करंटा कोण ?
मनुष्य भाग्यहीन किंवा करंटा का होतो ?
उत्तम लक्षणे सांगितल्यावर श्रीसमर्थांनी करंट्याची लक्षणे सांगितली .समर्थ म्हणतात :
जनाचा लालची स्वभाव | आरंभीच म्हणती देव | म्हणिजे मला काही देव | ऐसी वासना || १८-७-१ ||
सामान्य जनांचा स्वभाव लालची असतो .देवांनी मला काही द्यावे या हेतूने ते देव हा शब्द उच्चारतात .त्यांची देवावर भक्ती नसते .पण देव आपल्यावर प्रसन्न व्हावा ,त्याने आपल्याला पाहिजे ते द्यावे अशी अपेक्षा करतात .
कष्टेवीण फळ नाही | कष्टेवीण राज्य नाही | केल्याविण होत नाही | साध्य जनी ||१८-७-३ ||
आळसे काम नासते | हे तो प्रत्ययास येते | कष्टाकडे चुकाविते |हीन जन ||१८-७-४ |
कष्टाशिवाय फळ मिळत नाही .राज्य मिळत नाही .कोणतीच गोष्ट मिळत नाही .पण लोक आळशी असतात .आळशीपणाने कार्य सिद्धीला जात नाही .तरी हीन प्रतिचे लोक कष्ट करत नाहीत .
देवाचे कर्तृत्व आणि देव | कळला पाहिजे अभिप्राव | कळल्याविण कितेक जीव |उगेच बोलती ||
१८-७-१४ ||
उगेच बोलती मूर्खपणे | शाहाणपण वाढाया कारणे | तृप्तीवीण उपाव करणे | ऐसे जाले ||१८-७-१५ ||
जेंही उदंड कष्ट केले | ते भाग्य भोगून ठेले | येर ते बोलतचि राहिले | करंटे जन ||१८-७-१६ ||
करंट्याचे उत्तम लक्षण | समजोन जाती विचक्षण | भल्याचे उत्तम लक्षण | करंट्यास कळेना ||१८-७-१७ ||
त्याची पैसावली कुबुद्धी | तेथे कैचीं असेल शुद्धी | कुबुद्धी तेचि सुबुद्धी | ऐसी वाटे ||१८-७-१८ ||
मनुष्य शुद्धीस सांडावे | त्याचे काय खरे मानावे | जेथे विचाराच्या नावे |शून्याकार ||१८-७-१९ ||
देवाचे स्वरूप आणि देवाचे कर्तुत्व समजावून न घेता लोक बोलतात .आपला शहाणपणा दाखविण्याकरितां देवाबद्दल व त्याच्या कर्तुत्वपणा बद्दल बोलतात .,ते करंटे असतात .
कष्ट न करता नुसते बडबड करणारे करंटे असतात .कुबुध्दीचे प्राबल्य असलेला ,शुद्धी नसलेला ,कुबुध्दिला अवगुणांना सुबुद्धी ,गुण समजतो तो करंटा असतो .
शुद्धीवर नसलेला ,ज्याचे बोलणे खरे मानता येणार नाही असा ,विचार नसणारा करंटा असतो .
No comments:
Post a Comment