Tuesday, September 21, 2010

समर्थांचा उत्तम पुरुष

ज्ञानी पुरुषाने कोणत्या गुणांचा अभ्यास करावा ?
आपण यथेष्ट जेवणेउरले ते अन्न वाटणे । परंतु वाया दवडणे । हा धर्म नव्हे । । १२-१०-१
तैसे ज्ञाने तृप्त व्हावे । तेची ज्ञान जनास सांगावे । तरतेन बूडो नेदावे । बुडतयासी १२-१० -२
जसे आपण जेवल्यावर उरलेले अन्न दुस-याला देतो तसे आपण आत्मज्ञानाने तृप्त झालो तर तेच ज्ञान दुस-याला द्यावे ,दुस -याला शिकवावे ,जो स्वत : उत्तम पोहोतो व तरतो त्याने बुडणा-याला वाचवावे ,तारावे .समर्थ म्हणतात :
उत्तम गुण स्वये घ्यावे । ते बहुतांस सांगावे । वर्तल्याविण बोलावे । हे शब्द मिथ्या । । १२-१०-३
शरीर परोपकारी लावावे । बहुतांच्या कार्यास यावे । उणे पडो नेदावे । कोणियेकासी । । १२-१०-५
दुस-याच्या दु:खे दुखावावे । परसंतोषे सुखी व्हावे । प्राणी मात्रास मेळवून घ्यावे । ब-या शब्दे । । १२-१०-७
स्वत : उत्तम गुण घ्यावे ,नंतर अनेकांना सांगावे ,पण स्वत : तसे वागल्याशिवाय सांगू नये .कारण नुसत्या शब्दांना अर्थ नसतो .शरीर दस -यावर परोपकार करण्या साठी वापरावे .खूप लोकांच्या उपयोगी पडावे .कोणाला काही मदत कमी पडत असेल तर त्याला मदत करावी .दुस-याचे दु :ख बघून दु :खी व्हावे ,पण दुस-याचे सुख पाहून सुखी व्हावे .खूप लोकांना त्यांनी केलेल्या अन्यायाची क्षमा करावी .दुस-याच्या मनात काय चालले आहे ते ओळखून वागावे .आपल्या भोवतालच्या माणसांची सतत परीक्षा करत असावे .योग्य तेव्हढेच बोलावे ,ताबडतोब उत्तर द्यावे ,रागावू नये ,आळस सोडून खूप प्रयत्न करावा .कोणाचा राग येऊ देऊ नये . दुस-याला नेहमी उत्तम द्यावे .शब्द निवडून बोलावा .आपला संसार सावध करावा .समर्थ म्हणतात :
मरणाचे स्मरण असावे । हरिभक्तीस सादर व्हावे । मरोन कीर्तीस उरवावे । येणे प्रकारे । । १२-१०-१३
आपण एक दिवस मरणार आहोत याची जाणीव ठेवावी .म्हणून हरीभक्तीला सावध असावे ,तयार असावे .त्यामुळे मेल्यावरही आपली किर्ती मागे राहते .
त्तउम गुणी शृंघारला । ज्ञान वैराग्ये शोभला । तोचि एक जाणता भला । भूमंडली । । १२-१०-१७
कीर्ती पाहों जाता सुख नाही । सुख पाहातां कीर्ती नाही । विचारे विण कोठेच नाही । समाधान । । १२-१०-१९
परांतरास न लावावा ढका । कदापि न पडो नेदावा चुका । क्ष्मासीळ तयांच्या तुका । हानी नाही । । १२-१०-२०
उत्तम गुणात प्रामुख्याने आत्मज्ञान ,प्रखर वैराग्य ,गोड भाषण ,पुष्कळांना सुखी करणे या चार गोष्टींचा समावेश होतो .म्हणून नेहमी गोड बोलावे ,दुस -याला आपल्या सारखे मानावे .म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींनी आनंद होतो ,त्या गोष्टी दुस -यासाठी कराव्या .आपण जसे बोलावे तसे उत्तर येते .म्हणून कठोर व कटू शब्द बोलू नयेत ।
दंभ दर्प अभिमान । क्रोध आणि कठीण वचन । हे अज्ञानाचे लक्षण । भगवतगीतेत बोलिले । । १२-१०-२८
दंभ दर्प अभिमान क्रोध व कठीण वाणी ही अज्ञानाची लक्षणे आहेत असे भगवत गीतेत म्हटले आहे .उत्तम गुणांनी जो शोभून दिसतो तो उत्तम पुरुष असतो .अशा उत्तम ,थोर पुरुषाने लोक संग्रह करावा असे समर्थ सांगतात
आपण आवचिते मरोन जावे । मग भजन कोणे करावे । याकारणे भजनास लावावे । बहुत लोक । । १२-१०-३३
आपण अकस्मात् मरून गेल्यावर भगवंताची भक्ती करणारा कोणी राहणार नाही .म्हणून पुष्कळ लोकांना भजनास लावायला समर्थ सांगतात .लोकसंग्रह करण्या साठी पुढा-याच्या अंगी दोन लक्षणे असावी असे समर्थ सांगतात :
१ रोकड़ी प्रबोधन शक्ती २.पुष्कळ लोकांचे मनोगत हाती घेणे .त्यासाठी महंत कसा हवा ते समर्थ सांगतात :
जे जे जनास मानेना । ते ते जनही मानेना । आपण येकला जन नामा । सृष्टी मध्ये । । १२-१०-४०
परन्तु हे विवेकाची कामे । विवेके करील नेमे । इतर ते बापुडे भ्रमे । भांडोच लागले । । १२-१०-४१
माझेच म्हणणे खरे असे न मानता क्रमाक्रमाने लोकांना शिकवून शेवटच्या पायरीवर नेणे हे लोक संग्रह करणा-या पुढा-याने करावे असे समर्थ सांगतात

No comments: