Tuesday, March 8, 2011

श्री मारुती स्तवन

वायू नंदन मारुती रायाचे स्तवन समर्थ का करतात ?

मारुती राय म्हणजे हनुमान ! वायूचा मुलगा . श्रीरामाचा सर्वश्रेष्ठ भक्त ! श्रीरामाच्या स्मरणामध्ये त्यांचे

तन आणि मन अखंड गुंतलेले होते .समर्थ म्हणतात :

हनुमंतास बोलिजे प्राणनाथ |येणे गुणे हा समर्थ | प्राणेवीण सकळ व्यर्थ | होत जाते ||१६-६-२६ ||

मागे मृत्य आला हनुमंता | तेव्हा वायो रोधला होता | सकल देवास आवस्ता | प्राणांत मांडले ||१६-६-२७ ||

सकल देवे मिळोन | केले वायोचे स्तवन | वायो प्रसन्न होउन | मोकळे केले ||१६-६-२८ ||

म्हणोनि प्रतापी थोर | हनुमंत ईश्वरी अवतार | त्याचा पुरुषार्थ सुरवर | पाहातचि राहिले ||१६-६-२९ ||

देव कारागृही होते | हनुमते देखे अवचिते | संव्हार करूनी लंकेभोवते | विटंबुनि पाडिले ||१६-६-३० ||

उसिणे घेतले देवांचे | मूळ शोधिले राक्षसांचे |मोठे कौतुक पछ्यकेताचे |आश्चर्य वाटे ||१६-६-३१ ||

रावण होता सिंहासनावारी | पुढे जाउन ठोसरे मारी | लंकेमध्ये निरोध करी | उदक कैंचे ||१६-६-३२ ||

देवास आधार वाटला | मोठा पुरुषार्थ देखिला | मनामध्ये रघुनाथाला | करुणा करिती ||१६-६-३३ ||

दैत्य आवघे सहारिले | देव तात्काळ सोडिले | प्राणीमात्र सुखी जाले | त्रैलोक्य वासी ||१६-६-३४ ||

हनुमंताला प्राणनाथ म्हणतात ।त्यावरून त्याचे किती सामर्थ्य आहे ते श्री समर्थ लक्षात आणून

देतात ।मागे हनुमंत फळ आहे असे वाटून सूर्याच्या दिशेने झेपावला ,तेव्हा ईद्राला भयं वाटले .

त्याने हनुमंतावर वज्र फेकले .हनुमंत बेशुध्द झाला .ते बघून त्याचा पिता वायू रागावला .वायूने

सर्वांचे प्राण आकर्षून धरले .देव घाबरे झाले .देवांनी एकत्र येउन वायूची स्तुती केली .वायू प्रसन्न

झाला .सर्वांचा प्राण मोकळा झाला .असा मोठा प्रतापी हनुमंत लंकेत गेला असता त्याने देवांना

तेथे पाहिले .त्याने राक्षसांची विटंबना केली .त्यांना मारून लंकेभोवती टाकले .राक्षसांची पाळेमुळे

खणून काढली .रावण सिंहासनावर बसला होता .मारुती तेथे गेला .त्याला ठोसे मारले .लंकेत

निरोध केला .पाणी मिळेनासे झाले .देवांनी श्री रामाची करुणा भाकली .सगळे दैत्य मारून

देवांना सोडविले .

म्हणून समर्थ मारुती रायाचे स्तवन करतात .

No comments: