Monday, March 14, 2011

देहात्म योग

देह आत्म्याच्या संयोगाने आत्म्याला काय भोगावे लागते ?

आत्मा देहामध्ये असतो | नाना सुख दु:खे भोगतो | सेवटी शरीर सांडून जातो | येकायेकी || १७-६-१ ||

आत्मा देहात रहातो .अनेक सुख दु:खे त्याला भोगावी लागतात .एकाएकी देह सोडून जातो .तरुणपणी देहात ताकद असते तेव्हा अनेक सुख भोगण्याची शक्ती त्याच्यात असते .पण म्हातारपणी शक्ती क्षीण होते ,तेव्हा अनेक दु:खे त्याला भोगावी लागतात .शेवटी हातपाय झाडून प्राण त्यागतो .

देहात्म्याची संगती | काही येक दु:ख भोगिती | चर्फडचर्फडूनि जाती |देहांतकाळी ||१७-६-४ ||

ऐसा दो दिवसांचा भ्रम | त्यास म्हणती परब्रह्म | देहांतकाळी ||१७-६-६ ||

देह आणि आत्म्याची संगती कशी असते ते सांगताना समर्थ म्हणतात :---देह आत्म्याची संगत झाली की काही सुख भागता येते .पण देह सुटताना त्यालाच जीव च्राफाडून मरतो .मनुष्याचे जीवन म्हणजे दोन दिवसांचा भ्रम आहे .त्यालाच लोक परब्रह्म समजतात .दु:खाच्या पसा-याला गोड मानून घेतात देहात्म योगाने अनेक दु:खे भोगावी लागतात ।आयुष्याच्या शेवटी सगळे प्राणी दीनवाणे होउन मरतात. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख जवाएव्हडे व दु:ख पर्वताएवढे असते .मना विरुध्द गोष्टी घडतात .जिवलगांची ताटातूट होते .झोपेच्या वेळेस ढेकूण ,पिसवा त्रास देतात .जेवताना माश्या पदार्थावर बसतात .उंदीर धान्याची नासाडी करतात .उवा ,चामवा असे आंगच्या कातड्यात शिरणारे प्राणी असतात .किडे ,गोचीड गांधील माशा कानटे सर्प अशा अनेक प्राण्यात एकमेकांविषयी वैर असते . सर्वांना दु:ख भोगावे लागते .चौर्याशी लक्ष जीवयोनी असलेले प्राणी एकमेकांना खाउन आपली उपजीविका करतात .

अंतरात्मा जीवात रहायला आला की त्याला सगळी सुख दु:खे भोगावी लागतात .माणूस जीवनात सतत चरफडतो ,रडतो ,दु:खाने विव्ह्ळून प्राण देतो .सामान्य माणूस या जीवात्म्याला परब्रह्म मानतो .पण परब्रह्म शास्वत असल्याने ते कधी जात नाही ,येत नाही . ते कोणाला दु:ख देत नाही .निंदा स्तुती त्याला स्पर्श करू शकत नाही .

अंतकाळी माणसाची अवस्था कशी असते ?

कठीण दु:ख सोसवेना | प्राण शरीर सोडिना | मृत्य दु;ख सगट जना | कासावीस करी || १७-६-२७ ||

नाना अवेवहीन जाले | तैसेची पाहिजे वर्तले | प्राणी अंतकाळी गेले | कासावीस होउनी ||१७-६-२८ ||

रूप लावण्य अवघे जाते |शरीर सामर्थ्य अवघे राहते |कोणी नस्तां मरते | आपद आपदो ||१७-६-२९||

अंतकाळ आहे कठीण | शरीर सोडिना प्राण | बराद्यासारखे लक्षण | अंतकाळी || १७-६-३२ ||

माणसाला कठीण दु:ख सोसवत नाही .प्राण जाता जात नाही .मरण काळाचे दुख सर्वांनाच सारखेच कासावीस करते .कोणाचे रोगाने अथवा अपघाताने अवयव निकामी होतात .अशा अवयव हीन अवस्थेत माणसाला व्यवहार करावे लागतात .माणसाचे रूप ,सौंदर्य ,सामर्थ्य नाहीसे होते .जवळ कोणी नसताना अनेक यातना भोगाव्या लागतात .त्याची अवस्था दीनवाणी बनते .अंतकाळ काठीन असतो कारण जीव वासनेत गुंतलेला असतो .प्राण शरीर सोडत नाही .म्हणूनच समर्थ साधक कोण हे सांगताना म्हणतात :

भोगून अभोक्ता म्हणती | हे तों अवघेची फजिती | लोक उगेच बोलीती |पाहिल्याविण || १७-६-३१ ||

भोग भोगताना त्यापासून अलिप्त राहणे ही सामान्य गोष्ट नाही .देहदु:ख आणि दारिद्र भोगताना त्यापासून मनाने अलिप्त रहाणे ,भगवंताला दोष न देता आपले अनुसंधान सांभाळतो तो खरा साधक !

No comments: