Sunday, June 27, 2010

सृष्टीची उभारणी व संहारणी



सृष्टीची उभारणी संहारणी कशी होते असा प्रश्न श्रोत्यांनी विचारल्यावर समर्थ सांगतात :
आकाशापासून वायो होतोहा तों प्रत्यया येतोवायोपासून अग्नी जो तोसावध ऐका। । ११-- । ।
वायोची कठीण घासणीतेथे निर्माण जाला वन्ही मंद वायो सीतळ पाणीतेथुनि जाले। । ११-- । ।
आपापासून जाली पृथ्वीते नाना बीजरूप जाणावी
बीजापासून उत्पत्ति व्हावीहा स्वभावची आहे । । ११-- । ।
मुळीं सृष्टी कल्पनेचीकल्पना आहे मुळींचीजयेपासून देवत्रयाची काया जाली । । ११-- । ।
निश्चळामध्ये चंचळते ची कल्पना केवळअष्टधा प्रकृतीचे मूळकल्पनारूप । । ११-- । ।
कल्पना तेची अष्टधा प्रकृतीअष्टधा तेची कल्पनामूर्तीमूळाग्रापासून उत्पत्तीअष्टधा जाणावी । । ११-- । ।
पांच भूते तीन गुणआठ जाली दोनी मिळूनम्हणोनि अष्टधा प्रकृति जाणबोलिजेते । । ११-- । ।
मुळी कल्पनारूप जालीपुढे तेचि फाफावलीकेवळ जडत्वास आलीसृष्टीरूपे । । ११-- । ।
आकाशापासून वायू निर्माण होतो हा आपल्याला प्रत्यय येतो .वायू मधील कठीण घासणी मुळे अग्नी निर्माण
होतो .मंद वायूपासून पाणी तयार होते .पाणी आळून पृथ्वी तया होते .पृथ्वीवर अनेक प्रकाराची बीजे साठवलेली असतात .त्या बीजांपासून प्राणी ,वनस्पती तयार होतात .
निर्गुण निराकार ,त्रिगुणातीत परब्रह्मामध्ये जे स्फुरण झाले '-एको हं बहुस्याम ''' मी एक आहे ,अनेक व्हावे '' हे स्फुरण म्हणजे मूळमाया !तिच्यामध्ये तीन गुण निर्माण झाले म्हणून ती गुणमाया झाली .तिच्यापासून
सत्व ,रज,तम हे त्रिगुण निर्माण झाले .या तीनही गुणांचे स्वामी असलेले ब्रह्मा ,विष्णू ,महेश हे देहधारी देव निर्माण झाले .रजोगुणाचा स्वामी ब्रह्मा ,सत्वगुणाचा स्वामी विष्णू , तमोगुणाचा स्वामी महेश निर्माण
झाले .तमोगुणापासून पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते निर्माण झाली .पंचमहाभूते त्रिगुण यापासून अष्टधा प्रकृती निर्माण झाली .मूळात ही मूळमाया ही सूक्ष्म कल्पना ,अष्टधा प्रकृतीच्या रूपाने फाफावली ,विस्तार पावली ,दृश्य विश्व निर्माण झाले .चार खाणी,चार वाणी ,८४ क्ष जीवयोनी निर्माण झाल्या .
अशा प्रकारे सृष्टीची उभारणी सांगुन झाल्यावर श्रीसमर्थ संहारणी सांगतात :
शत वरुषे अनावृष्टीतेथे आटेल जीवसृष्टीऐशा कल्पांताच्या गोष्टीशास्त्री निरोपिल्या । । ११--१३ । ।
बाराकळी तपे सूर्यतेणे पृथ्वीची रक्षा होयेमग ते रक्षा विरोन जायेजळांतरी । । ११- -१४ । ।
ते जळ शोषी वैश्वानरूवन्ही झडपी समीरूसमीर वितुळे निराकारूजैसे तैसे । । ११--१५ । ।
शंभर वर्षे पाऊस पडल्यामुळे पृथ्वी वरील सर्व जीवांचा नाश होइल .बारा प्रकाराच्या किरणांनी सूर्य तापेल .पृथ्वी जळून राख होइल .राख पाण्यात विरघळेल.अग्नी पाणी शोषेल.अग्नीला वायू विझवेल.वायू नाहीसा
होइल .निराकार ब्रह्म शिल्लक राहील .

No comments: