नाना अवतार धरणे दुष्टांचा संहार करणे धर्म स्थापयाकारणे विष्णूस जन्म १० -४-४१
म्हणोन धर्मस्थापनेचे नरतेहि विष्णूचे अवतार अभक्त दुर्जन रजनीचर सहजची जाले१०-४-४२
दुष्टांचा संहार करण्यासाठी विष्णू जी मूळची शुध्द जाणीव शरीर धारण करून अवतार धारण करते .धर्माची स्थापना करण्याकरिता विष्णूला जन्म घ्यावे लागतात .त्या दृष्टीने धर्माची स्थापना करणारे विष्णूचा अवतारच असतात .श्री समर्थ म्हणतात :
धर्मस्थापनेचे नरते ईश्वराचे अवतारजाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे१८-६-२०
श्रीमद शंकराचार्य ,श्री ज्ञानेश्वर माऊली ,तुकाराम महाराज ,श्री समर्थ रामदास स्वामी ,गजानन महाराज हे सर्व अवतारच ! श्रीराम जे अवतारी पुरुष ,त्यांचे भजन ,पूजन समर्थ रामदासांनी केले त्याचा त्यांना काय फ़ायदा झाला याचे वर्णन श्रीसमर्थ करतात :
रघुनाथ भजने ज्ञान जालेरघुनाथ भजने महत्त्व वाढलेम्हानौनिया तुवां केले पाहिजे आधी६-७-३१
रघुनाथ स्मरोनी कार्य करावेते तत्काळचि सिध्दी पावेकर्ता राम हे असावे अभ्यांतरी ६-७-३३
रघुनाथाचे स्मरण केले म्हणून ज्ञान झाले ,महत्व वाढले ,सिध्दिला गेले .कर्ता करविता राम आहे ही असेल तर मुमुक्षु पद प्राप्त होते .असे होण्याचे कारण म्हणजे अवतारी पुरुषांमध्ये अंतरात्मा प्रगट होत असतो .आपण राम कृष्णांदी प्रतिमांची पूजा करतो तेव्हा ती अंतरात्म्याला पोहोचते .अंतरात्मा हे अवतारांचे नेहमी राहण्याचे ठिकाण आहे .म्हणून त्याला निजधाम म्हणतात .अवतारी स्वस्वरूपाने कायमपणे असतात .समर्थ म्हणतात :
पूजा घेताती प्रतिमाआंगा येतो अंतरात्माअवतारी ते निजधामा येऊनी गेले११-९-९
परी ते निजरूपे असती ते निजरूप ते जगज्जोती सत्वगुण तयेस म्हणती जाणती कळा ११-९-१०
विवेके बहुत पैसावले म्हणूनि अवतारी बोलिले मनु चक्रवर्ती जाले येणेची न्याये १५-३-५
विवेकाने खूप विशाल बुध्दीचे झाले ,म्हणजे मी देह नसून मी आत्मा आहे ,पुढे विश्वात्मा आहे अशी विशाल बुध्दी झाली की ते अवतारी झाले .कर्ता करविता राम आहे असा भाव झाल्यावर मुमुक्षु साधकावस्थेत जातो आणि अंतरात्मा देव असतो .
Wednesday, July 28, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment