Saturday, August 7, 2010

सामान्य माणसाने त्याचे जीवन सुंदर कसे बनवावे ?

बहुतां जन्माचा सेवट । नरदेह सांपडे अवचट । तेथे वर्तावे चोखट । नीतिन्याये । । ११-३-१
प्रपंच करावा नेमक । पाहावा परमार्थ विवेक । जेणेकरितां उभय लोक । संतुष्ट होती । । ११-३-२
अचानक पणे जेव्हा अनेक योनी फिरून आल्यावर नरदेह मिळतो ,तेव्हा जीवन सुंदर कसे जगावे ते समर्थ सांगतात की प्रपंच नीट व्यवस्थित करावा ,परमर्थाचाही अभ्यास करावा ,म्हणजे इहलोक व परलोक दोन्हीकडे यश मिळते ,नाहीतर :
पुण्यमार्ग अवघा बुडाला । पापसंग्रह उदंड जाला । येमयातनेचा झोला । कठीण आहे । । ११-३-८
तरी आता ऐसे न करावे । बहुत विवेके वर्तावे । इहलोक परत्र साधावे । दोहींकडे । । ११-३-९
नरदेह मिळूनही जीवनात पुण्य केले नाही ,फक्त पापांची साठवण झाली ,तर यमयातनांचा हिसका बसतो तो खूप कठीण असतो .म्हणून जीवनात विवेकाने वागून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधावा असे समर्थ म्हणतात .म्हणून समर्थांची पहिली शिकवण आहे :आळस सोडावा .आळसाचे भयंकर स्वरुप समर्थांनी वर्णन केले आहे ।
आळसाचे फळ रोकडे । जांभया देउन निद्रा पड़े । सुख म्ह्णौन आवडे । आळसी लोकां । । ११-३-१०
आळस उदास नागवाणा । आळस प्रेत्न बुडवणा । आळसे करंटपणाच्या खुणा । प्रगट होती । । ११-३-१२
जीवनात आळस असेल तर माणूस सुस्त होतो ,निद्राधीन होतो .माणसांना झोप सुखाची वाटते .पण आळसाने झोप
उत्साह वाटत नाही ,आळसाने नुकसान होते .माणूस प्रयत्न करेनासा होतो .आळस माणसाच्या दुर्भाग्याची खूण असते म्हणून समर्थांनी आग्रह पूर्वक सांगितले आहे की :
म्ह्णौन आळस नसावा । तरीच पावीजे वैभवा । अरत्री परत्री जीवा । समाधान । । ११-३-१३
मग जीवन समृध्द ,सुंदर होण्यासाठी समर्थांनी १५ मण्यांची माळ वापरायला सांगितले आहे .हे १५ मणी म्हणजे दिनक्रमाची रूपरेषा आहे ।
१ आळस टाकून प्रयत्न करावा ।
२ .सकाळी लवकर उठावे .काही तरी पाठांतर करावे ,भगवंताचे स्मरण करावे
३.शौचास जावे ,हातपाय स्वच्छ धुवावे ,आचमन करावे .
४.दात घासावे ,प्रात:स्नान करावे ,संध्या करावी ,देवाची पूजा करावी ,वैश्वदेवाची पूजा करावी .
5थोड़े खावे ।
६.प्रपंचातला उद्योग करावा .गोड शब्दांनी संबंधी माणसांना खुश ठेवावे ।
७.व्यवसायात खबरदारीने वागावे .बेसावाधपणे वागू नये।
८.माणूस चुकतो ,फसतो ,वस्तू विसरतो ,आठवण झाली की तळमळतो ,यशस्वी होत नाही ,कारण आळस आणि बेसावधपणा!
९.व्यवसायात मन एकाग्रतेने गुंतवावे .उत्तम व्यवसाय करावा ।
१० .जेवण झाल्यावर थोड़े वाचन ,मनन ,चिंतन करावे ।
११.दुस-या साठी थोडेतरी कष्टवावे ,भगवंताने भरंवसा ठेवून वागावे ।
१२.प्रपंचात पोटापुरता पैसा मिळवावा ।
१३ .परमार्थात आपला आपण शोध घ्यावा .मी कोण याचा शोध घ्यावा ।
१४.भगवंताचे आपण विश्वस्त आहोत या भावनेने प्रपंच करावा ।
१५ .जीवन यशस्वी करण्यासाठी प्रपंच व परमार्थ दोन्ही करावी ।
ही १५ मण्यांची माळ सांगून झाल्यावर श्री समर्थ म्हणतात :
प्रपंची पाहिजे सुवर्ण । परमार्थी पंचिकर्ण । महावाक्याचे विवरण । करिता सुटे । । ११-३-२९
प्रपंच व्यवस्थित चालण्यासाठी पेशाची आवश्यकता असते .तर परमार्थ उत्तम होण्यासाठी विश्वातील तत्वांचे ज्ञान असायला हवे ।
कर्म उपासना आणि ज्ञान । येणे राहे समाधान । परमार्थाचे जे साधन । तेंची ऐकत जावे । ११-३-३०


1 comment:

Vivek Vishwarupe said...

Atyant sope aani nityajeewanaat upayogi..! Suekh niroopan.