Wednesday, September 15, 2010

प्रापंचिकाचा विषय त्याग कोणता ?

न्याय निष्ठुर बोलणे । बहुतांस वाटे कंटाळवाणे । मळमळ करिता जेवणे विहित नव्हे । । १२-७-१
बहुतीं विषय निंदिले । आणि तेचि सेवित गेले । विषय त्यागे देह चाले । हे तो घडेना । । १२-७-२
श्रोते शंका विचारतात की शास्त्रकार विषयाची निंदा करतात .त्याचा त्याग केल्या शिवाय परमार्थ साधत नाही असे सांगतात .मग प्रापंचिक माणूस व पारमार्थिक माणूस यांच्यात फरक कसा आढळत नाही ?खूप लोक विषयाची व देह्सुखाची निंदा करतात .पण स्वत : विषयाचे सेवन करतात .विषयाचा त्याग केला तर देह चालणार नाही .विषयाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ होत नाही .मग प्रपंच करणारे खातात ,पितात आणि परमार्थ करणारे उपाशी राहतात का ? माणूस जिवंत राहण्यासाठी विषय त्यागणे शक्य नाही.देह जिवंत आहे तोपर्यंत विषय सोडून जगणारा कोणी या जगात आहे का ?

समर्थ उत्तर देतात :
वैराग्ये करावा त्याग । तरीच परमार्थ योग । प्रपंच त्यागे सर्व सांग । परमार्थ घड़े । । १२-७-९
वैराग्यापरते नाही भाग्य । वैराग्य नाही ते अभाग्य । वैराग्य नस्तां योग्य । परमार्थ नव्हे । । १२-७-१७
प्रत्यये ज्ञानी वीतरागी । विवेकबळे सकळ त्यागी । तो जाणिजे महायोगी । ईश्वरी पुरुष । । १२-७--१८
वैराग्याच्या आधारावर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधतो .त्यामुळे वैराग्यासारखे दुसरे भाग्य नाही .ज्याच्याजवळ अनुभवाचे ज्ञान असते ,आसक्ती सुटलेली असते ,विवेकाने सर्वस्वाचा त्याग केलेला असतो ,तो महापुरुष ईश्वरी पुरुष असतो ।
जो विवेक व वैराग्य या दोंहीनी संपन्न असतो त्याच्या कड़े जाणते लोक ओढले जातात .ज्यांच्या कड़े विवेक व वैराग्य नसते ते निस्तेज ठरतात ,मनात आशा असल्याने मागे पडतात ,वैराग्य भ्रष्ट झाल्याने त्यांचे ज्ञान मिंधे पड़ते ।
प्रापंचिकाने विवेक व वैराग्य कसे जोपासावे ते समर्थ सांगतात :
सबळ विषय त्यागणे । शुध्द कार्याकारण घेणे । विषय त्यागाची लक्षणे । वोळखा ऐसी । । १२-७-२७
सकळ काही कर्ता देव । नाही प्रकृतीचा ठाव । विवेकाचा अभिप्राव । विवेकी जाणती । । १२-७-२८
मर्यादा सोडून असणारे ,प्रमाणाबाहेर जाणारे देहसुख सोडावे ,शरीराचे धारण करण्यास आवश्यक तेच देहसुख सेवावे .असा विषय त्याग प्रापंचिकांनी करावा ।
प्रापंचिकांनी विवेक कसा करावा ?
जे जे घडते त्याचा कर्ता ईश्वर आहे ,प्रकृतीच्या पसा-याला खरे अस्तित्व नाही .असा निश्चय अन्तर्यामी स्थिर करावा .कशाचा त्याग करावा व कशाचा करू नये ते जाणणे म्हणजे प्रापंचिकांचा विवेक !

No comments: