समर्थांनी साधकाचे जे वर्णन केले ते ऐकून श्रोत्याने विचारले प्रपंचिकाला त्याग घडत नाही मग तो साधक बनू शकत नाही का ?
येथे संशय उठिला । निस्पृह तोचि साधक झाला ।
त्याग न घडे सांसारिकाला । तरी तो साधक नव्हे की । । ५ -९ -६१ । ।
या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी द.५ समास १० मध्ये दिले आहे .
सन्मार्ग तो जीवी धरणे। अनमार्गाचा त्याग करणे। संसारिका त्याग येणे। प्रकारे ऐसा । । ५ -१० -२ । ।
कुबुध्दी त्यागेविण काही । सुबुध्दी लागणार नाही । संसारिका त्याग पाही । ऐसा असे । । ५ -१० -३ । ।
प्रपंची वीट मानिला । मने विषय त्याग केला । तरीच पुढे अवलंबिला। परमार्थ मार्ग । । ५ -१० -४ । ।
त्याग घडे अभावाचा । त्याग घडे संशयाचा । त्याग घडे अज्ञानाचा । शनै शनै । । ५ -१० -५ । ।
सांसारिका ठाई ठाई । बाह्यत्याग घडे काही। नित्यनेम श्रवण नाही । त्यागेविण । । ५ -१० -७ । ।
ज्याला साधक व्हायचे आहे त्याला सन्मार्ग धरावा लागतो । त्यासाठी त्याला अनेक दुर्गुणांचा,कुविद्यांचा ,स्वार्थाचा षड्रिपूंचा त्याग करावा लागतो .हाच संसारिकांचा त्याग असतो .कुबुध्दी -वाईट बुध्दीचा त्याग केल्याशिवाय सुबुध्दी येत नाही .त्यामुळे कुबुध्दीचा त्याग हाच संसारिकांचा त्याग असतो .प्रपंचाचा वीट येतो त्यामुळे देहातून सुख घेण्याची इच्छा नाहीशी होते .त्यामुळे साधक बनण्याचा मार्ग खुला होतो .साधक व्हायचे असेल तर अभावाचा [परमेश्वर नाही या भावाचा ] त्याग करावा लागतो .परमेश्वराच्या अस्तित्वा विषयी संशयाचा त्याग करावा
लागतो .त्यागाशिवाय नित्यनेम ,श्रवण ही परमार्थ साधने आचरता येत नाहीत .
फिटली आशंका स्वभावे । त्यागेविण साधक नव्हे । । ५ -१० -८ । ।
येथे संशय उठिला । निस्पृह तोचि साधक झाला ।
त्याग न घडे सांसारिकाला । तरी तो साधक नव्हे की । । ५ -९ -६१ । ।
या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी द.५ समास १० मध्ये दिले आहे .
सन्मार्ग तो जीवी धरणे। अनमार्गाचा त्याग करणे। संसारिका त्याग येणे। प्रकारे ऐसा । । ५ -१० -२ । ।
कुबुध्दी त्यागेविण काही । सुबुध्दी लागणार नाही । संसारिका त्याग पाही । ऐसा असे । । ५ -१० -३ । ।
प्रपंची वीट मानिला । मने विषय त्याग केला । तरीच पुढे अवलंबिला। परमार्थ मार्ग । । ५ -१० -४ । ।
त्याग घडे अभावाचा । त्याग घडे संशयाचा । त्याग घडे अज्ञानाचा । शनै शनै । । ५ -१० -५ । ।
सांसारिका ठाई ठाई । बाह्यत्याग घडे काही। नित्यनेम श्रवण नाही । त्यागेविण । । ५ -१० -७ । ।
ज्याला साधक व्हायचे आहे त्याला सन्मार्ग धरावा लागतो । त्यासाठी त्याला अनेक दुर्गुणांचा,कुविद्यांचा ,स्वार्थाचा षड्रिपूंचा त्याग करावा लागतो .हाच संसारिकांचा त्याग असतो .कुबुध्दी -वाईट बुध्दीचा त्याग केल्याशिवाय सुबुध्दी येत नाही .त्यामुळे कुबुध्दीचा त्याग हाच संसारिकांचा त्याग असतो .प्रपंचाचा वीट येतो त्यामुळे देहातून सुख घेण्याची इच्छा नाहीशी होते .त्यामुळे साधक बनण्याचा मार्ग खुला होतो .साधक व्हायचे असेल तर अभावाचा [परमेश्वर नाही या भावाचा ] त्याग करावा लागतो .परमेश्वराच्या अस्तित्वा विषयी संशयाचा त्याग करावा
लागतो .त्यागाशिवाय नित्यनेम ,श्रवण ही परमार्थ साधने आचरता येत नाहीत .
फिटली आशंका स्वभावे । त्यागेविण साधक नव्हे । । ५ -१० -८ । ।
No comments:
Post a Comment