तर शब्दात गोवता येत नाही ,पण शब्दाने सांगितल्या वाचून समजतही
नाही .त्याची कल्पना करावी म्हटले तर कल्पनाशक्ति पराभूत होते .समाधान केवळ संत संगतीनेच प्राप्त होते.सद्गुरुकृपेने समाधानाची प्राप्ती करून घेण्याचा क्रम समर्थ सांगतात -
दृढ करूनिया बुध्दी । आधी घ्यावी आपशुध्दी। तेणे लागे समाधी । अकस्मात । । ६ -१० -१२ । ।
बुध्दीचा दृढ निश्चय केला की मी कोण आहे याचा शोध सद्गुरु कृपेने घेता येतो .शोध घेता घेता एकदम समाधी
लागते . आत्मबोध होउन बुध्दी स्थिर होते .
आपले मूळ बरे शोधिता । आपली तो माईक वार्ता । पुढे वस्तूच तत्वता । समाधान । । ६ -१० -१३ । ।
जेव्हा आपले आपण मूळ शोधायला जातो म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायला जातो तेव्हा कळत की आपल
शरीर म्हणजे एक तत्वांच गाठोडं आहे .म्हणजे आपले शरीर पंचमहाभूतांचे बनलेल आहे .पंचमहाभूते नाशिवंत आहेत .आपला सूक्ष्म देह हा विचारांचे तरंग आहे .आपला कारण देह ही अज्ञानाची अवस्था आहे .महाकारण देह ही ज्ञानाची अवस्था आहे .आपला स्थूल ,सूक्ष्म ,कारण ,महाकारण हे सर्व देह म्हणजे मी नाही हे
कळते ,आपल्यामधील चैतन्य शक्ती म्हणजे आपले आत्मस्वरूप म्हणजे मी याचा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे समाधान !याचा अनुभव येण्यासाठी घालवावा लागतो मीपणा! समर्थ म्हणतात -
जेथे मुराले मीपण । तेचि अनुभवाची खूण। अनुर्वाच्य समाधान । याकारणे बोलिजे । । ६ -१० -१७ । । जेव्हा मीपणा संपूर्ण विरतो ,तेव्हा परमात्म वस्तूचा अनुभव येतो .त्यामुळेच मिळणारे समाधान मीपणाने वेगळेपणाने सांगता येत नाही .
मुक्याने गुळ खादला । गोडी न ये सांगाव्याला । याचा अभिप्राव मजला । निरूपण कीजे ।६ -१० -२ । ।
अनुभव पुसो जाता । म्हणती न ये की सांगता । कोणापासी पुसो आता । समाधान । । ६ - १० -३ । ।
समाधान कसे असते असे विचारले तर ते सांगता येत नाही .शब्दाने वर्णन करता येत नाही .जशी गुळाची किंवा साखरेची गोडी गूळ किंवा साखर खाल्याशिवाय कळत नाही .त्याच प्रमाणे समाधानाचा अनुभव मिळाल्याशिवाय समाधान कसे असते ते कळत नाही .समर्थ म्हणतात ,
जे बोलास आकळेना। बोलल्याविणहि कळेना। ज्यास कल्पिता कल्पना । हिंपुटी होये। । ६ -१० -७ । ।
समाधान शब्दाने सांगावे म्हटले तर शब्दात गोवता येत नाही ,पण शब्दाने सांगितल्या वाचून समजतही
नाही .त्याची कल्पना करावी म्हटले तर कल्पनाशक्ति पराभूत होते .समाधान केवळ संत संगतीनेच प्राप्त होते.सद्गुरुकृपेने समाधानाची प्राप्ती करून घेण्याचा क्रम समर्थ सांगतात -
दृढ करूनिया बुध्दी । आधी घ्यावी आपशुध्दी। तेणे लागे समाधी । अकस्मात । । ६ -१० -१२ । ।
बुध्दीचा दृढ निश्चय केला की मी कोण आहे याचा शोध सद्गुरु कृपेने घेता येतो .शोध घेता घेता एकदम समाधी
लागते . आत्मबोध होउन बुध्दी स्थिर होते .
आपले मूळ बरे शोधिता । आपली तो माईक वार्ता । पुढे वस्तूच तत्वता । समाधान । । ६ -१० -१३ । ।
जेव्हा आपले आपण मूळ शोधायला जातो म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायला जातो तेव्हा कळत की आपल
शरीर म्हणजे एक तत्वांच गाठोडं आहे .म्हणजे आपले शरीर पंचमहाभूतांचे बनलेल आहे .पंचमहाभूते नाशिवंत आहेत .आपला सूक्ष्म देह हा विचारांचे तरंग आहे .आपला कारण देह ही अज्ञानाची अवस्था आहे .महाकारण देह ही ज्ञानाची अवस्था आहे .आपला स्थूल ,सूक्ष्म ,कारण ,महाकारण हे सर्व देह म्हणजे मी नाही हे
कळते ,आपल्यामधील चैतन्य शक्ती म्हणजे आपले आत्मस्वरूप म्हणजे मी याचा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे समाधान !याचा अनुभव येण्यासाठी घालवावा लागतो मीपणा! समर्थ म्हणतात -
जेथे मुराले मीपण । तेचि अनुभवाची खूण। अनुर्वाच्य समाधान । याकारणे बोलिजे । । ६ -१० -१७ । । जेव्हा मीपणा संपूर्ण विरतो ,तेव्हा परमात्म वस्तूचा अनुभव येतो .त्यामुळेच मिळणारे समाधान मीपणाने वेगळेपणाने सांगता येत नाही .
No comments:
Post a Comment