Monday, March 14, 2011

आत्मज्ञान साध्य करण्याचा चार पाय-या

आत्मज्ञान साध्य करण्याच्या चार पाय-या कोणत्या ?

आत्मज्ञान साध्य करण्याच्या चार पाय-या आहेत : श्रवण ,मनन ,निदिध्यासन आणि रोकडा

आत्मसाक्षात्कार ! समर्थ म्हणतात :

श्रवण मननाचा विचार | निजध्यासे साक्षात्कार | रोकडा मोक्षाचा उधार | बोलोची नये ||१७-३-३ ||

जे श्रवण केले ते मनन करून विचार वाढवावा .त्यानंतर जे मिळवायचे आहे [माणसाचे सर्वश्रेष्ठ ध्येय परब्रह्माची प्राप्ती ] त्याचा निदिध्यास धरून साक्षात्कार करून घ्यावा .ह्याची देही ह्याची डोळा ,ह्याची जन्मात मोक्षप्राप्ती करून घ्यावी .आत्मसाक्षात्काराने रोकडी प्रचीती घ्यावी असे समर्थ सांगतात .पुढील जन्मात मोक्षप्राप्ती करून घेउ अशी उधाराची भाषा बोलू नये असे समर्थांचे सांगणे आहे ,कारण पुढचा जन्म कोणता मिळेल ते सांगता येत नाही .

समर्थ पोथी सांगायला आरंभ करत आहेत हे पाहून शिष्य ही पोथ्यांची वेष्टणे काढू लागले , तेव्हा समर्थ सांगतात :

थांबा थांबा ऐका ऐका | आधीच ग्रंथ सोडू नका | सागितले ते ऐका | सावधपणे ||१७-३-१||

श्रवणामध्ये सार श्रवण | ते हे अध्यात्म निरुपण | सूचित करुनी अंत:करण | ग्रंथामध्ये विवरावे ||१७-३-२ ||

समर्थ सावधपणे ग्रंथ वाचायला सांगत आहेत .

श्रवण मनन निदिध्यास व साक्षात्कार हा मोक्षाचा रोकडा उपाय आहे .उधारीचा नाही .हा विचार जेव्हा कळतो तेव्हा अनुमान उरत नाही .मूळमायेच्या पलीकडे हरीसंकल्प [स्फुरण ] असते .तेथे आपल्याला उपासनेने पोचायचे असते .तेथे पोचल्यावर म्हणजे ब्रह्मप्राप्ती झाल्यावर ग्रंथ बाजूला सारा असे समर्थ सांगतात .ग्रंथ वाचून ऐकून त्याप्रमाणे आचरण करायला सांगतात .श्रवण आणि श्रावणाचे मनन केले तर अंत:कर्ण शुध्द होते .सारासार विचाराने तत्वझाडा करता येतो .तत्वझाडा केल्यावर मी कोण ?

देव कोण ? ते कळते .आत्मसाक्षात्कार होतो .परब्रह्माची प्राप्ती होते .

No comments: