Saturday, September 25, 2010

विश्वाची उत्पत्ती व संहार

विश्वाची उत्पत्ती व संहार [कहाणी रूपाने ]
श्रोता पुसे वक्तयासी । कहाणी सांगा जी बरवीसी । वक्ता म्हणे श्रोतयासी । सावध ऐके । । १३-५-२
येके स्त्री पुरुषे होती । उभयेतां मध्ये बहु प्रीती । येके रूपेची वर्तती । भिन्न नाही । । १३-५-३
ऐसा काही एक काळ लोटला । तयांस एक पुत्र झाला । कार्यकर्ता आणि भला । सर्व विषीँ । । १३-५-४
पुढे त्यासही जाला कुमर । तो पित्याहून आतुर । कांही तदर्थ चतुर । व्यापकपणे । । १३-५-५
तेणे व्याप उदंड केला । बहुत कन्या पुत्र व्याला । उदंड लोक संचिला । नानाप्रकारे । । १३-५-६
त्याचा पुत्र ज्येष्ठ । तो अज्ञान आणि रागीट । अथवा चुकता नीट । संहार करी । । १३-५-७
विश्वाची उत्पत्ती व संहार श्री समर्थांनी कहाणी रूपाने सांगितली आहे .प्रकृती व पुरुष एक प्रेमळ जोडपे आहे । विष्णू किंवा सत्वगुण हा त्यांचा मुलगा ,,विष्णूचा मुलगा ब्रह्मदेव किंवा रजोगुण ! तो जाणीव व नेणीवेचे मिश्रण असते .त्यामुळे तो उतावीळ असतो ,तो खूप प्रजा वाढवतो .व्याप वाढवतो .ब्रह्मदेवाचा मुलगा रूद्र किंवा तमोगुण म्हणजेच रूद्र !तो नेणता असतो ,रागीट असतो .कोणाचे चुकले की संहार करतो ।
मूळपुरुष शिव हा पिता व मूळशक्ती म्हणजे प्रकृती त्यांचा मुलगा म्हणजे विष्णू ,विष्णूचा मुलगा ब्रह्मदेव शिवाचा नातू ,ब्रह्मदेवाचा मुलगा रूद्र हा पणतू ,असे हे कुटुंब ! वंश खूप वाढल्यावर सर्व परस्परांशी खूप भांडू लागले .वडीलांना कोणी ऐकेनासे झाले .अशी कहाणी आपण आजही घडताना पाहतो । समर्थांनी ही कहाणी सांगण्याचा एकच उद्देश की ही कहाणी समजावून घ्यावी ,तिचे मनन करावे , अनुभव घ्यावा ,नि :संदेह व्हावे !
ऐसी कहाणी जो विवरला । तो जन्मापासून सुटला । श्रोता वक्ता धन्य जाला । प्रचितीने । । १३-५ -१६
अशा कहाणीचे मनन करणारा जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो .धन्य होतो .

No comments: