Tuesday, August 30, 2011

करंटा कोणाला म्हणावे ?

करंट्याची लक्षणे कोणती ?

श्री समर्थ लोकांचे दोन गटात विभाजन करतात .१ भाग्यवान माणसे २ भाग्यहीन माणसे म्हणजेच करंटी माणसे .विवेकाचा अभाव व कष्ट करण्याचा अभाव या दोन कुलक्षणां मुळे माणूस करंटा बनतो .असे श्री समर्थ १९-३ या करंटलक्षण निरुपण या समासात सांगतात .ही लक्षणे सांगण्याचा उद्देश हा की त्या लक्षणांचा त्याग केल्याने माणूस भाग्यवान होतो .पापाचे आचरण केल्याने दारिद्र प्राप्त होते .दारिद्र्याने पाप साठते .दारिद्र्य येते .आळसाने ,प्रयत्न करणे न आवडल्याने प्रथम आळस सोडावा .करंट्याची वासना अधर्मात वावरते म्हणून वाईट गोष्टी कराव्याश्या वाटतात .

करंटा नेहमी भ्रमिष्ठ ,झोपाळू असतो .अव्वाच्या सव्वा बोलतो .कोणाच्या अंत:करणाची तो पर्वा करत नाही .त्याला लिहिणे ,वाचणे ,जमाखर्च ,व्यापारात लागणारे देणेघेणे कांहीच येत नाही .तो वस्तू हरवतो ,मोडतो पाडतो ,फोडतो विसरतो ,चुकतो ,चांगल्या माणसांची संगत तो धरत नाही .दुष्ट नष्ट चोरटे ,पापी मित्र जोडतो .तो प्रत्येकाशी भांडतो .,तो चोरटा असतो .दुस-याचा घात करणारा असतो .वाटमार करणारा असतो .

दीर्घ सूचना सुचेचिना | न्याय नीती हे सुचेना | परअभिळासी वासना |निरंतर ||१९-३-१० ||

आळसे शरीर पाळी | अखंड कुंसी कांडोळी | निद्रा पाडी सुकाळी | आपणासी || १९-३-१२ ||

शब्द सांभाळून बोलेना| आंवरता आवरेना | कोणीयेकासी मानेना | बोलणे त्याचे ||१९-३-१६ ||

दूरदर्शीपणा त्याला सुचत नाही ,नीती न्याय रुचत नाही .दुस-याला लुबाडण्याची वासना असते .करंटा आप्पले शरीर आळसाने पाळतो .कालांतराने त्याला खायला मिळत नाही .पांघरायला मिळत नाही .असा आळशी माणूस सतत कुशी खाजवतो .नाहीतर झोपून राहतो .सर्वांना कठोर ,झोंबणारे शब्द बोलतो .पवित्र लोकांमध्ये मिसळत नाही .अपवित्र ,घाणेरड्या लोकांमध्ये नि:शंक पणे मिसळतो .समाजाला निंद्य वाटाणा-या गोष्टी तो सहज करतो .आपल्याला स्वत:ला काही कळत नाही ,कोणी शिकवले तर ऐकत नाही .खूप मोठ्या कल्पना करतो पण पदरात कांहीच पडत नाही .त्यामुळे कायम कल्पनेच्या जाळ्यात अडकतो .त्याच्या जवळ निश्चय नसल्याने अनुमानाने त्यांचा नाश होतो .

No comments: