Monday, August 16, 2010

अंतरात्मा

परमात्म वस्तू चा विचार तीन पाय-यांनी करता येते .आपल्या देहात वास करणारा आत्मा ,विश्वात चराचरात वास करणारा विश्वात्मा ,विश्वाला पुरून उरणारा परमात्मा !
तेणेविण कार्य न चले । पडिले पर्ण तेही न हाले । अवघे त्रैलोक्यचि चाले । जयाचेनि । । ११-८-२
तो अंतरात्मा सकळांचा । देवदानव मानवांचा । चत्वार वाणी चत्वार खाणींचा । प्रवर्तक । । ११-८-३
तो येकलाचि सकळां घटी । करी भिन्न भिन्न राहटी । सकळ सृष्टीची गोष्टी । किती म्हणौन सांगावी । । ११-८-४
सर्व घटनांचा कर्ता ,देवांचा मालक तो अंतरात्मा ! अंतरात्म्याशिवाय कोणतेही कार्य घडून येत नाही .त्याच्या सत्ते वाचून पडलेले पानही हालत नाही .देव ,दानव ,मानव ,चार खाणी ,चार वाणी या सर्वांचा तो प्रवर्तक आहे .सर्व प्राण्यांच्या शरीरात तो वास करतो .वागायला प्रेरणा देतो ,तोच इश्वर !
ऐसा जेणे वोळखला । तो विश्वंभरची जाला । समाधी सहजस्थितीला । कोण पुसे । । ११-८ -६
अशा अंतरात्म्याचे ज्ञान ज्याला होते ,तो विश्वव्यापी बनतो .त्याचे मन इतके सूक्ष्म होते व विशाल होते की तो 'हे विश्वची माझे घर असे म्हणू लागतो .अंतरात्मा देहात असला तरी सामान्य माणसाला अनंत आणि अपार असलेला अंतरामा जाणता येत नाही .त्यासाठी काय करावे असे श्रोत्यांनी विचारल्यावर समर्थ म्हणतात :
अंतरी ठेवणे चुकले । दारोदारी धुंडू लागले । तैसे अज्ञानास झाले । देव न कळे । । ११-८-१८
एखाद्या घरात संपत्ती ठेवलेली असते पण ती कोठे ठेवली आहे ते तो विसरतो .संपत्ती साठी दारोदार हिंडू लागतो .तशी अज्ञानाची अवस्था असते .त्याच्या अंतरात असणारा अंतरात्मा म्हणजे ईश्वर त्याला कळत नाही .अनेक तीर्थक्षेत्रे हिंडतो पण ईश्वर भेटत नाही .त्यासाठी काय करावे असे विचारल्यावर समर्थ म्हणतात :
आरे हे पाहिलेच पहावे । विवरलेची मागुते विवरावे । वाचिलेच वाचावे । पुन्ह्पुन्हा । । ११-८-९
अंतरात्म्याचे झालेले अल्प ज्ञान वारंवार घ्यावे .पुन्हा पुन्हा त्याचे विवरण करावे ,त्याच्या बद्दल वाचलेले पुन्हा पुन्हा वाचावे .समर्थ म्हणतात :
तत्वे तत्व जेव्हा उड़े । तेव्हा देह्बुध्दी झडे । निर्मळ निश्चळ चहुंकडे । निरंजन । । ११-८-२३
आपण कोण कोठे कैचा । ऐसा मार्ग विवेकाचा । प्राणी जो स्वये काचा । त्यास हे कळेना । । ११-८-२४
एका तत्वाने दस-या तत्वाचा निरास केला की देह्बुध्दीचा क्षय होतो .निर्मळ ,निश्चळ परब्रह्म अनुभवाला येते .माणसाने मी कोण ,मी कोठून आलो या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर अंतरात्म्या पर्यंत पोहोचू शकतो .

No comments: