माणूस इंद्रिय गोचर दृश्य विश्वात रमतो ,तसा तो अतिंद्रिय अदृश्य विश्वातही रमतो .त्याचे इंद्रिय गोचर दृश्य विश्वात रमणे म्हणजे प्रपंच आणि अतिंद्रिय अदृश्य विश्वात रमणे म्हणजे परमार्थ !असे श्री के .वि .बेलसरे म्हणतात .अतिंद्रिय अदृश्य जग हे संकल्पनांचे बनलेले असते .ह्या संकल्पनाचे जगत माणसाच्या विवेक शक्तीतून निर्माण होते ।
विवेक शक्ती व वैराग्य या दोन्ही गोष्टींवर समर्थ जोर देतात .समर्थ म्हणतात ;
आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका । येथे आळस करू नका । विवेकी हो । । १२ -१-१
प्रपंच सांडून परमार्थ कराल।तेणे तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी । । १२-१-२
प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिलना खायाला । मग तया करंट्याला । परमार्थ कैचा । । १२-१-३
समर्थ आधी प्रपंच नीट करायला सांगतात ,मग परमार्थाकड़े वळायला सांगतात .कारण ते म्हणतात की प्रपंच सोडून परमार्थ केला तर तुम्ही कष्टी व्हाल कारण तुमच लक्ष सगळ प्रपंचाकड़े राहणार आहे .प्रपंचा पासून दूर जाऊन ही परमार्थ साधणार नाही .परमार्थ सोडून प्रपंच केलास तरी तू दु:खी होशील ,यमयातना भोगशील .म्हणून भगवंताची भक्ती करावी ,परमार्थाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा .कारण :
संसारी असता मुक्त । तोचि जाणावा संयुक्त । अखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे । । १२-१-८
संसारामध्ये राहून जो मुक्त दशा अनुभवतो तो खरा योगी असतो .कारण योग्य काय आणि योग्य काय याचा सारासार विचार त्याच्या मनात अखंड जागा असतो .म्हणून समर्थ सांगतात :
म्हणौन सावधानपणे । प्रपंच परमार्थ चालवणे । ऐसे न करता भोगणे । नाना दुखे । । १२-१ -१०
पर्णाळी पाहोन उचले । जीवसृष्टी विवेके चाले । आणि पुरुष होऊनी भ्रमले । त्यासी काय म्हणावे । । १२-१-११ झाडाच्या पानावरील अळी सुध्दा आधार बघून पाय उचलते ,क्षुद्र कीटक ही आधार बघून पाय उचलतो ,विचार पूर्वक कर्मे करतो ,मग बुध्दीमान असलेला माणूस अविवेकाने भलतेच करतो ।
म्हणून समर्थ अखंड चाळणा करायला सांगतात .
म्हणौन असावी दीर्घ सूचना । अखंड करावी चाळणा । पुढील होणार अनुमाना । आणून सोडावे । । १२-१-१२
समर्थ दूरदृष्टी विकसित करायला सांगतात .त्यामुळे सर्व बाजूंनी सावधपणा राखता येतो त्याला थोर पण मिळते आणि स्वत :चे व दस-याचे समाधान टिकवता येते .
Friday, August 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment